पत्रिकेत एक प्रमुख बाब नमूद केलेली असते ती म्हणजे गण. गण कोणी, कधी आणि कसा शोधून काढला माहित नाही, पण त्याला एक अध्यात्मिक, सामाजिक आणि अभ्यासपूर्वक पाय असणार हे निश्चितच. खूप आधी गुरुजनांनी हे तीन गण निश्चित केले असणार.
मी मागे एका अनुदिनीत नमूद केल्याप्रमाणे माझ्या दृष्टीने चौथा गण पण अस्तित्वात आहे. त्यात अशी मंडळी येतात ज्यांना "पुरणपोळी देखील तिखट लागते". असो.
मला आज एक उमगलं आहे कि हे गण कसे निर्माण झाले असतील. आताशा आभासी जगात आपण अनेक संघ तय्यार करतो. अगदी शालेय जीवनापासूनच खास मित्र, वर्ग मित्र, शेजारचे मित्र, खेळायचा ग्रुप असे अनेक गट तय्यार होत जातात. अगदी सहज घडतं म्हणा किंवा विचारपूर्वक देखील. निरखून आणि पारखून मग एखाद्याला आपल्या गटात सामील केले जाते. निरखणे आणि पारखणे म्हणजे थोडक्यात त्यांच्या कृतींकडे लक्ष देणे, ते विविध प्रसंगाच्या वेळी कसे वागतात ते टिपणे, त्यांची प्रतिक्रिया काय असते हे बघणे ई. आणि बरेच काही. गहन आहे हा विषय खरं. प्रत्येकवेळी सोज्वळ अशी भूमिका जर घेतली, वयोमान, लहान थोर ह्याचा विचार न करता, न असून राहता जर कार्य करत राहिला, सतत कार्यमग्न राहिला, सगळेच गोड मानून घेतले बहुतेक प्रत्येक वेळी, राग लोभ ह्या पल्याड असा व्यक्ती म्हणजे देव गण. माणसासारखा वागणारा माणूस. आणि ज्याचा कधीच थांग पत्ता लागताच नाही, कुठलीही शाश्वती नाहीच, कधी कुठे कोणाशी काय होईल हे सांगता येत नाही, बिना वातीचा फटाका, गुरगुरण्याचा सातत्य टिकवून ठेवणारा, नको त्यात नाक खुपसणारा, नको तेवढे सल्ले देणारा, नकोसा असा म्हणजे बोलायलाच नको, पत्रिका देखील पाहायला नको. कधीच कुठलेच ग्रह तारे स्थिर दिसणार नाहीतच. अश्यांपासून लांब राहणे अत्त्योत्तमच, ते अशक्य असले तरी. कधीच त्यांच्या कुठल्याच टोकाच्या वागण्यावर जाणे नकोच, चांगले वागले तर वाहून जायला नको आणि वाईट वागले तर दुःख होऊ देऊ नये. त्यांचं यांनाच ठाऊक नसतं ते काय करत आहेत ते, कधीच. सारखे भरकटलेले, गोंधळलेले आणि अक्षम. कधीं आहे फरक लक्षात घेणं "अबसेन्ट माईंडेड प्रोफेसर" आणि ह्यांच्यात पण ते माणूस आणि देवांच्या स्वहिताचे आहे. त्यामुळे पत्रिका बघणाऱ्यांना आणि संगणकाच्या साहाय्याने पत्रिका तय्यार करणाऱ्यांना हात जोडून विनंती आहे कि जरा आपला दृष्टिकोन बदल. तीन गण फक्त नावाला नाहीत, तिसरा भलताच आहे, तिसरा डोळा पापणी रहीत असलेला असा. त्यामुळे तुमच्या हातून कोणाचे ह्या पुढे नुकसान होऊ नये ह्याची खबरदारी घ्या आणि चौथ्या गणाबद्दल समोरच्याला सावध कराच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा