स्वभाव असतो का घडतो का घडविला जातो हे मला आज सुस्पष्ट झालं.
मला समजायला लागल्या पासून फक्त माझ्याच घरात नाही तर आजूबाजूला, शेजारीपाजारी आणि सर्वत्रच एक घोष वाक्य ऐकत आम्ही सर्व जणी मोठ्या झालो. "सासरी जायचं आहे". बसणं, उठणं, सवयी, खर्च ई. सगळं म्हणजे सगळं सासरी जायचं आहे ह्यांच्याशीच कसं निगडित होतं कोणास ठाऊक? पैसे अगदी सांभाळून खर्च करायचे, कारण एक तर वडिलांचे आहेत, खरंच गरज आहे का?, अशीच सवय टिकून राहिली तर? त्यामुळे सातत्याने अकुंश ठेवला जायचा, गरज नसतांना, परिस्थिती असतांना देखील. असं होता होता स्वतः कमवायला लागल्यावर ५०% बचत करायची असे वडिलांनी सांगितले. कुठे ठेवायचे ते पैसे हि दिशा दाखवली. उरलेले पैसे गाडीच्या सर्व्हिसिन्गला, इंधनाला, वाढदिवस वगैरे अश्या ठिकाणी, किंवा घरी आई वडिलांना काही छोटं मोठं आणण्यात खर्च होत असतं. हे सगळं करते वेळी वाटलं कि सासरी गेलं कि सगळंच आलबेल असणारच, म्हणजे दुसरे मत नव्हते, कुठलेही स्वप्न नव्हतेच, खात्रीच होती. पण तेथे पण जपून वापरणे च पदरी पडले. किंवा इतक्या वर्षांची सवय एकदम मोडली नाही. मग घरासाठी, मुलांची फी, हे - ते खर्च, सरकारी नोकरी नसल्यामुळे मग नंतरच्या वेळी / उतार वयात कामी येतील म्हणून ठेवले गेले काही. जोडीदाराने भरपूर खर्च केले पण कुठेतरी ती कुणकुण होतीच, स्वछंद वागता आलेच नाही. आता काय इच्छा निवृत्ती, त्यामुळे अजूनच फुंकून मार्गक्रमणा. आजचीच ताजी पिटुकली गोष्ट. काहीही कारण नसतांना मनात आलेली. दोन कंपन्यांची टाल्कम पावडर ची किंमत बघितली. नेहेमीची पावडर फक्त मंद सुगंध देते आणि दुसरी बघितली ती कमी किमतीत (डील सुरु असल्यामुळे) पण अत्तर किंवा परफ्युम लावल्याचा आनंद देते, एक दगडात दोन ... मग का नाही घेऊ मी. मनाला शिवले कि दोन जिन्नस घेण्या ऐवजी एकाच घेऊ.
जडण घडण, आजूबाजूचे तेव्हाचे वातावरण असे होते कि उद्या माझीच मुलं कमवायला लागल्यावर त्यांच्या पुढे हात कधीच पसरवणार नाहीच.
म्हणजे बचत हा पिंड / स्वभाव झाला आहे माझा किंवा माझ्या वेळच्या मराठी, साध्या, मध्यमवर्गीय मुलींचा. हवे तेव्हा, हवे तेवढे खर्च करतो, केला आहे, कंजूस नक्कीच नाही, रडत बसत नाही पण हात राखून म्हणतात ना तसे काहीसे. चांगली सवय लावली आहे कळत - नकळत. त्यामुळे थोडे तरी बाजूला राहिले आता. कशी मज्जा असते नाही. नोकरी करणारी मी, किंवा माझ्या सारख्या चाकरमान्यांना नाही भावात कोणालाच पैसे मागायला आणि उडवायला. तक्रार अजिबात नाही, खूप म्हणजे खूप धूम केली जेवढं होतं तेवढ्यात, सगळ्यांनीच हं, आई बाबांनी, लग्नाच्या आधी, लग्नानंतर, मुलांसोबत, हे खूप मस्त आहे आणि शिकवणारं असं, खूप समाधान आहे. जमिनीवर पाय घट्ट रोवून आहेत हे सगळ्यात महत्वाचं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा