आदरणीय आणि सर्वश्रेष्ठ श्री रामाचे मंदिर स्थापनेच्या वेळी "नादातूनी ह्या नाद निर्मीतो..." हि आरती सर्वश्रुत झाली. अजून देखील अगदी नित्य नेमाने हि आरती ऐकणारे खूप जण आहेत, त्यातली मी एक. त्या वर माझ्या हातून काही ओली लिहिल्या गेल्या होत्या आणि मला एक जप माळ पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले ती आरती / भजन ऐकून. त्याच कारण म्हणजे फक्त किती वेळा राम नाम माणसाने / गायकांनी उच्चारले आहे हे नाही तर जितकी वाद्य वाजली ह्या संपूर्ण आरतीत, जितक्या ताल आणि सूर वाद्यांनी, समूह गायकांनी साथ दिली ह्या सगळ्यांची बेरीज १०८ होते असा माझा अंदाज आहे, किंबहुना खात्रीच.
प्रत्येक व्यक्तीला त्याचे कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते ती सूर्य बाप्पाकडूनच. प्रत्येक व्यक्तीलाच कशाला? अगदी संपूर्ण सजीव समूहाला तोच तर ऊर्जा पुरवतो, किंवा तोच ऊर्जेचे स्तोत आहे. ह्या उपर मी तर म्हणेन कि प्रत्येक निर्जीवातल्या सजीवाला देखील तोच कार्य करण्यास मोलाची मदत करतो. आता ह्या श्री रामाच्या आरती विषयीच बघा ना, काही दिवस जर तबला तस्साच पडून राहिला तर तो हवा तास वाजत नाही, किंवा तसे गोड बोल कानी पडत नाही. त्याला देखील हवा लागली पाहिजे, ऊन / ऊर्जा हवीच, वादका सोबत. सूर्य बाप्पा जरा विश्रांती घ्यायला ढगा आड लपला कि म्हणे तबला सर्रदतो, मग खूप वेळ घेऊन लावावा लागतो.
तबलाच कशाला ढग आले कि सर्वांनाच थोडसं निरुत्साही वाटतंच. पाऊस पडतो तेव्हा, त्या मोसमात बरीचशी लाकडी दारे सुद्धा फुगून बसतात, कपड्यांना वास येतो.
अगदी समुद्र, नद्या, फुलं, पानं, पक्षी, सगळ्यांना म्हणजे सगळ्यांचाच उत्साह टिकवून ठेवणारा आपला सूर्य बाप्पा.
मला हे सुचवायचं आहे कि फक्त भजन ऐकून, कानावर पडून, किंवा शब्दांमुळे, गायकाच्या शैली मुळेच प्रसन्न आणि अध्यात्मिक बाहेर येत नाही तर वातावरण निर्मिती व्हायला आणि टिकायला सगळेच कारणीभूत ठरतात, सूर्य ऊर्जेने युक्त वाद्य, वाद्यवृंद, कोरस गाणारे, दाद देणारे श्रोते, आणि इतर अनेक घटक.
अश्या ह्या सूर्य बाप्पाला नमन, दंडवत, जो प्रत्येकाचा सखा आहे, सोबती आहे आणि पिढ्यानपिढ्या, अनेक वर्ष पासून अथक, निरपेक्ष कार्य करतोय दिवस रात्र संपूर्ण जगभर. हि जरी सुष्टीची किमया असली तरी ती कमाल आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा