सोमवार, १५ जुलै, २०२४

काटेकोर


मला आज  एका शासकीय कचेरीत काम होते. त्या साठी एक व्यक्ती म्हणे मला मदत करणार होता. त्याचा नंबर मला त्याच्या बॉस नी पाठवला शनिवारी आणि म्हणाले कि ह्या व्यक्तीला संपर्क करा तो तुमचे काम करण्यासाठी मदत करेल. मग काय साधारणतः ९.३० च्या सुमारास मी त्यांना फोन केला पण त्यांनी उचलला नाही. मग मी त्यांना निरोप पाठवला, म्हणजे मेसेज केला तरी देखील काहीच उत्तर नाही. मग पुन्हा काही वेळाने प्रयत्न केला, केले पण व्यर्थ. मग न राहवून त्या व्यक्तीच्या मालकांना फोन करून विचारले कि ते ठीक आहेत ना? ते येणार आहेत का? का कोणी अजून मला मदत करणार आहेत? ई.  तेव्हा मला मिळालेले उत्तर अवाक करणारे होते, अर्थात खूप छान आहे हे असं काटेकोर राहणं. कचेरीची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच अशी आहे. मग ते त्या आधी का फोन उचलतील? कचेरी सुरु झाली कि मगच फोन सुरु होणार त्यांचा. मी हे ऐकून खरंच अवाक झाले. मला असं अजिबात नाही म्हणायचं कि वाटेल तेव्हा त्यांनी फोन वर हजर राहणे अत्यावश्यक आहे. पण सोमवार, एका नवीन हफ्त्याची सुरवात आणि दहाच्या ऐवजी ९.३० वाजले होते. फोन नका उचलू, मेसेज ला तर उत्तर द्या पण नाही म्हणजे नाहीच. शिस्त आवडली काय भावली मला. खूप वेगळं वाटलं ह्या अश्या सातत्याने फोन वर राहणाऱ्या जगात असे अवलिया पण तक धरून आहेत हे मस्त आहे एकंदरीत. त्यांनी दहा ला मग मला फोन केला माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि अश्या रितीने मी एक नाविन्यपूर्ण सवय अनुभवली.  ठरवलं तर काहीही चांगलं असं करूच शकतो माणूस. आधी मला किंचित राग नाही पण वेगळं वाटलं मला. म्हटलं गाडी चालवत असेल, रस्त्यात असेल, कशाला उगाच फोन उचलायला लावायचा. पण हा नियम समजला आणि काय बोलू असं झालं, थोड्या संमिश्र अश्या भावना उत्पन्न झाल्या मात्र.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...