सध्या अगदी सगळेच जण आप-ला असं म्हणणं पूर्णतः विसरले आहे. आपले घर, गाव, माणसं, मित्र, सखा आणि इतर. आता देखील आहेत, भरमाढ आहे पण वास्तवात नाहीत आणि आताशा अस्तित्वात नसलेले पण आहेत, AI च्या कृपेने. असंख्य अँप ने अक्षरशः वेढले आहे सर्वांना सर्वत्रच. शब्दांमध्ये मांडण्या पल्याड असे आहे सर्व. जो बघावं तो फक्त अँप ची भाषा बोलतो, अँप वर असतो, त्यांच्याशीच हुतगुज करतो, संपर्कात राहतो, गरज नसल्यास देखील. असो. कालाय तस्मै नमः !!! काळाचा महिमा अगाध. आणि हे सर्व दूर पसरलेले आहे, फक्त शिक्षितच नाहीत, ह्या किंवा त्या गटातले नाही तर सगळेच एका माळेचे मणी असे झालेत. म्हणजे व्यापारी पण त्यांचा फायदा किंवा व्यापार वाढवण्यासाठी त्यांच्या पद्धतीचे, किंवा त्यांच्यासाठी तय्यार केलेले अँप वापरतात, आणि आपण जे ग्राहक असतो ते वेगळे व्हर्जन.
काही दुकानांसमोर तर अँप शी सलंग्न असलेले आणि सामान पोचते करणारे च जास्त घेरलेले असतात, इतकी घाई असते त्यांना जगावेगळी कि तेच काय ते फक्त काम करतात बाकी सगळे रिकामटेकडे.
आणि अश्या स्थितीत, अश्या वेढलेल्या जगात जर मी तुम्हाला सांगितले कि एक असा अवलिया आहे जो मस्त पैकी धंदा करतो आहे गेले अनेक वर्षांपासून, त्याच्या कडे ओंलीने पेमेंट ची सुविधा आहे, कार्ड मशीन आहे, अत्याधुनिक दुकान आहे, माल खूप चांगल्या दर्जाचा ठेवतो आणि एक सातत्य आहे. उगाच नको ते तो ठेवतच नाही किंबहुना तय्यारच करत नाही. त्याच्या कडे जाऊनच माल आणावा लागतो. मी मागल्यावेळी गेले तेव्हा विचारले कि तुम्ही घरी पाठवू शकाल का काही मागवलं तर. तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. ज्यांना यायचं आहे ते येथेच येऊन घेऊन जातात मॅडम. नको ते अँप्स. आणि खरंच त्याचे दुकान / बेकारी कुठल्याही अँप वर नाहीच आहे. कोणाला तरी पाठवा किंवा स्वतः घेऊन जा, बास. अँप वर न राहता धंदा करता येतो, खप होतो, व्यापारी आनंदाने जगू शकतो, हे सगळं लक्षात येतं ह्या दुकानदाराकडे बघून आणि खूप समाधान मिळतं. जे आहे ते खूप आहे हा कल आवर्जून आवडला मला त्याचा. वाहवत नाही गेला तो हे करणं अवघड आहे जेव्हा आजूबाजूची सगळीच दुनिया भलत्याच्या पाठिमागे धावते आहे तेव्हा. माझ्या दृष्टीने एकंदरीत सुरक्षा, न हपापता धंदा करणे, आणि तो उत्कृष्ट रित्या चालवणे गुणवत्ता सांभाळून हे अँप शिवाय आधी पण चालत होतं आणि आता देखील चालतंय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा