काल सर्वत्र सर्व सजीवांना सुधृढ ठेवणाऱ्या अवलियांचा दिवस होता, डॉक्टर्स डे ह्या नावाने तो प्रसिद्ध आहे. ह्या निमित्याने माझी जीवनरेषा ज्यांनी सांभाळली आहे त्या सर्वांना मी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ह्या अद्भुत व्यवसायाशी अनेक म्हणी संलग्न आहेत. त्यातली एक अशी कि डॉक्टर ला बघितले कि अर्धा आजार बरा होतो, असं त्यांचं फक्त व्यक्तिमत्वच नसतं तर त्यांचा अनुभव खूप बोलका असतो. त्यांना शिताफीने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक ह्यांना सांभाळण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची कला अवगत झाली असते. किंवा त्यांना तसेच राहावे लागते हा त्यांच्या व्यवसायाचा मूळ सिद्धांत आहे. अंतर्बाह्य बरं करण्याची जबाबदारी असते ह्या सर्व निष्णात डॉक्टरांवर. त्या ते बखुबी निभावतातच. सातत्याने वेदना जे धैर्याने हाताळतात मग त्यांच्या समोर जातांना प्रत्येकाने सुबक सुंदर, म्हणजे साध्या पण शिस्तीत वेष आणि केशभूषा करून का जाऊ नये? माझ्या मते तरी येणार रुग्ण बघूनच डॉक्टरचा असला नसला थकवा दूर गेला पाहिजे. त्यांना मरगळ येत काम नये.
दुसरा मुद्दा असा कि फक्त शारीरिकच व्याधी नसतात ना सर्वांना? मानसिक पण असू शकतात. किंबहुना काही संशोधन कर्ते म्हणतात कि बहुतांशी मानसिक गरजा किंवा व्याप जास्त असतात, शारीरिक कमी. पण व्याधी होण्याकरता हे खताचे काम करते. तेव्हा मानसिक स्वास्थ्य जपणे अतिशय महत्वाचे असते. हे जपण्याकरता, म्हणजे स्वतःचे आणि इतर जनांचे देखील फक्त डॉक्टरचं कमी येत नाहीत, तर व्यायाम, कामात व्यग्र ठेवणे, साधना, छंद, उत्तर शोधणे पसंद करणे, अडथळ्यांभोवती फिरत न राहता, आणि असे अनेक मार्ग आहेत. गुरूशी संवाद साधणे हा त्यातील एक सर्वोच्च मार्ग. गुरु म्हणजे कुठे तरी हिमालय पर्वतात स्थानापन्न असायलाच हवा असे नाही. आपले अनेक गुरु असू शकतात, किंबहुना असतातच. गुरूंना, गुरुजनांना, थोरा मोठ्यांना, अनुभवी व्यक्तींना प्रश्न उद्भवल्यावर आणि त्याची उत्तरे शोधल्यावर नेमके कुठले जास्त योग्य आहे हे समजले कि मग "आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे" अशी स्थिती निश्चित होतेच. गुरुजन म्हणजे आपले आई वडील, आई वडिलांसारखे, शेजारी, मैत्रिणी, आधुनिक आध्यात्मिक गुरु / गाढे अभ्यासक असे. गुरुजनांच्या संपर्कात राहणे, मेडिटेशन च्या मार्गावर चालणे, वागणे आणि बोलणे ठेवले, सातत्य जपले तर मग मानसिक स्वास्थ निश्चित लाभतेच. फक्त वर वर गुरूंचा सल्ला घेणे नव्हे. माझ्या दृष्टीने हे सर्व गुरुजन म्हणजे मला डॉक्टरांच्या जागी आहेतच. ते प्रिव्हेंटिव्ह पद्धतीने समजावून सांगतात, मार्ग दाखवतात, बरोबर राहतात, आणि गडबड झालीच तर सांभाळून कसे पुढे जायचे ते देखील सुचवतात. मग हे डोस पण अतिशय महत्वाचे ठरतात, नुसते, किंवा पारंपरिक औषधांसोबत सुद्धा. कारण फक्त गोळ्या घेऊन चालत नाहीच, वरच्या मजल्यावर तश्या हालचाली होणे, विचार होणे, कृती होणे अत्यावश्यक आहेच. त्यामुळे मला लाभलेल्या अश्या योग्य डॉक्टर्स ना साष्टांग नमन. तुमचे मार्गदर्शन असेच सातत्याने लाभू द्या, माझे बोट तुम्ही कधीही सोडू नका हि प्रार्थना आणि विनंती सुद्धा. आधी फक्त वैद्य होते, कुटुंबांचे पिढ्यांपिढ्या एकाच डॉक्टर असायचे. त्यामुळे आजीचा बटवा + एकत्र कुटुंब पद्धती, थोरामोठ्यांचे मार्गदर्शन हेच जास्त कमी पडत होते. प्रत्येक घरोघरी सगळं सांभाळून घेतल्यामुळे असेल त्यावेळी कदाचित एखादा दुसरा वैद्य असायचा संपूर्ण गावात. आता गल्लीत दहा आहेत. थोरामोठयांचें ऐका, आधुनिक संतांची शिकवण अंगिकारा, त्यांच्या सानिध्यात राहा आणि फरक अनुभव शारीरिक आणि मानसिक पातळीवर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा