रविवार, १८ ऑगस्ट, २०२४

२००३: खिरीची खरी चव


मी एका खास भ्रमात वावरत होते कि खिरीची चव हि (समजा तांदुळाची खीर) तांदुळाच्या गुणवत्तेवरून, दर्जावरून ठरवता येते. त्यानंतर यौग्य प्रमाणात तांदळाला भिजवले कि पण  चव वृद्धिगत होते. सुकामेवा, विलायची, केशर, दुधाचा दर्जा, दाट होईस्तोवर मस्त आलेली उकळी ह्या सगळ्यांमुळे चार चांद लावते. पण छे हो, आज माझे डोळे उघडले. चार डोळे आहेत, ते देखील बरं का मंडळी.

तर त्याचे असे झाले कि आज मोठ्या प्रमाणावर घरी स्वयंपाक होत होता. चार बर्नरचा गॅस तर सर्वांकडेच असतो आजकाल. तर बाकी तीन बर्नर वर विविध फोडण्या सुरु होत्या आणि चवथ्या बर्नर वर सातत्याने खीर उकळत होती. त्या तीन बर्नरवर भाजीची फोडणी झाली, विविध मसाले फटाफट घातले गेले, मीठ, तिखट, जीरा धने पावडर ई. देखील. कधी खूप वेळ उकळत होती शिवाय. हे सगळं चाललं असतांना कोशिंबीर झाली, कुकर झाला, दोन भाज्या, पंचामृत केले गेले. बहुतांशी सगळ्याच पदार्थात हिरव्या मिरचीचा ठेचा मस्त पैकी टाकण्यात आला फोडणी सुरु असतांना, खूप प्रमाणात कढीपत्ता पण होता घातलेला, आणि पुन्हा एकदा नमूद करते कि चवथ्या गॅस वर खीर सुरूच होती उकळत. मग मला लक्षात आलं कि खरी चव खिरीला कशी येते नेहेमी. काय काय नेमकं त्यात घातलं जातं तेव्हा इतकी व्यवस्थित ती होते. अर्थात करणाऱ्याच्या हातची चव पण आहेच, अनुभव देखील, पण नकळत पडलेले मसाले आणि त्याचं एकंदरीत समीकरण ह्याने ती सरते शेवटी चव येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...