मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४

२००१: उत्तर


श्राद्धाचे जेवण श्रद्धेने, त्या कष्टकऱ्यांसाठी, शेतकरी, स्वयंपाकी, मदतनीस, शेतमाल साफ करणारे, वाहून आणणारे, सांभाळून ठेवणारे, निवडणारे, सूर्य देवासाठी, जमिनीसाठी, वरुण देवासाठी, संपूर्ण आभाळासाठी, पावसाच्या संपूर्ण चक्रासाठी, भूमिगत शेतीमित्रांसाठी, खतासाठी, शेतीत राबणाऱ्यांसाठी, गॅस च्या प्लांट वर काम करणाऱ्यांसाठी, मीठ, तिखट, मसाले ह्यांच्या फॅक्ट्रीत अहोरात्र काम करणाऱ्यांसाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी, जलशुद्धीकरण केंद्रात काम करणाऱ्यांसाठी, गाई म्हशी ज्यांच्यामुळे तूप लाभलं आहे, आणि ते अनेक पदार्थांमध्ये वापरलं गेलंय, अश्या सर्वांसाठी फक्त ते अन्न सेवन करावे माझ्या दृष्टीने. 


नैवेद्याच्या पानात काही ठिकाणी मीठ वाढत नाहीत, का हे मला ठाऊक नाही. पण ऐकिवात आहे. तर माझ्या ऐकीव माहितीनुसार मिठागरात काम करणे अवघड आहे, अर्थात आता खूप नावीन्याने भरपूर मशिन्स आली आहेत. त्या नंतर डावी बाजू जर नेहेमीच्या पद्धतीने पण वाढलं तर. चटण्या: आपल्या दारात वीज आणण्यासाठी ज्याने कष्ट घेतले, मिक्सर तय्यार केला, आपल्याला म्हणजे स्वयंपाक्याला सद्बुद्धी दिली किती वाटायचे, कायकाय घालायचे, त्यांच्यासाठी, कोशिंबिरीच्या सगळ्या जिन्नसांसाठी केलेल्या कष्ट कार्यांसाठी, भात शेती हि खूप कष्टाची, मेहेनतीची, दूध लोणी ताक तूप काढणाऱ्या हातांसाठी, पापडाचे पीठ योग्य प्रमाणात तय्यार करून, ते व्यवस्थित भिजवून, लाटून, सुर्यबाप्पाच्या किंवा मशीनच्या मदतीने सुकवून, तळून चव वृद्धिंगत करणाऱ्यांसाठी. रोजच्या भाज्यांची शेती करणे म्हणजे जिकरीचे काम, त्यात पावसावर भर, अपार कष्ट, कमी मानधन तरी जिकरीचे आपल्या समोर ताट वाढलं जातंय त्या संपूर्ण शेतकरी कुटुंबासाठी, कांडप आणि मसाले फॅक्टरीत काम करणे म्हणजे जबाबदारी आणि चिकित्सक नजर. त्या संपूर्ण चमूसाठी. 


हे सगळं डोक्यात येण्याचे कारण म्हणजे माहिती असतांना, "त्याच्यावर" संपूर्ण श्रद्धा असतांना, असे जेवण सेवन करायचे का? असा प्रश्न अनेकांना पडत असणार, पण कुठलाही पर्याय नाही म्हणून निमूटपणे जेवणे एवढंच ठाऊक आहे. किंवा कोणाला विचारायचे? गुगल बाबा प्रत्येक प्रश्नाचे हवे तेव्हा पट्टाकिनी आणि योग्य उत्तर देईलच असे नाही. त्यांच्यासाठी हा एक साधा, सोप्पा, सरळ, डोक्यात आलेला दृष्टिकोन मांडला एवढंच. 


आणि ह्या वर नमूद केलेले सर्व फक्त ह्या अश्याच खास जेवणाच्या वेळी आठवायचे नाहीत, तर दर वेळी, प्रत्येक पान हातात वाढून आले कि नतमस्तक व्हायचेच, दिवसातून दोन ते तीन वेळा, न चुकता. श्रद्धेने धन्यवाद देऊनच मग संपूर्ण भोजन गोड मानून घ्यायचेच. माझ्या मते असे केल्याने स्वतःला आत्मिक समाधान तर लाभतेच, पण शिवाय तो केलेला नमस्कार पोचतो त्या कष्टकऱ्यांपर्यंत, त्यांना एक वेगळी ऊर्जा मिळते पुढे मार्गक्रमण करायची आणि हि एक छोटीशी शाबासकी असते त्यांना दिलेली. काही देशात प्रथाच आहे कि कमीतकमी २ वर्ष शेती करायचीच लहान वयात, आणि लढाईला जायचे किंवा लष्करात रुजू व्हायचे. हे २ वर्ष केल्यावर तो माणूस घडतो आणि लक्ष केंद्रित करून कामे करतो. 


अगदी मूठभर ठिकाणी तंत्रज्ञान पोचले आहे, बाकी कडे चिखल, माती, ऊन, वारा, पाऊस, मेहेनत, अपार कष्ट आणि कमी मोबदला हेच आहे. म्हणून नम्र विनंती आहे कि त्या सर्व कष्टांना सलाम कराच. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...