रविवार, १८ ऑगस्ट, २०२४

२००४: कर्तव्य, काम, नोकरी


महाराष्ट्रीयन पद्धतीनुसार बहुतांशी ठिकाणी मुली स्वयंपाक घर म्हटले, वाढणे आले कि अग्रगणी असतात, ठेवल्या जातात. हो २०२४ मधे  सुद्धा. मुलं अजूनही मागच्या खुर्चीवर स्थानापन्न आहेत. असो, मुली अगदी सर्व कामे, कर्तव्य  हिरीरीने करतातच. पहिली पंगत सणावारी, किंवा काही दिवस मास असल्यास थोरा मोठ्यांची बसते, म्हणजे  पुरुष मंडळींची. त्या नंतर मग मुलांची पाळी येते. किंवा मागे पुढे, वयोमानानुसार. ते सगळं आटोपलं कि मग घरच्या मुली, स्त्रिया, आया ई. त्यांची बारी येते तोवर ह्या पहिल्या आणि दुसऱ्या पंगतीची वामकुक्षी होत आली असते. म्हणजे पहिल्या दोन पंगतींना वाढा, सकाळपासून कामे, आणि शिवाय स्वतःच स्वःत घेऊन पोटभर जेवा. ते झालं कि पुढची आवराआवरी आलीच अनुशंघाने. आवराआवरी होत नाही तोवर संध्याकाळच्या चहाची वेळ येतेच.

साधा प्रश्न आहे माझ्या पुढ्यात उभा. कि ह्या मुलींना, आयांना कोणी का वाढत नाही? मुलींनी सर्वांना वाढणं जर अपेक्षित आहे, अलिखित नियम आहे तर मग हा असा नियम का नाही, लिखित स्वरूपात यायला हवा. जरं भजे तळून का वाढले जात नाही? पुन्हा एकदा सगळे पदार्थ मस्त गरम करून, विचारून, आग्रह करून का ताटात वाढले जात नाही? शेजारी बसून खाऊ घातले तरी हरकत नाही ना? थोडासा वेळ त्यांना पण द्यावा अधे मधे. काय हरकत आहे गरमागरम पोळ्या करून वाढल्या आणि त्याच वेळा थोडासा  भात लावला आणि पहिल्या वाफेचा पानात वाढला तुपाच्या धारेसहित? दहा हत्तींचे बळ येईल तुमच्याच घरच्या स्त्रियांना, मुलींना, आयांना. तुम्हाला त्यांनी ठणठणीत राहणं नको आहे का? त्यांच्या औषध पाण्यावर तुम्हाला उगाचच खर्च करायला आवडेल का अश्या पद्धतीने त्यांच्या सोबत राहायला नेहेमीकरता? ठरवा पट्टाकिनी तुमचे तुम्हीच. आणि सगळं जग बदलत आहे, प्रत्येक पद्धतीने, कंगोऱ्याने, मग ह्या बाबतीत बदल का घडू नयेत? करून बघा आणि फळं चाखा. मज्जा येईल सर्वांनाच ह्याची खात्री आहे १०० टक्क्यांपेक्षा जास्तच.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...