माझ्या बघण्यात ह्या अर्धशतकी वाटचालीत अनेक पद्धतीचे लोक आले, व्यक्तिमत्व दिसले, अनुभवता आले. काही अत्यंत शिस्तप्रिय, बाकी फारच कडक, आणि बाकी उरलेले सगळंच "चलता-है" असा दृष्टिकोन ठेवणारे. काही थोडक्यात उदाहरण द्यायची झाली तर, उशिरा पोचणे कामावर, रस्त्यावर चुकीच्या दिशेने गाडी चालवणे दिवे लावून, दिलेली कामे अर्धवट करणे किंवा ढकला-ढकली करत करणे, थोडक्यात काय सगळंच "चालतं-हो" असं म्हणणारे. "सगळेच करतात आणि करायला पण हवं नाहीतर आपली किंमत राहात नाहीच" असे काहीसे बोलणारे, वागणारे आणि विचार असलेले. हे मी गेले अनेक वर्ष माझ्या चार डोळ्यांनी बघत आले आहे आणि ह्या सर्वांना ते कसं काय जमतं ह्याचा विचार करून डोक्याचा भुगा करून घेत आहे. असो.
आज सकाळी ह्याच धर्तीवर मला एक विचार सुचला तो येथे मांडते आहे.
काही अहोरात्र चालणाऱ्या नैसर्गिक प्रक्रिया बघुयात, जसे कि पचन संस्था, किडनीचे कार्य, हृदयाची धड धड आणि रक्ताभिसरण, पोटऱ्यांचे कार्य, मेंदूची कामे आणि असे सगळे जे आपल्या शरीराशी निगडित आहेत. आता बाकीचे बघुयात, पृथ्वीचे भ्रमण, सूर्याची किरणे, हवा, गुरुत्वाकर्षण आणि इतर. हि यादी भली मोठी आहे. जर ह्या सातत्याने चाललेल्या कर्मांनी एकदा ठरवलं कि आपण देखील "चालतंय-हो" असं म्हणून बघावं, तर काय होईल?
"कृत्रिम बुद्धिमत्तेवर" अनेक गाड्या, खूप यंत्रणा कार्य करत आहेत, आपण म्हणजे मानवानेच त्यांना शिकवले आहे कि कशी कामे करायची वायूच्या गतीने. त्यांना एक कृतिमरितीने विचार करायला पण शिकवले आहे. त्यांनी पण असेच ठरवले कि एकदा "चालतंय सगळं" असं वागून बघूया तर?
फक्त विचार करा काय होईल? माझ्या मते फक्त अनर्थ, अजून काही नाही, प्रचंड नुकसान. आणि मग दोश द्यायला आहेतच अनेक जण.
हे सगळं टाळता येणं अगदीच शक्य आहे सर्वांना, सहज सोप्प आहे, "पेराल ते उगवेल", हे लक्षात ठेवा. काहीही होणार नाही जर तुम्ही खऱ्या कारणांसाठी कधीतरी उशिरा पोचलात तर, पण चुकीचा मार्ग नको. आधीच थोडे लवकर निघण्याची सवय लावून घ्या. शांत व्हा. आणि आनंदी मस्त मौला प्रत्येक दिवस अनुभवा. "चलता-है" हा शब्द, वाक्यांश आपल्या शब्दकोशातून काढूनच टाका. जमल्यास दुसऱ्यालाही असे करण्यापासून सहज जमल्यास थांबवा. आशा करते कि हे माझे विचार खूप जणांपर्यंत पोचतील. "उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला आहे" / "प्रिव्हेन्शन इज बेटर दयान क्युअर".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा