शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४

१९६७: गट


सध्या पावसाळा सुरु आहे. काही ठिकाणी घनघोर पाऊस, तर कुठे भिरभिर, आणि बाकी ठिकाणी वेगळाच बरसतो आहे तो. आपण सर्व जण शाळेत असतांना विज्ञान विषयात पाउसाबद्दल शिकलो आहे, त्याची एक शिस्त असते, सायकल असते आणि एक मस्त प्रक्रिया देखील. पाणी, ऊन, बाष्प, ढग, पाऊस वगैरे असे काही टप्पे असतात त्यात. प्रत्येक देशात, त्याच्या राज्यात, शहरात, गावात निसर्गाचे एक वेगळे वरदान लाभले असते. त्यात मग काहींना डोंगर दर्या, जंगल, नद्या, समुद्र, असे खूप काही भरभरून मिळालेले असते. ह्या सगळ्या सभोवतालच्या निसर्गामुळे देखील वेगळी वातावरण निर्मिती होते आणि तश्या पद्धतीने पाऊस पडतो, बरोबर कि नाही? ह्या नैसर्गिक वस्तीला तडा गेला कि मग समतोल राखला जात नाही आणि गडबड व्हायला सुरवात होते. 


हे झालं जमिनीवरचं. पण आकाश तर एकच आहे, ढगांची निर्मिती, स्थिती, लय आणि स्वभाव देखील एकच. त्यांचे वास्तव्य पण एकसारखे आणि दिसायला पण अनोखे सारखेच. ह्या सर्व सामान धाग्यांमुळे मग पाऊस देखील एकसमान किंवा अगदी १९-२० इकडेतिकडे पडायला हवा. मग फक्त जमिनीवर काय घडामोडी होत आहेत हा एक भाग आहे, त्याचा ठिकठिकाणी अगदीच वेगळ्या स्वभावाचा पाऊस कसा काय होतो हे मला पडलेले कोडं आहे? किंबहुना मला असं म्हणायचं आहे कि जरी वाऱ्याने ढग इकडून तिकडे जात असतात, त्यांची कायम अशी जागा ठरलेली नसते, काही पिटुकले नवशिखे ढग, तर काही भले मोठे अनुभवी, तर काही आजोबा देखील. हि रचना, बांधणी, मांडणी सारखीच आहे तर मग कोण ठरवतं ढगांचे संघ कसे तय्यार करायचे, कोणी कुठे जायचं, कोणात किती पाणी दडलंय, किती वेळ तेथे वास्तव्य करायचं, कधी परत यायचं, कधी हवेशी संपर्क होणार, ती सुटणार आणि मग ढग पळायला लागणार, हवेशी कोण संपर्क करणार, म्हणजे हवा कोणाचे ऐकणार? मी कलस्टरिंग, क्लासिफिकेशन ई. क्षेत्रात काम करत असल्यामुळे मला हे साधे प्रश्न पडलेत. कि कोणाच्या सांगण्यावरून, किंवा कुठल्या माहितीवरून हे सगळं ठरतं, अमलात आणलं जातं, प्रत्यक्ष घडतं ई. "ढगांशी वारा झुंजला रे, आता तुझी पाळी"...  हे सगळं इतकं गतिमान आहे, चैतन्य असलेले आहे, चलनशक्तिविषयक आहे, डायनॅमिक आहे कि प्रत्येक वेळी, प्रत्येक ऋतूत सगळं चित्र वेगळंच असतं. मला ठाऊक आहे कि ह्यालाच निसर्ग म्हणतात, ह्याला "त्याची" शक्ती म्हणतात, पण विज्ञानाच्या संदर्भानुसार नक्की किती पाण्याचा साठा कुठे अर्पण करायचा, किती वेळ बरसायचं हे गणित, समीकरण कळतंय पण वळत नाहीच मला. इतकं सोप्प नसावं ते. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात म्हणतात तसं मल्टि व्हॅरिएट अनालिसिस ह्या पेक्षा मोठे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...