मी ह्या आधी एका ब्लॉग मधे लिहिल्याप्रमाणे ज्या पद्धतीने होणारी नवरी पांढरा गाऊन घालून बोलावलेल्या मंडळींना दाखवते, ते महत्वाचे ठरते. ती जर स्वतःच जर गोंधळलेली असेल तर बघणारे तिला अजून गोंधळून टाकतात. जर ती स्वतः आत्मविश्वासाने बाहेर आली तर तिला तसे उत्तर मिळते बघणाऱ्यांकडून. कदाचित विद्यार्थ्यांना शिकवतांना सुद्धा हे लागू पडते. किंवा रस्त्यावर गाडी चालवतांना देखील.
आज मला अजून एक असा अनुभव आला कि तेथे सुद्धा हे लागू पडते.
आताशा फॅकल्टी विद्यार्थ्यांशी सोशल मीडिया द्वारे संवाद साधतात. काही प्रश्न असतील, किंवा शंका ते सोशल मीडिया वर विचारणे सोयीचे समजतात. असो. तर विद्यार्थी जेव्हा उगाच काही विचारत असेल, त्या प्रश्ना मधे दम नसेल किंवा फॅकल्टी उत्तर देते वेळी साशंक असेल किंवा तत्सम, तर ते पोचतं. म्हणजे सोशल मीडिया वर काय काय पोचतं तर तुमचा मेसेज नक्कीच पण त्यासोबत तुमचा कॉन्फिडन्स देखील. काय मनात होतं तुमच्या जेव्हा तुम्ही हे उत्तर लिहिलंत? हे देखील पोचतं.
त्यामुळे असं म्हणतात ना, कि जेव्हा तुम्ही रागात असाल तेव्हा प्रत्युत्तर देऊ नये, भांडण वाढतात, अगदी तसेच सगळ्या गोष्टी, मग ते भांडण असो, आपला मुद्दा मांडणे असो, एखाद्या प्रश्नाला उत्तर देणे असो हे शांत डोक्याने करा, आनंदाने करा, घाईत नाही, म्हणजे समोरच्याला उत्तरसोबत समाधान देखील प्राप्त होतं, न कळत.
काय भन्नाट टेकनॉलॉजि आहे ना? छुपी रुस्तम अगदी. अजून काय काय पाठवते आपल्या मेसेज सोबत कोणास ठाऊक? चला तर मग शोधून काढू या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा