सुती कपडेच जास्त प्रमाणात आधी विकत घेतले जायचे आणि तेव्हा खूप जास्त प्रमाणात फॅशन च्या नावाखाली काही बाही उपलब्ध नव्हतेच. सगळ्याच ऋतूत अत्योत्तम म्हणून देखील सुती कपडे घेण्याकडे ओढ असायची. अजून एक कारण म्हणजे सुती कपडे जसे वापरू तसे लवकर जुने दिसतात पण तितकेच मऊ होतात, त्यांना तुमची, तुम्हाला त्यांची सवय होते आणि मग घरी वापरायला सुद्धा काढतात.
सुती किंवा सूत मिश्रित ज्याच्यात त्याचे प्रमाणात जास्त आहे असे कपडे रात्री झोपायच्या वेळी घालणे सगळेच पसंद करतात. आता घरचे आणि बाहेरचे वेगळे कपडे आलेत, खूप प्रमाणात, वेगळ्या ढंगात त्यामुळे मज्जा आहे सर्वांची. घराचे कपडे घरातच राहतात. कमी वेळासाठी घातले जातात, धुवून, वाळवून, पुन्हा घातले जातात. बाहेर जातांनाचे अगदीच वेगळे असल्यामुळे मग हे रात्रीचे कपडे घरीच राहतात, बाहेरची हवा, धूळ, प्रदूषण ई. पासून लांब, दूर. बाहेरच्यांची त्यावर नजर पण पडत नाही. त्यामुळे कधीही बघा, घरातल्या कपड्यात परिधान केल्या केल्या कित्ती वेगळे समाधान वाटते, कारण ते पूर्णतः तुमचेच असतात. बाहेर घालून गेले कि तुमच्या शिवाय ते धुळेंचे घर, प्रदूषणाची वस्ती, काही वेगळ्या नजरा, माती आणि इतर अश्या अनेक गोष्टी सामावलेली होऊन जाते. म्हणून ह्या घरच्या सुती कपड्यांचे महत्व अनन्य साधारण असेच आहे.
आधीच्या काळी बहुतांशी आजी, पणजी, अश्या सगळ्या घरीच असायच्या. त्या फक्त सुती साड्या नेसायच्या. त्यामुळे लहान मुलांना घालायला, अंथरयाला, पांघरायला जुन्या साड्यांचे विविध प्रकार शिवले जायचे. त्यामुळे आज्यांना मस्त वाटायचे आणि नवीन पिढीला आशीर्वाद तर मिळायचाच पण शिवाय मऊपणा, शांतपणा, मस्त, स्वस्थ वाटायचे. लहान कशाला आईच्या साड्यांची गोधडीत जी काही झोप लागते म्हणून सांगू, कशाला सांगतेय मी, सर्वांनीच हा अनुभव / स्वानुभव घेतला असेलच.
अगदी बोटावर मोजता येतील अशा काहींना मात्र घरातले कपडे घालून भाजी आणायला, किंवा अजून काही छोट्या कामांसाठी जायची सवय आहे. ती मोडा आणि फरक अनुभवा.
बाहेरचे कपडे बाहेरच्यांच्या गरजे प्रमाणे घातले जातात, म्हणजे तुमच्या व्यवसायाला शोभेल असे, लागतील असे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या छत्रछायेखाली असता तेव्हा तुम्ही फक्त तुम्हीच असता. त्यामुळे थोडेसे ढगळे, सैलसर, मस्त, स्वस्त, हलकेफुलके, उत्साही, ताजेतवाने घाला, मिरवा आणि राहा.
कळस म्हणजे, वेळ असेल तर, कधी तरी, किंवा वेळ काढून घरचे कपडे स्वतः कामात बदल म्हणून, व्यायाम म्हणून फक्त एक जोडी, जास्त नाही, हाताने धुवून वाळत घाला आणि वाळल्यावर ते परिधान करा. जास्त मज्जा येईल. काय वेगळा स्पर्श असतो, काय ती वेगळी स्वच्छता अनुभवता येते, सगळी अत्याधुनिक मशिन्स झक मारतील तुमच्या हातापुढे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा