रविवार, ११ ऑगस्ट, २०२४

१९९६: योग्य वेळ


मी पुण्याला आल्यापासूनच म्हणजे गेले २० एक वर्ष जेष्ठ नागरीक संस्थेंशी संलग्न आहे, बरेचदा जात-येत असते तेथे. पुण्यात फार प्रचलित आहे आणि तिथे अनेक सुविधा दिल्या जातात, समवयस्क लोक राहतात, घर पण वाढत्या व्हायला साजेसं बांधलं असतं आधी पासूनच. तेथे गुंतवणूक करणारे स्वतः करतात, ते त्यांच्या मर्जीने तिथले वास्तव्य स्वीकार करतात उतार वयात. काही जणं काही कारणांमुळे जेष्ठांना तेथे ठेवतात, काही तरुण वयातच पुढची सोय करतात अश्या ठिकाणी घर घेऊन.  अनेक प्रकारची मंडळी तेथे राहतात. काही मालक म्हणून तर इतर भाडे तत्वावर. 


हे सगळं बघून मग दोन प्रश्न मनात येतात, कुठल्या वयात अश्या ठिकाणी गुंतवणूक करावी? फार आधी, मधल्या वयात किंवा म्हातारपणी? आज एका आजोबांची माझी भेट झाली, एका अशाच प्रकल्पाला भेट द्यायला आम्ही गेलो होतो. ते तिथे आले होते स्वतःसाठी घर विकत घ्यायला. ते दिसण्यावरून तरी ७५ चे तरुण वाटत होते. आणि तो प्रकल्प पूर्ण व्हायला जवळपास ३ वर्ष लागणार आहेत. त्यांच्याशी पण बोलून पुन्हा एकदा हा प्रश्न उभा ठाकला कारण तेच म्हणाले कि कोणास ठाऊक मला येथे राहायला मिळेल कि नाही? ३ वर्ष हा मोठा काळ आहे माझ्यासाठी. ई. 


खूप तरुण मंडळी पण आली होती, त्यांचा मानस मला माहित नाही त्या ठिकाणी यायचा. 


हि अशी ठिकाणं बहुतांशी शहराच्या बाहेरचं सुरु होतात. अर्थात पुण्यासारखे शहर लवकर पसरतं आहे, पण सद्यस्थिती बघून निर्णय घेणं अवघड वाटतं कारण खूप मोठी गुंतवणूक आहे. बाहेर, खूप दूर असल्यामुळे सध्या शहराच्या मानाने कमी किंमत दिसते आहे. 


अजून एक त्यातला भाग म्हणजे कुठल्याही वयात नॉर्मल वातावरणात राहणं योग्य, म्हणजे सगळ्या वयाची माणसे हवीत आजूबाजूला. फक्त एकाच वयोगटातील नको. वसतिगृहात राहतांना कसे आपल्याला ठाऊक असते कि येथे फक्त ४ वर्ष काढायचे आहेत त्यामुळे ते ठीक आहे. पण इथे तसे नाही. त्याचा एक चांगला तरणोपाय सापडला आज मला. आज जो प्रकल्प बघायला आम्ही गेलो होतो तेथे सर्वप्रथम नेहेमीसारखी वसाहत आहे, जेथे तरुण, म्हातारे, कुटुंबीय सगळेच राहतात.  दुसऱ्या टोकाला भल्यामोठ्या प्लॉट्स आणि बंगल्यांची स्कीम येते आहे, म्हणजे तेथे पण सगळ्या वयाची माणसे राहणार आणि मधे आहे जेष्ठ नागरीकांसाठीची सोय, १३ मजली ३ इमारती. त्यामुळे खाली उतरले कि मिळवले, सगळेच आवाज येणार, खूप वर्दळ राहणार नेहेमीसारखी, दुकाने असणार आहेत भविष्यात ई. अपेक्षा खूप आहेत, अंतर सोडलं तर बाकी ठीक आहे, बघू काय होतं पुढे. एकत्र कुटुंब पद्धती नाहीशी झाली आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हे असे सगळे प्रश्न उभे ठाकले सर्वांसमोरच. बाप्पा मार्ग काढून देईल नक्की ह्यातून देखील, ह्याची खात्री आहेच. 


योग्य वय काय, जेष्ठ होण्याची वाट बघायची म्हणजे उशीर का तरुण असतांना घेऊन टाकून घाई करायची लवकर केले म्हणून, का सर्वात उत्तम म्हणजे मनाने नेहेमी तरुण राहून एक दिवस हातात घेऊन पुढील वाटचाल करायची, येईल तो दिवस बेस्ट समजायचा.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...