सतत शिकणारी अशी अनोखी पिढी म्हणजे जे माझ्यामते, कुठे तरी वाचलंय १९६५-१९७५ का १९७०-१९८० च्या दशकात म्हणे जन्माला आले. अगदी फोन नाही ते स्मार्ट फोन हा प्रवास, सगळं हाताने करणारे ते अत्याधुनीक, सायकल ते सूर्य उर्जेवर चालणाऱ्या गाड्या चालवणारी अशी कित्येक उदाहरणे देता येतील. त्यातलाच अजुनक एक, म्हणजे नवीन मणी त्या माळेतला, दुर्लक्षित पण आत्यंतिक महत्वाचा असा. असो.
तर ह्याच पिढीतील असंख्य मुलींनी ठराविक सासू-सून नाते बघितले, अनुभवले आणि निभावले देखील. बऱ्याच सुनांनी त्यांच्या सासू-सासऱ्यांची मनःपूर्वक सेवा केली, अगदी मग त्या गृहिणी असोत नाहीतर खिंड लढणाऱ्या, नोकरी करणाऱ्या असोत. जीवाचे रान करून सगळ्या स्तरावर व्यवस्थित कामे निभावली, सगळं आपल्या अंगावर घेतलं, सणवार ते आधुनिक प्रकार सगळं म्हणजे सगळंच.
पण आता अख्खी पिढी बदलली, वारे वेगळेच वाहू लागलेत. त्यामुळे बहुतांशी मंडळी लग्न नाही अशीच भाषा बोलत आहेत. बरं हो-नाही म्हणत केलंच लग्न तर नक्की जोडीदार कोण येईल हे ठाऊक नाही, खात्री नाही, काही मदत होईल हे देखील माहित नाही. त्यामुळे ह्या सुना ज्यांनी त्यांच्या आधीच्या पिढीचं केलं, त्यांचं सगळं सांभाळलं आणि पुढील पिढीला पण घडवलं त्या जेव्हा थकतील तेव्हा काय?
सोयी आहेत, जेष्ठ नागरीक ह्यांच्या साठी वेगळी घरे आहेत, घरी परिचारिका ठेवता येईल, असे अनेक पर्याय आहेत, म्हणजे अजून नवीन शिकणं आलंच. नवनवीन गोष्टी शिकणं काही सुटत नाहीच, कंटाळा येऊन चालणार नाहीच. एक तरणोपाय आहे, शेवट प्रयन्त ठणठणीत राहण्याचा प्रयत्न करायचा, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्तरावर नेहेमी.
हे नवीन जुन्या नव्याचं सँडविच, छोट्याश्या हातभर दुकानांपासून सुरु झालेलं आकाशाएवढ्या मॉल कडे वळलं, आणि अखंड शिकत राहिलं आज तागायत. काय मुहुर्तावर जन्माला आले सगळे हे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा