बुधवार, १७ जानेवारी, २०२४

शारदीय परिसस्पर्श



शरद म्हणजे एक कृतूचे नाव आणि मराठीतले सर्वांच्या आवडीचे असे नाव. आभाळ मोकळे होऊन एक वेगळ्याच धाटणीतला ऋतू सुरु होतो तो म्हणजे शरद. असंख्य कारणांमुळे जगभरात प्रत्येक ऋतू प्रत्येक वर्षी  त्याचे आपले वेगळे असे काही तरी घेऊन येतोच, मुळचे राखून. मग शरद नावाच्या भव्य अश्या व्यक्तिमत्वाचे पण नकळत अगदी सहज असेच होत असणार, त्यांच्या संपर्कात येणारे, संवाद साधणारे, घडणारे, शिकणारे आणि वैविध्य असे प्रत्येक सजीव. शब्द कोशात ह्या नावाचा अर्थ, अनेक लेखकांनी, विद्वानांनी आणि संख्याशास्त्रकारांनी नमूद केलेले अर्थ खूप काही महती सांगून जातात ह्या नावाची. अद्भुत च आहे सगळं शरदाचे विश्व. 


अश्या नावाच्या एका सुविख्यात, सुप्रसिद्ध, कीर्तिवंत, कीर्तिमंत व्यक्ती बद्दल चार शब्द माझ्या हातून नोंदवले गेले हि एक अप्रतिम सुरवात आहे माझ्या दृष्टीने. सर्वप्रथम एकदा नाही तर दोनदा साहेबांबद्दल अविस्मरणीय असे अनुभव ऐकायला मिळाले, अंगावर काटे आणणारे आणि ते इतके हुबेहूब मांडले माझ्या पुढ्यात कि मला साहेबांना आभासी भेट घडवून आणली. ट्रूली-देसी शी कृणानुबंध आहेत आणि राहणार पण आहेत, अशी लिखाणाची सुरवात वाखाणण्यासारखी आहे, शारदीय परिसस्पर्श लाभलेली. ट्रूली-देसी च्या संपूर्ण चमूला शतशः धन्यवाद. 

रविवार, १४ जानेवारी, २०२४

पळेल / धावेल


माझ्या नागपुरात कोणी जर विचारलं कि "चालेल का?" कुठल्याही बाबतीत तर नेहेमी / बहुतांशी उत्तर येते कि "धावेल हो". इतक्या वर्षांनी देखील मी तीच सौंज्ञा सातत्याने वापरते आणि ज्यांना ठाऊक नाही त्यांना ह्याचा प्रचार प्रसार पण करते. माझ्या नागपूरचे नाव उंच ठेवण्याची जबाबदारी माझी आहे ना, म्हणून. 


आज सीझन १६ आणि एपिसोड १५ मध्ये श्री श्री अमिताभ बच्चनजींनी पण ह्याच संदर्भात सुतवाच्या केलं. आयुष्यात देखील आपण चालत नाही पळतो, सातत्याने. तेव्हा मला माझ्या नागपूरच्या सवयीची आठवण झाली आणि ते कित्ती अत्यावश्यक होतं आणि आहे हे समजलं / उमगलं. धन्यवाद KBC च्या लेखकांना. मी नकळत पळत होते, पळेल / धावेल हे सहजी वापरत होते पण आज त्याचं फक्त महत्व नाही पटलं तर कित्ती पळू शकले हे आठवलं. त्याची माझ्या वर कित्ती पराकोटीची कृपा आहे हे पुन्हा एकदा प्रकर्षाने. ह्या पुढे पण मला खात्री आहे कि तो मला धावण्याला मदत करणारच. प्रत्येक जण आपआपल्या चालीने / सवयीप्रमाणे / क्षमते नुसार च धावतो / धावू शकतो. किंबहुना धावायला पाहिजे. कोणाशी कोणाची कधीही यत्किंचितही तुलना होऊच शकत नाही धावतांना. किती धावायचं हे सुद्धा प्रत्येक डोई बदलतं. 


पुन्हा एकदा मी माझ्या नागपूरच्या, त्याच्या पद्धतीच्या आणि मी जे त्याच्याकडून शिकले त्याच्या प्रेमात पडले. अहाहा च. 

मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

"तो" उद्योग


कशी कुणास ठाऊक पण अनेक वर्षांपासून मला एक नकळत शिस्त लागली आहे. आठवड्यातून एक किंवा दोन दिवशी घरच्या देवांसाठी सुबक सुंदर हार आणायचेच. काही कारणांनी हार नाही मिळाले तर फुलं आणून हार करायचे. इतके गोंडस दिसतात देव, देवघर आणि एक सुगंधित वातावरण निर्मिती होते. त्यांना काही गरज नसते ह्या सगळ्या हार फुलांची आणि सजावटीची पण आपल्याला नक्कीच आहे, घराला एक घरपण मिळत, माझ्या दृष्टीने. सातत्याने हारवाल्यांकडे जाऊन सुद्धा इतक्या वर्षांनी काल एक वेगळा अनुभव आला, मिळाला. हार वाल्याकडे फक्त दोन हार तय्यार होते. मला जास्त हवे होते त्यामुळे ते तय्यार होईस्तोवर मी दुकानात उभी होते आणि पूर्णवेळ त्या उद्योगाचा वेगळाच आस्वाद घेत होते. संपूर्ण सुगंधित असे ते वातावरण होते. देवाला वाहायची फुले वेगळ्या पठडीतले असल्यामुळे अप्रतिम सुगंध दरवळत होता. मी फारच वेगळ्या विश्वात पोचले जणू. मी काही मिनिटात जर इतकी छान अनुभूती घेऊ शकते तर तो उद्योजक तर दररोज हा अनुभव घेत वृद्धिंगत होणारच. अश्या सुगंधी वातावरणात निर्मिती झालेले ते हार मग आपल्या देवघरात "चार चांद" लावणारच. कधीही कंटाळवाणं होऊ देत नसेल तो मंद सुगंध ह्या व्यावसायिकांना. प्रत्येक ऋतूत वेगवेगळी फुले, त्यामुळे हार, गजरे, वेण्या, माळा, तोरणं आणि बाकी सजावट लागेल तशी करतांना अत्यानंद मिळत असेल ह्यात शंकांचं नाही. 


मी आचारी ह्या व्यावसायिकांचे पण जवळून अनेक वर्ष निरीक्षण केले आहे. ते देखील एका वेगळ्या सुवासिक घमघमाटात / सुगंधी वातावरणात काम करतात सतत. अनेकांच्या मते त्या सततच्या अरोमा मुळे भूक मरते, काही खावंसं वाटत नाहीच. जबरदस्ती शरीर नावाचं मशीन चालवण्याकरता तोंडात टाकावं लागतं. आणि सर्वांच्या चवीचं झालं कि नाही हि एक काळजी असते सारखी. 


आमराईत काम करणारे पण फक्त त्या ऋतूत तो एक अनोखा सुगंध अनुभवत जोमाने काम करत असतील. ऋतू संपला तरी देखील त्या अनोख्या सुगंधाच्या आठवणीत आणि वाट बघण्यात, त्या आंब्यांच्या झाडांचे संगोपन करण्यात सहज दिवस सरत असतील. 


अत्तर, उदबत्त्या आणि इतर तत्सम वस्तू तय्यार करणारे पण सतत दरवळत असतील त्यांच्या वागण्या, बोलण्यात, उठण्यात आणि बसण्यात देखील. 


मातीचा एक न्यारा सुगंध. बागकाम करणारे, झाडांची निगा राखणारे तो नेहेमीच मनात आणि आठवणीत साठवून ठेवत असतील, नक्कीच. 


सौंदर्य प्रसाधनगृहात काम करणारे पण वैविध्य क्रीम्स, लेप, फवारे, सुगंधी द्रव्ये, नेलपेंट्स आणि बरेच काही वापर करतांना प्रसन्न प्रचिती येत असणारच. 


बिस्किटे आणि इतर पदार्थ तय्यार करतांना येणार सुवास असे अनेक व्यवसाय मला जाणवले आणि आठवले आज त्या हारवाल्याकडे जाऊन आल्यावर. 

सोमवार, ८ जानेवारी, २०२४

कालाय तस्मिन नमः

 माझी आई खूपच तत्वाने जगली. माझ्यासाठीचं तिचं एक खास तत्व म्हणजे तिने कधीही मला स्वयंपाक शिकवला नाही. ती म्हणायची बघ, चव घे आणि कर. बास. निरीक्षण क्षमता त्यामुळे माझी खूप वाढली. काही महत्वाच्या बाबी अश्या होत्या कि तिचा स्वयंपाक फार साधा असायचा, आणि भाजी शिजण्याकरता किंवा रस्सा करण्याकरता ती भाजीच्या कढईवर एक भांड ठेवायची आणि त्यात पाणी ठेवायची. काही वेळात ते पाणी गरम व्हायचं आपोआप आणि मग तेच पाणी रस्सा होण्यासाठी उपयोगी व्हायचं. पाणी उरलं तर आमटीत घातलं जायचं. कित्ती मस्त सदुपयोग होता तो गॅस / ऊर्जा वाचवण्याचा. अश्या तिच्या सवयीं मुळे वेगळं पाणी तापवण्यासाठी गॅस, भांड लागायचं नाही. किंबहुना माझ्या बघण्यातल्या काही अजून मावशी, काकू, मामी पण त्या काळी अश्याच होत्या. सगळं साधं सोप्पं शिजवलं जायचं, जाणीव होती, छोटी छोटी घरं होती, बहुतांशी एकत्र सगळ्यांचा स्वयंपाक होत असे एकाचवेळी. फ्लॅट्स किंवा विभक्त कुटुंब नव्हती. बहुतांशी सगळ्या घरी आई स्वयंपाक करायची, मावशी / बाई नाही. ह्या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे उपलब्ध असलेल्या गॅस सिलेंडर मध्ये भागायचं, जास्त ताण यायचा नाही व्यवस्थापकांवर, सरकारवर आणि बाकी यंत्रणेवर. आता तसं नाही. कालमानाप्रमाणे सगळंच फारच बदललं. सर्वत्र फ्लॅट्स, खूप कुटुंब, भाडेकरू, नोकरदार वर्ग शहरात आलेला, आणि फ्रिज चा अतोनात उपयोग. गारेगार सगळं शिवायचं म्हणजे जास्त गॅस लागणारच. पाणी गरम हवे असल्यास आणि वेळेअभावी मिक्रोवेव्ह किंवा अजून उपकरणांचा उपयोग. त्यामुळे सगळंच मोठ्या प्रमाणात वापरात आलं, मागणी वाढली, आई सारखं स्वयंपाकातील लक्ष नाही राहिलं. असो. कालाय तस्मिन नमः. आज खूप वर्षांनी मी आईच्या पद्धतीने साधी उसळ केली आणि सगळं चित्रफितीसारखं डोळ्यासमोर उभं ठाकलं.  

रविवार, ७ जानेवारी, २०२४

मुक्तहस्ताकृति


माझ्या लहानपणी समजायला लागल्यापासून मला, माझ्या मैत्रिणींना, शेजारी पाजारी, नातेवाइकांच्यात आणि सर्वत्र मुलीला दररोज कित्येकदा एक वाक्य / सौंज्ञा ऐकावी लागायची, किंबहुना ऐकवली जायची. अगदी सगळेच मुक्तहस्ताने ती ऐकवायचेच. प्रत्येक कृतीला त्या सौंज्ञे शी जोडले जायचेच. "अगं तुला सासरी जायचंय...". त्यामुळे न कळत्या वयापासून त्या अस्तित्वात नसलेल्या सासरची जीवतोडून मेहेनत घेतली जायची. त्या मेहेनतीच्या कक्षा फार फार मोठ्या होत्या. त्यातला एक टप्पा म्हणजे दारातली सुबक सुंदर रांगोळी. आधी ठिपक्यांची मी रांगोळी काढायला लागले आणि त्यात प्रचंड प्रमाणात नैपुण्य प्राप्त झाले, अत्यानंदाने भल्यामोठ्या प्रमाणात त्या काढल्या जायच्या, पुढच्या मागच्या अंगणात, शेजारच्यांच्या आणि मैत्रिणींच्या दारी देखील. एकदम उत्कृष्ट असे ठिपके मांडले जायचे माझ्या हातून, कसे कुणास ठाऊक, कदाचित ती माझ्या इंजिनिअर क्षेत्राची सुरवात असेल. मग अगदी म्हणजे अगदी परिपूर्ण, निखालस, आदर्श, योग्य अश्या बारीक, एकसारख्या रेषा ओढल्या जायच्या, आणि मग ती वाखाणण्यासारखी रंगसंगती. अहाहा च. 


त्यानंतरचे टप्पे म्हणजे संस्कारभारतीची आणि मग दाक्षिणात्य प्रकारची ठिपके विरहित रांगोळी. त्यात पण नैपुण्य प्राप्त झाले नकळत.


आज तशीच एक अप्रतिम रांगोळी साकारली गेली अचानक, ती कशी आणि कधी अवतरली हे कळले देखील नाही. त्यामुळे अगदी मनापासून आनंदाने कृती झाली. एक वेगळं रसायन अनुभले आज. आज माझ्या लेकीचा महाविद्यालयाच्या नवीन सत्राचा पहिला दिवस. म्हटलं काही तरी गोड आणि तिखटातले चमचमीत पोटभरीचे  वेगळे देऊयात. सँडविच करायचा बेत आखला काल. आज ब्रेडची मांडणी केली, त्यावर मग चटणी ने सुरवात होऊन एक एक भाज्या पहुडल्या निवांत. त्यावर मग मीठ, लाल तिखट, काळी मिरी पावडर, चीझ एकावर एक सुबकतेने मांडले गेले आणि महद आश्चर्य, जगावेगळी रांगोळी तय्यार. मग काय प्रत्येक सँडविच साकारते वेळी मांडणी आपोआप बदलली गेली, रंगसंगती वेगळी साधली गेली त्या उपलब्ध जागेत आणि जी काही मज्जा आली म्हणून सांगते, अत्यानंदाच्या पल्याड अशीच. लेकीची रवानगी केल्यावर मी जेव्हा त्या रंगसंगतीचा मनःपूर्वक आस्वाद घेतला तेव्हा प्रकर्षाने जाणवलं कि एक अनोखा मसाला नक्की घातला गेला आहे आज आपसूक. क्या बात है. 

शुक्रवार, ५ जानेवारी, २०२४

"अवघा रंग एक झाला..."


अगदी असं काहीस झालं मला आज, अचानक आणि स्वर्ग फक्त चार बोटे दूर आहे असं जाणवून गेलं. माझ्या सारख्या अनुकथा मांडणारीला एक भला मोठा पुष्पगुच्छ देण्यात आला. खूप सुखद अनुभव होता, आश्चर्य आणि सरप्राईझ देऊन गेला. इतक्या पट्टाकिनी एकटा अनोखा सुगंध देणारा तो पुष्प गुच्छ अप्रतिम आहे. वैविध्य टपोरे देशी गुलाब आहेत, किंबहुना त्या भल्यामोठ्या आकाराच्या गुलाब फुलांच्या कळ्या आहेत, शिवाय पांढरी निळी फुले आहेत, हिरवीगार पाने आणि मस्त विणलेली बास्केट ज्यात हे सगळं सुबकतेने मांडले आहे. "चेरी ऑन केक" म्हणजे ह्या पुष्प गुच्छात अनेकविध छटांनी बहरलेली आकाशी निळसर फुले आहेत, जिच्या तळातल्या मोठ्या पाकळ्या पांढऱ्या शुभ्र आहेत. पाहताक्षणी मोहून टाकेल असा तो. नीट निरीक्षण केलं माझ्या चार डोळ्यांनी तेव्हा उमगलं कि तो पुष्पगुच्छ तय्यार करणारा नक्की एक अवलिया आहे कारण त्याने अधले-मधले काही फुलं मूळची पांढरी राखून बाकीच्यांवर निळ्या रंगाची बौछार केली आहे. "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण" अशी माझी अवस्था झाली ती एकंदरीत मांडणी बघून. अहाहा च. इतके माझ्या साठी,वा च. जणू काही त्याला समजले कि मी येणार, माझे स्वागत वरिष्ठांच्या हातून होणार आणि माझ्या हाती रंगांची + अनुभवनाची बरसात होणार. क्या बात है. 


सगळ्या जेष्ठ शिक्षकांनी, अधिकाऱ्यांनी, विभाग प्रमुखांनी त्यांचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल शतशः धन्यवाद सर्वांना. सगळ्यांच्या उपस्थितीमुळे, आणि थोडक्यात केलेल्या चर्चेमुळे मला जणूकाही गोष्टीरूप गुच्छ अनुभवायला मिळाला, "अवघा रंग एक झाला..." असे झाले. 


मंगळवार, २ जानेवारी, २०२४

"वादनिकवळ घेता..."

 महाराष्ट्राची एक परंपरा आहे कि नकळत जेवणाचे ताट समोर आले कि "वादनिकावळ घेता..." म्हटलं जाताच. श्री समर्थ रामदास स्वामींनी अनेक वर्षांपूर्वी लिहिलेला / विणलेला एक श्लोक आहे हा, महत्व पूर्ण असा. 


माझ्या मुलांना त्यांच्या शाळेत ह्याच मतितार्थाचा इंग्लिश मध्ये आधुनिक श्लोक शिकवला होता.


आमच्या कचेरीचा एक नवीन भाग म्हणून एक संस्था स्थापन झाली होती तेव्हा एक जगविख्यात खानसामा / शेफ आले होते आणि त्यांनी खूप सुंदर समजावून सांगितले. पहिल्यांदा पानाकडे / अन्नाकडे बघून लोक जेवतात, मग त्या पदार्थांचा सुंगधामुळे, मग खाऊन आणि तृप्त होऊन. 


माझे बाबा नेहेमी मला सांगायचे जेव्हा माझी स्वयंपाक घरात सुरवात होती कि माझ्या पदार्थांमध्ये एक मसाला नाही आहे. आणि तो फारच महत्वाचा घटक आहे. आईच्या हातची चव माझ्या पदार्थांना का येत नाही तेच जिन्नस वापरून असं विचारलं तेव्हा ते म्हणाले आईची माया, तो पदार्थ ग्रहण करून माझ्या कुटुंबाला स्वास्थ्य लाभावे हे जेव्हा सामवेल पदार्थ मध्ये तेव्हा खरी चव येईल.


अनेक आधुनिक गुरु सातत्याने सांगतात कि बाहेरच अन्न  सेवन करणं टाळा शक्यतो, कारण त्यात काय काय मसाले मिसळले आहेत कोणास ठाऊक आणि ते त्रास दायक ठरू शकतात. जो ते ऑर्डर केलेले पदार्थ करत असतो, वाढप्याला बरं नसेल, भूक लागली असेल, त्रागा होत असेल तर ते सगळं आपण पैसे देऊन विकत घेतो. कशासाठी? 


हे सगळे जण जे पोटतिडकीने सांगत आहेत ते कित्ती महत्वाचे आहे हे बघा. जेव्हा आपण जे काही सेवन करतो ते फक्त अन्न नसतं तर त्या सोबत अनेक मसाले पण पोटात जातात, ते भावनिक स्वरूपाचे पण असू शकतात किंबहुना असतातच. तेव्हा कुठलाही अनावश्यक विचार मनात आला कि "नाम घ्या श्री हरीचे". म्हणजे ते सेवन करू नका. त्याचा परिणाम नको. उगाच तसलं इनपुट नकोच. टाळा. श्री हरी आवडत, पटत नसेल तर घडलेले चांगले प्रसंग आठवा, उत्कृष्ट प्रसंग, आठवणी, ई. म्हणजे पण मस्त आणि चांगला परिणाम होईल. बघा एकदा आजमावून. कित्ती पिढ्यांआधी श्री समर्थांना ह्याची जाणीव झाली होती म्हणून त्यांनी हा पंक्ती प्रपंच केला, शाळेने, पालकांनी तेव्हा तो श्लोक म्हणायची चांगली सवय लावली त्याची महती पटवून सांगितली आणि त्याचा फायदा सदृश्य आहे अनेक स्वरूपात.  

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...