सोमवार, २१ एप्रिल, २०२५

ध्यानाच्या लहरी: सामूहिक कल्याणाचा मार्ग


मी गुरुवर्यांकडून, श्रेष्ठ आणि ज्येष्ठ साधकांकडून आणि संशोधकांकडून असे ऐकले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती विशिष्ट तास किंवा दिवस सातत्याने ध्यान, जप, मंत्रोच्चार किंवा पठण करते, तेव्हा त्याचे सकारात्मक तरंग अनेक सजीवांपर्यंत पोहोचतात आणि ते सर्वांसाठीच उपयुक्त ठरते. मला खात्री आहे की 'सजीव' या शब्दांमध्ये प्राणी, पक्षी, झाडे, फुले, वेली, फळे, भाज्या आणि पिकाऊ जमीन या सर्वांचा समावेश होतो. "वसुधैव कुटुंबकम्" या उक्तीप्रमाणेच, सर्व सजीव एकमेकांच्या साथीने प्रगती करतात. याचा अर्थ रामनामाचा, जपाचा आणि मंत्रोच्चारांचा महिमा खूप मोठा आहे. काही संशोधक तर या सकारात्मक लहरी सुमारे बत्तीस हजार लोकांपर्यंत पोहोचू शकतात असे आकडेवारीसह सांगतात. कदाचित याच कारणामुळे पूर्वीच्या लोकांना या गोष्टीची माहिती असल्यामुळे ते होम-हवन आणि इतर पूजा-अर्चा मंदिराच्या किंवा घराच्या प्रांगणात करत असत, जेणेकरून त्याचे लाभ शक्य तितक्या लवकर सर्वांपर्यंत पोहोचतील.

आज आपण आधुनिक जीवनशैली स्वीकारली असली तरी, प्रत्येकाने नित्यनियमाने एक माळ जप, मानसपूजा किंवा स्तोत्र पठण यांसारखे उपक्रम करायला हवेत. हे केवळ काही ठराविक लोकांसाठी किंवा समुदायांसाठी नाही, तर आपल्या स्वतःसाठी आणि वातावरणाच्या शुद्धतेसाठी तसेच सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे.

माझी आई ताक, खीर किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ बनवताना आणि रवी फिरवताना सतत "राधा कृष्ण गोपाळ कृष्ण" असे म्हणायची. ते पाहून नकळतपणे आम्हालाही ती सवय लागली. आता तर वरण बनवतानासुद्धा सहजपणे कृष्णाचे नाव घेतले जाते. लहानपणी सकाळी उठल्याबरोबर जात्यावरच्या ओव्या, "कराग्रे वसते लक्ष्मी...", भूपाळी आणि त्यानंतर तुळस पूजन व्हायचे, मग देवाची पूजा आणि मग हे गोपाळ कृष्णाचे नामस्मरण. नैवेद्य दाखवताना मंत्रोच्चार आणि जेवायला बसताना "वदनिकवळ घेता..." म्हणजे प्रत्येक कृतीमध्ये त्याचे स्मरण होत असे. मुलांची नावे घेतानाही त्याचे नाव मुखात येत असे. विविध माध्यमातून, प्रत्येक सणाला आणि व्रतवैकल्यांना घरोघरी प्रत्येकाकडून नाम घेतले जायचे. आता धावपळीच्या जीवनात हे सर्व मागे पडले असले तरी, जमेल तसे आणि जमेल तेव्हा याचा प्रयत्न नक्की करावा.

ब्रह्मकुमारी आश्रमाने सांगितल्याप्रमाणे, दर तासानंतर  एक मिनिट डोळे मिटून शांत बसण्याचा आणि बाहेरची हिरवळ पाहण्याचा नियम ठेवा. मीटिंगमध्ये असाल तरी पुढील तासाच्या कामासाठी हा छोटा ब्रेक खूप महत्त्वाचा आहे. शक्य असल्यास या वेळेत प्रार्थना करा, स्वतःशीConnect व्हा आणि 'त्याच्याशी' एकरूप होण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या शेवटी, रविवारी काही क्षण आपल्या पृथ्वी मातेसाठी आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी नक्की द्या. दोन हस्तक आणि एक मस्तक पुरेसे आहेत; कुठेही आणि कधीही नामस्मरण करा, पण एक निश्चित ठिकाण आणि वेळ पाळा आणि सकारात्मक लहरी निर्माण करा.

२१८०: तरंग


मी असं ऐकलं आहे गुरुवर्यांकडून, श्रेष्ठ आणि जेष्ठ साधकांकडून आणि अर्थातच संशोधकांकडून कि एका व्यक्तीने काही खास तास, किंवा दिवस सातत्याने ध्यान केले, जप केला, मंत्रोच्चार केले, मंत्रांचे उच्चार केले, पठण केले तर ते अनेक सजीवांपर्यंत पोचतं, सर्वांनाच उपयोगी पडतं. मला खात्री आहे कि सजीव म्हणजे सगळेच, प्राणी, पक्षी, झाडं, फुलं, वेली, फळं, भाज्या, पिकाऊ जमीन ई. असणारच. "वसुधैव कुटुम्बकम्" प्रमाणे सगळेच सर्वांच्या साथीने पुढे मार्गस्थ होतात. म्हणजे बघा तो रामनामाचा, जपाचा, मंत्रोचारांचा महिमा, अगाध आहे. काही संशोधक तर आकड्यात मांडतात कि बत्तीस हजार जणांना त्या लहरी, तरंग पोचतात.  कदाचित हे आधीच्या लोकांना माहिती असल्यामुळे होमहवन आणि बाकी पूजा अर्चा ह्या मंदिराच्या किंवा घराच्या प्रांगणात होत होत्या, म्हणजे अधिकच लवकर त्या सर्वांपर्यंत पोचतील. 


जरी आता आपण सर्वच अत्याधुनिक जीवन शैली अंगिकारली असेल तरी देखील दररोज न चुकता एक माळ, मानसपूजा, स्तोत्र पठण असे उपक्रम करावेत, सर्वांनीच, काही थोड्या लोकांनी किंवा समुदायांनी नाही. फक्त आपल्यासाठी नाही, आपण करू शकतो म्हणून, सर्वांसाठी, वातावरणशुद्धी साठी, वातावरण निर्मिती साठी निश्चित करावे. 


माझी आई ताक करतांना, खीर किंवा कुठलेही दुधाचे पदार्थ करतांना, घुसळतांना, रवी वापरतांना "राधा कृष्ण गोपाळ कृष्ण" असे सतत म्हणत असायची. ते फक्त बघून आपोआप ती सवय आम्हाला लागलीच, न कळत. आता तर वरण सारखे करतांना सुद्धा सहज मुखातून कृष्णाचे नाव घेतले जातेच. अगदी आधी सकाळी उठल्याउठल्या जात्याच्या ओवी म्हणायच्या, "कराग्रे वसते लक्ष्मी...", भूपाळी, त्या नंतर तुळस पूजन होत असे, मग देवाची पूजा, त्या नंतर असे हे गोपाळ कृष्णाचे नाव, नैवैद्य दाखवतांना मंत्रोच्चार, पानावर बसतांना "वदनिकवळ घेता...", म्हणजे प्रत्येक वेळी त्याचे नामस्मरण होत असे. मुलांची नावे उचारतांना पण त्याचे नाम मुखी येत असे. विविध माध्यमातून, प्रत्येक सणाला, व्रतवैकल्यांना घरोघरी नाम घेतले जायचेच, प्रत्येकाकडून. आता प्रवाहपतित झाल्यामुळे हे सगळं जरी मागे पडलं असलं तरी जमेल तसे, जमेल तेव्हा प्रयत्न कराच. ब्रह्मकुमारी आश्रमाने म्हटल्याप्रमाणे प्रत्येक एक तासाने एक मिनिटाचा अवधी हा डोळे बंद करण्याचा ठेवा, बाहेर हिरवळ बघण्यासाठी राखून ठेवा, मिटिंग सुरु असली तरी, पुढील तासात काय साध्य करायचं आहे त्या साठी हा पिटुकला ब्रेक अत्यावश्यक आहे, हवं असल्यास प्रार्थना करा ह्या वेळेत, स्वतःशी कनेक्ट व्हा, "त्याच्याशी" होण्याचा प्रयत्न करा, आठवड्याच्या शेवटी रविवारी हमखास काही क्षण आपल्या धरणीमाते साठी, आपल्या पुढील पिढ्यांसाठी नक्की वापरा. दोन हस्तक एक मस्तक पुरेसे आहे, कुठेही कधीही तर कराच नामस्मरण, पण एक ठिकाण, एक वेळ पाळा आणि तरंग निर्माण करा. 

मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

२१७३: जगावेगळा सुगंध


मी दररोज हा सुगंध अनुभवतेच पण आज खास काही विशेष जाणवलं. दिवसभर उन्हाने माती कोरडी होते, कुंडीतली झाडे कोमेजू नये म्हणून दररोज सकाळी मी त्यांना पाणी घालण्याच्या निमित्याने त्यांच्याशी संवाद साधते, गप्पा मारते, कृतज्ञ होते आणि सुगंध अनुभवते. मोगरा भरभरून आला आहे बाल्कनीत, कन्हेरी पण बहरली आहेच, तुळस तर विचारू नकाच आणि ह्या शिवाय तो अत्यंत प्रिय, वेगळा, हवाहवासा असणारा मातीचा सुगंध, दिवस बहरून, फुलून असा सुरु होतो. माझ्या ओळखीच्या काही संशोधकांनी हाच मातीचा सुगंध त्यांच्या प्रयोगशाळेत निर्माण केला आहे आणि ते त्याचा उपयोग अनेक वेळा करतात. जेव्हा जेव्हा त्यांना असं दिसून येतं कि प्रयोगशाळेत खूप तास काम करून सगळे दमलेत तेव्हा त्यांना ताज तवाने करण्याचे काम हा मानव-निर्मित मातीचा सुगंध करतो.  काही क्षण ते लॅबोरेटरीत मातीचा सुगंध फवारल्यासारखा करतात, न विचारता, अचानक आणि मग सगळेच त्याचा आनंद घेतात. 


बाकी बऱ्याच ठिकाणी हा असा सुगंध असलेले रूम फ्रेशनर्स मिळतात हल्ली. मी असं ऐकलं आहे कि ह्या अश्या अनोख्या सुगंधाचा पर्फुम / अत्तर पण तय्यार केलं आहे कोणीतरी आणि ते वापरात पण आहे म्हणे. जेव्हा अश्या प्रकारचे पर्फुम किंवा रूम फ्रेशनर्स तय्यार करतात तेव्हा माणसाच्या कातडीला अपाय होऊ नये म्हणून खूप काळजी घेतली जाते, किंवा जर कोणी कपड्यावर त्याचा प्रयोग केला तर डाग पडू नये म्हणून तसा फॉर्मुला वापरला जातो. 


मग सहज माझ्या मनात विचार आला, हा मातीचा अप्रतिम असा सुगंध नक्की आहे कोणा साठी? फक्त माणसांसाठी, त्यांना पुढील कामात ऊर्जा मिळावी म्हणून, का हि एक फक्त नैसर्गिक प्रक्रिया आहे?


त्याच उत्कृष्ट अश्या सुगंधानेच माझ्याशी संवाद साधत मला उत्तर दिले देखील. तो म्हणाला आणि मला समजलं कि हा सुगंध फक्त माणसासाठी नसून तो झाडांसाठी आहे, मुळांसाठी, फळं - पानं - फुलं - पक्षी - जमिनीखालचे कीटक / प्राणी ई. साठी पण आहे हो. सर्वांनाच ऊर्जेची, कामे / दैनंदिनी पुढे नेण्याची गरज असते. त्यामुळे हा मातीचा दरवळ खूप जणांसाठी निर्माण केला आहे. मला सर्व कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन करणाऱ्या सर्वांना आणि लॅब मध्ये देखील काम करणाऱ्या सर्वांना अशी विनंती आहे कि ह्या मुळांसाठी, फळं - पानं - फुलं - पक्षी - जमिनीखालचे कीटक / प्राणी ई. साठी पण असा एक पर्फुम / फ्रेशनर शोधून काढा म्हणजे अधेमधे तो झाडांवर किंवा मातीवर फवारता येईल आणि अवतीभोवती सर्वांनाच त्याचा लाभ होईल. जशी म्युसिक थेरपी चा वापर सर्रास करतात मुळांसाठी, फळं - पानं - फुलं - पक्षी - जमिनीखालचे कीटक / प्राणी ई. साठी, तसाच ह्याचा पण करावा पण योग्य असा. फळं - फुलं ह्यांचे उत्पन्न वाढवण्याकरता नाही.  त्यांना प्रफुल्लित वाटण्यासाठी फक्त. पण तो फॉर्मुला पानांवर, फांद्यांवर सहज सोप्पा असावा, इजा न करता आनंद घेता यावा असा. 


तिन्ही पातळीवर असणाऱ्या सर्वांना लाभ होण्यासाठी काय सुंदर नैसर्गिक प्रक्रिया साधली आहे आणि कुठलीही अपेक्षा न करता ते तो सुगंध सर्वांना देत राहतात, जमिनीच्या खाली, झाडांना  आणि माणसांना (लहान, थोर,  मोठे, गरीब, श्रीमंत सर्वांना), आणि त्यावर  फळं - पानं - फुलं - पक्षी ई. ना पण. क्या बात है? "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण". 

रविवार, ६ एप्रिल, २०२५

२१७३: संवादिनी


"असे कसे बोलायचे न बोलता आता..." हे एक मराठी सिरीयल चे शीर्षक गीत आहे. "शब्देविण संवाद" हि पण सौंज्ञा आपल्याला ठाऊक आहेच आणि "इशारो इशारो मे ..." हे देखील अनेक जणांनी अनुभवलं असेलच, मग तो शिक्षक-विद्यार्थी ह्यांच्यातील संवाद असो, नाहीतर आई-मुलांचा, नवरा-बायकोचा असे अनेक आहेतच. ह्या शिवाय एखादा निरोप, मेसेज, फोन, पत्र, भेट, प्रसंग खूप काही सांगून, शिकवून आणि बोलून जातोच. शब्दच हवेत असे मुळीच नाही. शब्दांच्या पल्याड एक जग आहे, भलं मोठं. त्या जगातील एक मोती मला सापडला काल अचानक. तिचे नाव सौ. दिप्ती कुलकर्णी. मंत्रमुग्ध करणारा असा कार्यक्रम तिने सादर केला. तिच्या हातात जादू आहे हे फारच छोटे वाक्य आहे दिप्ती करता. कमाल आहे तिच्या कलेची. हार्मोनियम ला संवादिनी असे का म्हणतात हे खऱ्या अर्थाने पटवून दिले तिने काल. अक्षरशः शब्द बोलके केले तिने तिच्या पेटीच्या वाजवण्यातून. कित्येक प्रकार, असंख्य राग, गाणी, भजनं सादर केली एका कार्यक्रमात.  सगळं अद्भुत आणि प्रचंड आशिर्वादात्मक असाच होता तो अनुभव. इतक्या कमी वयात इतकी उंची गाठणं म्हणजे ह्या जगा पलिकडचेच आहे ह्यात वादच नाही.  लोकल-टू-ग्लोबल असा प्रचंड विस्तार आहे तिच्या कार्यक्रमाचा. अनेक देशात, भारतात विविध ठिकाणी भरगच्च कार्यक्रम सादर केलेत. काल प्रभू श्री रामचंद्रांच्या समोर, तुळशीबागेतल्या मंदिरात होते सादरीकरण. आणि अयोध्येत एक नाही, दोन नाही तर तीनदा आमंत्रण आले आणि तिने सादर केले, प्रत्यक्ष प्रभूंच्या जन्मभूमीत. अजून काय हवंय?


फक्त संवादिनी मार्फत जवळपास २ तास सलग दर्दी प्रेक्षकांना खिळवून ठेवून संवाद साधता येतो, त्यांच्या पर्यंत शब्दांशिवाय, बोलांशिवाय पोचता येतं ह्याचे प्रात्यक्षिक दिले दिप्तीने. माझ्याकडे तिच्या बद्दल सांगण्यासाठी शब्दच नाहीत कारण ती कधीच शब्द वापरात नाहीच, पण संवाद लक्षात राहील असे खूप काही देऊन जाते.  तिची पेटीशी इतकी जबरदस्त नाळ जुळली आहे कि ती एक तर डोळे मिटून वाजवते, किंवा प्रेक्षकांशी संवाद साधते, त्यांनी तिच्या सोबत गायलेले बघून आनंद उपभोगतो. एका मागून एक विविध गाणी, भजन, राग वाजवायचे, शिवाय साथीदारांशी सतत संवाद साधायचा हे सोप्प नाहीच. 


माझ्या मते संवाद हा दोन प्रेम करणाऱ्यांमध्ये, दोन सहृदयी माणसांमधे, दोन बंधनात असणाऱ्यांमधे, दोन नात्यात असणाऱ्यांमधे घडतांना दिसतो सहसा. पण असा अनोखा संवाद मी प्रथमच अनुभवाला, जो संवादिनी च्या मार्फत दीप्ती आणि प्रेक्षकांमधें होत होता, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही, शिवाय सगळ्या साथीदारांसोबत, सूत्रसंचालकासोबत, आणि इतर असे अनेक.  ध्यानस्थ अवस्था गाठणे, अत्यानंद होणे, "सुख म्हणजे नक्की काय असतं" हे नेमकं समजणे असं काहीसं मला जाणवलं काल दिप्तीच्या कार्यक्रमातून. 


तिला लाभलेला प्रभू रामचंद्रांचा भरभरून आशीर्वाद बघून, अनुभवून थक्क व्हायला झालं. तिच्या हातून असे असंख्य अजून कार्यक्रम होवोत, अनेक जणांशी तिला संवाद साधता येवो हि प्रार्थना.   

https://www.youtube.com/watch?v=clslG3VcB4Q


बुधवार, १९ मार्च, २०२५

2159: A Tale of My Friend – A Life Less Ordinary


She shared her journey in her own words and gave me full permission to document it.


-The presence of a giant, uniquely different, never-seen-before dog in the OT, locked inside with the head nurse, on the day of my birth.

-A fleet of vehicles and multiple drivers awaiting to take me on rides almost every day—being the only daughter of a father in a prestigious, high-ranking position.

-From giant quarters to an opulent bungalow, my early years were spent in abundance.

-An extensive network of connections—friends, teachers, professors—the list is truly endless.

-Post-marriage, admission to an international university with fully sponsored education, high-end facilities, and comprehensive health insurance coverage.

-My children were born in one of the world's best hospitals, where the room I was allotted was larger than my home in India.

-In the eighth month of pregnancy, due to complications, I survived—along with my babies—on just an ice cube per day, in one of the most advanced medical setups, more than a miracle

-I drove automatic vehicles of top global brands years before they became a reality in India.

-Countless international tours, working in esteemed global organizations, and then suddenly, an unexpected phase—bedridden for almost five months. But I bounced back, even if on a smaller scale.

-Now, flourishing independently—managing doctor visits, medical checkups, and finances all on my own. Due to major health issues, I cannot settle for anything less than a cab. It’s fascinating to see the completion of a cycle within a single lifetime—starting with multiple drivers in my early years and now ending with chauffeur-driven vehicles for every journey, even within the city.

Isn't this a life fit for a king? A truly blessed king...Who gets to lead such a journey? I am the king of my own destiny, living each day as it unfolds—differently, uniquely, and with gratitude. I am truly blessed to have this extraordinary life.

२१५६: दिवस / काळ


मी शास्त्रीय संगीतात निपुण नाही, ऐकायला, त्याचा आनंद घ्यायला आणि गायकाचे कौतुक करायला मात्र प्रचंड आवडतं मला. पण बोल सुरु व्हायच्या आत बऱ्याच लांबी, रुंदी आणि उंचीच्या आलाप, ताना, सरगम असं काहीसं हि गायक मंडळी का घेतात हे मला आज उमगलं.

मी प्रसूती तज्ज्ञ नाही पण नऊ महिने नऊ दिवस फक्त अनुभवले आहेत. हाच कालावधी का हे मात्र गुपित ना कधी कळले ना कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला कारण त्याची गरज भासली नाही, असचं असतं एवढं ठाऊक होतं आणि ते पुरेसं होतं. पण त्याचं देखील रहस्य आज चार डोळ्यांनी बघितले जणू. 

थोडासा अनुभव पाठिशी आला, पंखात बळ आलं, एका नोकरी नंतर दुसरीत रुजू व्हायच्या आधी तो तीन महिन्यांचा काळ का? हा देखील माझ्यासाठी एक यक्ष प्रश्नच होता.  पण त्या मागचं इंगित स्पष्ट झालं.  

"झट मंगनी पट ब्याह" हे फार कमी लोकांच्या बाबतीत घडतं. बहुतांशी साखरपुडा-साक्षगंध आणि लग्न-घटिका ह्या मधला सुवर्णकाळ मोठ्या प्रमाणावर  अनुभवतात. "दिवस तुझे हे झुलायचे झोपाळ्यावाचून...." ह्याची प्रचिती घेणे का अत्यावश्यक आहे हे देखील समजलं आज. 

माझ्यामते वर नमूद केलेले उदाहरणं स्व ची तय्यारी करण्यासाठी आहे, अर्थात शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक, सामाजिक ई. हो, स्व शिवाय आजूबाजूच्या संपर्कातल्या इतर जणांना पण सवय व्हायला हवी त्या बदलाची. नवीन बाळ येणार म्हणजे घरातल्या मोठ्यांवर पूर्णपणे अवलंबून असलेलं एक व्यक्तिमत्व सांभाळायचं आहे, त्या नवीन कोऱ्या आई मधे झालेल्या बदलासहित तिला जोपासायचे आहे ई. दर्शवणारा तो काळ असतो. अर्थात मनुष्याच्या बाळाची निर्मिती करण्याकरता नैसर्गिक लागणारा तो कालावधी आहेच. माझ्या बघण्यात, वाचण्यात, आणि ऐकण्यात आलेली सर्वच उदाहरणं काही वेगळंच दर्शवतात. असं होतं नाही प्रत्यक्षात. चित्र वेगळंच दिसतं. नाही कोणी ह्या कालावधीचा हवा तास उपयोग करून घेत. आउट लायर्स असतात. 

गाणं सुरु व्हायच्या आधी घेतलेल्या ताना गळा तय्यार करतो, समा बांधण्यासाठी मदत करतो, वातावरण निर्मिती करतो, म्हणजे गायक, वादक आणि श्रोत्यांची एकत्र बांधणी करून मग गाण्याला सुरवात होते, म्हणजे मग त्या शब्दांशी एकरूप होता येतं. कवीने, गीतकाराने काय संबोधले आहे हे स्पष्ट होतं, त्यातून शिकता येतं, एखाद्या प्रश्नाचं उत्तर देखील मिळतं. काही मूठभर लोकांना हा गाण्याआधीचा काळ आवडत नाही. असो. 

एका नोकरीच्या ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर करणे सोप्पे जावे, स्व, त्या कंपन्या आणि आजूबाजूच्या इतरांना म्हणून दिलेला तो अवधी असतो. इतकं सहज नाही घडत ते, कि आज एका ठिकाणची नोकरी सोडून लगेच उद्या दुसरीकडे रुजू होणे. प्रवासाचे अंतर, कामाचे बदलेले स्वरूप, एकत्र काम करणाऱ्यांची मानसिकता, आणि इतर अनेक मुद्दे असतात. प्रत्येक सुवर्णकाळ अनुभवा, जगा, जगू द्या, "त्याचा" मूळ उद्देश नजरेआड करू नका. 

रविवार, १६ मार्च, २०२५

२१५४: जिवलगा


मी जेव्हा स्वेच्छा सेवानिवृत्ती घेण्याचे ठरवले तेव्हा सर्वांचा एकच प्रश्न होता, कि मी आता पुढे काय करणार? आणि तो मला सतत विचारला जायचा, अजूनही विचारतात. माझे उत्तर एकच, मला थोडसं काम करायला आवडेल, म्हणजे अर्धवेळ, गरजेनुसार आणि त्या नंतर घरी राहायला मज्जा येईल. जे घर माझं आहे, पाहिलं स्वतःचं असं घर, ज्याने प्रामुख्याने मला धीर दिला, छत दिलं आणि संरक्षण देखील अश्या घरात नोकरीमुळे मी राहूच शकले नाही पूर्णवेळ, किंवा घरासोबत वेळ घालवणं हे झालंच नाही. फक्त घाई, गडबड, घडाळ्याच्या काट्यावर पळापळ आणि अंग टेकायला काय ते घर, बास. त्यामुळे मला आवडतं घरी राहायला जे मी कधीच राहिले नाही, माझं अस्तित्व जाणवेल इतका वेळ नाही घालवला त्यात. स्वच्छता करणे स्वतः, भिंती, छत, जमीन, फर्निचर सोबत भरपूर वेळ घालवून त्याला त्याचं महत्व कधीच जाणवून दिले नाही. नेहेमी खो देत राहिले. 


पण गेली दिड वर्षे आम्हाला दोघांना प्रचंड मज्जा येते आहे. खूप वेळ आहोत आम्ही एकमेकांसोबत. ती साथ आता काहीशी दृढ होतेय. दोघांना मस्त वाटतंय, कधीही न अनुभवलेलं असं काहीसं. मी घरी बहुतांशी वेळ वास्तव्याला असल्यामुळे माझा वावर प्रत्येक खोलीत आहे. स्वतःच्या हस्ते स्वयंपाक होतोय, तो देखील मस्त गाणे किंवा भजनं वगैरे लावून. मग जरा जास्त स्वच्छता राखली जाते आहे कारण वेळ आहे हातात म्हणून. प्रत्येक खोलीकडे लक्ष आहे, अगदी शुल्लक कामं वगळता सगळीच मी हातात घेतली आहेत त्यामुळे अजून मज्जा येतेय, कृतज्ञता वाढली आहे, त्यांचं महत्व जास्त प्रकर्षाने जाणवतं आहे. एकमेकांच्या संपर्कात राहिल्यामुळे तो स्पर्श, कंपन, आवाजाची ओळख, चाल, आणि अश्या बऱ्याच बाबींमुळे वेगळं वाटायला लागलंय. ह्या टोकाला गेले कि चार कामं दिसतात, ती करता करता ह्या टोकाला आले कि ६ कामे नजरेस पडतात. त्यामुळे माझी ये-जा वाढली आहे, घरभर काही ना काही तरी सुरूच असतं माझं सध्या.    


मी गेले तीन दिवस गावाला गेले होते, शेजारी मुंबई ला फक्त. आज जेव्हा घरी आले तर काय सांगू माझं काय दणक्यात स्वागत झालंय ते. हे घर बोलू शकलं असतं तर? त्याने मला अक्षरशः जाणीव करून दिली कि त्याने मला कित्ती म्हणजे कित्ती मिस केलं, त्याला माझी केवढी आठवण आली ते. बाप रे. फक्त तीन दिवस मी नव्हते तर मला इतकं जास्त जाणवलं, कि कल्पने पल्याड. माझ्याशी प्रत्येक भिंत, वस्तू, आणि संपूर्ण वास्तू जशी काही संवाद साधत होती, का गेलीस? कुठे होतीस? असं काहीसं विचारत होती. काय भन्नाट वाटलं म्हणून सांगते. पहिल्यांदा मी असं अनुभवलं आज. इतकी वर्ष मी इथे राहते आहे, पण आज खरंच खूप खास होतं, एक वेगळी आपुलकी जाणवली अजाणतेपणी आणि ती देखील एका (व्यावहारिक दृष्ट्या) निर्जीव घराकडून. त्यामुळे सजीव काय म्हणतात, काय म्हणत नाहीत, मिस करतात, करत नाहीत, ह्या सगळ्यांच्या पल्याड जायला झालं मला अचानक, आपोआप. एखाद्या वयस्कर, अनुभुवी आणि जगावेगळं प्रेम करणाऱ्या माणसाने म्हणावं तसं जाणवलं मला आज. 


फक्त दिड वर्ष मी जरा जास्त वेळ घालवला, स्वच्छतेकडे लक्ष दिलं / केली स्वतः, आणि मनापासून मला ह्या माझ्या वास्तूचं महत्व प्रकर्षाने जाणवू लागलं, ते मी जगू लागले, बास एवढंच काय ते. ह्याचा मला इतका अप्रतिम प्रतिसाद मिळेल हे स्वप्नात देखील कधीच मी विचार केला नव्हता. ह्याच माझ्या वास्तूत जर मी गृहिणी म्हणून सुरवातीपासून राहिले असते, माझ्या पिल्लांची जास्त व्यवस्थित काळजी घेतली असती तर सर्वांचे जास्त भले झालेच असते, कारण तितक्या प्रमाणात वास्तूचा / वास्तू देवतेचा भरभरून आशीर्वाद मिळाला असता, आणि कदाचित वेगळं चित्र उभं ठाकलं असतं, हे आज जाणवलं. खैर, असो. ह्या पुढे मी प्रयत्न पूर्वक संवाद राखीन माझ्या ह्या नव्याने जाणवलेल्या जिवलगाशी. 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...