सध्या बारावीत असलेल्या सर्व विद्यार्थी प्रतिक्षेत आहेत कि कधी त्यांच्या परीक्षेचं टाइम टेबल जाहिर होईल एकदाच. अर्थात विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांचे पालक आणि शिक्षक सुद्धा वाट बघत आहेत, पण विदयार्थांचं थोडं वेगळं आहे.
कसं ते सांगते, त्यांची संपूर्ण बारावी ऑनलाईन पद्धतीने झाली, सतत घरी आणि सतत तोच तोच अभ्यास करून आणि त्या संगणकावर स्क्रीन समोर वैताग येणार हे साहजिक आहे. त्यात भरीस भर म्हणजे वर्तमानपत्रात किंवा टीव्ही वर मोठ्या मोठ्या क्लास चे लोक येऊन सतत अभ्यास करा, अजून प्रश्न पत्रिका सोडवा, जोवर टाइम टेबल तुम्हाला मिळत नाही तो वर अभ्यास चालूच ठेवा, घड्याळ लावून पेपर सोडवा, ई. सूचना देत आहेत.
नाण्याची दुसरी बाजू अशी कि एकदाची परीक्षा होऊन गेली कि बरं होईल, विद्यार्थी मोकळा श्वास तरी घेतील. थोडं अवघड आहेच सतत टांगती तलवार सांभाळणं. थोडी उसंत घ्या असं हि सांगायला काही हरकत नाही पालकांनी किंवा शाळेनी किंवा ह्या क्लास वाल्यांनी. फक्त अभ्यासाची आलेली पकड सुटता काम नये. थोडा ब्रेक घेतला आणि घेतातच मुलं बहुतांशी, कि अजून जोमाने अभ्यास व्हायला हवा.
असो, जरासं वेगळं आहे हे सगळं. एकीकडे विद्यार्थ्यांचं बरोबर आहे तर दुसरीकडे बारावी नामक हवा आहे. "पासिंग क्लाऊड" आहे हा लवकरच सगळं सुरळीत होईलच. बॅलन्स साधा मित्रहो, थोडं चिल करा आणि थोडा अभ्यास, थोडं पुस्तकातून वाचा आणि थोडं संगणकावर किंवा मोबाइल वर ऐका, बघण्याला उपाय आहेत बरेच. शेवटी प्रत्येकाची ध्येय वेगळी असतात त्यामुळे विध्यार्थ्यांना रुचेल पचेल ते करत राहावं, "प्रयोगातून विज्ञान", आणि इतक्यात कंटाळा, बोर होणं, मरगळ येणं ई. परवडण्यासारखं नाहीच आहे, ह्या नवीन संधीचा उलट फायदा घ्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा