एक ज्वलंत प्रश्न पडलाय मला. दोन व्यक्ती आहेत. दोघांना फक्त एक मेकांबद्दल माहित आहे, बोलणं झालयं त्यामुळे हे माहिती आहे कि साधारण विचार जुळताहेत, फोटोत बघितलं आहे, आणि इतरजणांकडून ऐकलं देखील आहे. त्यामुळे पुढील टप्पा म्हणजे प्रत्यक्ष भेट. पण दोघे दोन भिन्न शहरात त्यामुळे सहज शक्य नाही भेट, मनात येईल तेव्हा. आता प्रश्न असा आहे, कि ह्या पैकी फक्त एकाच व्यक्तीला भेटावसं वाटत असेल? किंवा दोघांनाही तितक्याच आतुरतेने भेटायचं असेल, मग ह्या दोन्ही परिस्थितीत नक्की काय होतं? प्रत्येक वेळा "दोनो तरफ आग बराबर लगनी चाहिये" असं काहीतरी का? फक्त एकाची इच्छाशक्ती पुरेशी असते? का वेळ / योग यावा लागतो? किंवा "त्याच्या" मनात असेल तेव्हाच गोष्टी घडतात. एकमेकांना भेटून काही तरी उत्तर मिळणंच नेहेमी अपेक्षित असतं?, मोजण्या एवढं अपेक्षित असतं का प्रत्येक भेटींमधे?, का भेट निष्फळ पण ठरू शकते? काय असतं नक्की? का तुम्ही बघाल तसं असतं?. जसं अनेक आधुनिक संतांच्या पोथीत दिलंय तसं, क्षणभर फक्त नजरेस पडलं तरी पोटभरतं? फोन वर, चॅट वर बोलणं पुरेसं नसतं का, भेटून काय होणार आहे? का ह्या भिन्न गोष्टी आहेत, तुलना होऊच शकत नाही? बरं हे असं वाटणं फक्त कुठलेही बंध / बांध नसलेल्याच लोकांमधे आढळते, घडते का इतर देखील? बघा ना साक्षगंधा आधी आणि नंतरचा पिटुकला काळ आठवा मंडळी, काय असायचे ते दिवस आणि लग्नानंतर थोडासा बदल घडतो. हे फक्त एक उदाहरण झालं, असंच असतं का प्रत्येक वेळी?
मला थोडक्यात मिळालेली उत्तर अशी: एकाची इच्छा शक्ती पुरेशी आहे भेट होण्याकरता. नकळत काय काय मिळत प्रत्येक भेटीत काहीही सांगता येत नाही, पण मिळणार हे नक्की, दोघांना निश्चितच, फक्त तसा बघण्याचा दृष्टिकोन हवा, कोण कुणासाठी काय घेऊन येईल, दिशा दाखवेल हे देखील फार मोठं गुपित असतं, कुठलाही अट्टाहास मात्र नकोच, अपेक्षा तर फार दूर राहिल्या, सहज, सरळ इच्छा फार मोठी जादू करून जातात. सरते शेवटी "त्याची" इच्छा तर आहेच, त्याच्या पुढे, किंवा पलीकडे काहीच नाही. त्यामुळे त्याच्या इच्छेनुसार च जाऊ या, अनेकांना भेटत राहू या, मनापासून इच्छा व्यक्त करणं आपल्या हातात आहे बाकी काही नाहीच. इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तरी त्या बदल्यात काही तरी "तो" देऊन जातोच मंडळी, जे त्यावेळी आपल्यासाठी योग्य असतं तेच. निराशा कधीच देत नाही, किंबहुना ते त्याच्या दरबारी नाहीच.
सोमवार, ४ एप्रिल, २०२२
भेटण्याची ओढ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
२४६४: तळ गाठणे
आमच्या सोसायटीत चार बोरवेल आहेत. त्यापैकी दोन चालत नाहीत, एक चालू आहे, आणि चौथ्याबद्दल मला फारशी माहिती नाही. त्या बोरवेल खोदताना मोठमोठ्या ...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा