मंगळवार, ५ एप्रिल, २०२२

दिव्याखाली अंधार

आमच्या सोसायटीत रामनवमी पर्यंत नवरात्र म्हणून रोज संध्याकाळी आम्ही श्री. रामरक्षा पठण करायचं ठरवलं आहे आणि करतो आहे दररोज. बरीच बच्चा पार्टी, आजी मंडळी आणि बाकी मंडळी येतात. बहुतांशी आमच्या सोसायटीत मराठी मंडळी आहेत, किंवा ज्यांना इतकी वर्ष राहून मराठी समजतं. श्री. रामरक्षा इतकी साधी सोप्पी आहे आणि सगळ्यांना माहिती असावी अशी. आज अगदी स्रोत संपतच आलं होतं आणि एकांनी अगदी आमच्या कानाशी दुचाकी मोठ्याने सुरु केली आणि काढली देखील. आम्ही गार वारा खात खात पार्किंग मधे बसतो म्हणायला, फक्त १०-१२ मिनिटे बास, खूप झाले. व्हाट्सअँप वर सर्वांना कळवलं देखील आहे ह्या उपक्रमाबद्दल. ज्यांनी कोणी हि गाडी अशी अजीब पद्धतीने काढली त्यांना साष्टांग दंडवत. अक्कल शून्य व्यक्ती असावी ती. जरा काही क्षण थांबली असती तर काय बिघडलं असतं, किंवा हाताने ढकलत थोडीशी चार पावलं चालून मग सुरु केली असती तर? काहीच हरकत नव्हती. एवढी काय घाई? ऐका ना, संपत आलंय स्रोत. स्वतः तर यायचं नाहीच, काही असे उपक्रम राबवायचे नाहीत, बाकी सगळे करत आहेत तर त्यात हे असं वागणं. छोटी छोटी मुलं काय शिकतील ह्या प्रसंगातून? दुचाकी चालवता म्हणजे मोठं व्यक्ती असेल कोणी तरी? डोळे बंद करून म्हणणं चाललं होत त्यामुळे मला माहित नाही कोण होत ते, पण थोडासा दुसऱ्यांचा विचार करायला शिकलं पाहिजे नक्कीच. असो, त्यांच्या ह्या अश्या कृतीमुळे मला हि छोटेखानी अनुकथा लिहायला मिळाली, नवीन अनुभव घेता आला, असे पण लोक असतात हे समजलं आणि काय करू नये हे देखील. मनापासून धन्यवाद त्या व्यक्तीला. श्री. रामा, सद्बुद्धी दे बाबा सर्वांना.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२४६४: तळ गाठणे

आमच्या सोसायटीत चार बोरवेल आहेत. त्यापैकी दोन चालत नाहीत, एक चालू आहे, आणि चौथ्याबद्दल मला फारशी माहिती नाही. त्या बोरवेल खोदताना मोठमोठ्या ...