शनिवार, ९ एप्रिल, २०२२

एक म्हण

 "चप्पल एकावर एक किंवा उलटी पडली कि भांडण होतात" हि म्हण खूपदा ऐकली होती. पण का होतात भांडणं? हे ना कधी कोणाला विचारलं आणि ना हि कोणी आपणहून सांगितलं. असो. ती म्हण इतकी भिनली होती ना कि कुठेही मग चप्पल उलटी किंवा एकावर एक बसलेली दिसली रे दिसली कि त्याला सरळ करायचीच हा अलिखित नियम, मग ती कोणाची का असेना. भलताच उत्साह ना मला / आम्हाला.  तर ती तशी चप्पल चांगली नाही दिसत डोळ्याला. सरळ जोडी, एका बाजूला एक अशीच शोभते, चांगली दिसते बास. चप्पल अशी तशी ठेवली म्हणजे भांडण होतात हि म्हण नाही आहे. ते जर थोरल्या मोठ्यांनी बघितलं तर, किंवा शिस्तीचे कोणी घरचे त्यांच्या नजरेस पडलं तर साधी चप्पल पण व्यवस्थित काढता येत नाही का, इतपासून सुरवात होणार आणि मग त्याच रूपांतर भांडण्यात होऊ शकतं, बाकी काही नाही. अंध श्रद्धा तर नाहीच, उगाच भांडणं वगैरे होत नाहीत कारण नसतांना. पण हा हे बेशिस्तीत किंवा घाईघाईत चपला काढणं कसंही हे भांडणाचं मूळ असू शकतं / होऊ शकतं. त्यामुळे मंडळी, चपला पायातून काढतेवेळी शिस्तीत काढा म्हणजे प्रश्नच मिटला, हो कि नाही. आणि ह्याचाच अर्थ खूप वर्षांपूर्वी असं कुठेतरी झालं असेल बेशिस्तीत काढलेली चप्पल बघून थोऱ्यामोठ्यांना राग आला असेल आणि वाद झाले असतील म्हणून हि म्हण, प्रत्येक वेळी तसं होईलच असं नाही. बाकी प्रचलित म्हणींसोबत देखील असं च काहीसं झालं असणार, बघते लागेल शोध लवकरच एकेकाचा. कळवते तुम्हाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२४६४: तळ गाठणे

आमच्या सोसायटीत चार बोरवेल आहेत. त्यापैकी दोन चालत नाहीत, एक चालू आहे, आणि चौथ्याबद्दल मला फारशी माहिती नाही. त्या बोरवेल खोदताना मोठमोठ्या ...