सोमवार, २ मे, २०२२

अस्वस्थ, नेहेमीचचं

 चारचाकी चालवण्याचे काही लिखित-अलिखित नियम आहेत आणि ते पाळले तर उत्तम. अर्थात मी स्वतः गेले अनेक वर्षांपासून गाडी चालवत असल्यामुळे मला हि माहिती तर आहेच शिवाय "स्वानुभवातून आत्मप्रचिती" असं माझी आई म्हणते तिच्या गाण्याच्या बोलातून त्यापद्धतीने आपण शिकत जातो आणि त्या गोष्टी अमलात आणत जातो. त्यातलीच एक येथे मांडण्याचा माझा प्रयन्त आहे. सर्वप्रथम मी तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग केला आणि SMS च्या दिवसांमधे मोबाईल वर आलेला निरोप वाचून दाखवण्यास सांगितले. जर फारच महत्वाचा निरोप असेल तर गाडी बाजूला घेऊन फोन करायचा, नसेल तर ठिकाणावर पोचल्यावर. त्यानंतर फोन चा आवाज कमी अगदी कमी ठेवायला सुरवात केली आणि जे असतील ते निरोप, फोन घरी पोचल्यावरचं बघायचे हे ठरवलं. जीन्स घातली असली तरी, पॅन्ट ला खिशे असले तरी देखील मोबाईल गाडी चालवतांना बाजूच्या सीट वर किंवा पर्स मधेच ठेवायचा हा नियम. त्यामुळे अचानक गाडी चालवता चालवता फोन वाजलाय आणि तो धडपडत कसाबसा खिशातून काढावा लागलाय असं कदापि झालाच नाही माझ्या बाबतीत. मग मी जर टप्याटप्यात शिकू शकते तर बाकीचे का नाही. माझ्या असं निदर्शनास आलंय कि घट्ट पॅन्ट, त्यात मोबाईल, गाडी चालवता चालवता तो काढण्याचा प्रयन्त आणि पुढे तेच, काही बदल नाही, एकदा, दोनदा, अनेकदा तेच. हिच गत त्या बिचाऱ्या रुमालाची. आता आपल्याला सतत रुमाल लागतो वापरायला मग तो काढून हाताशी ठेवावा ना? इतकं सोप्प कसं काय ह्या शिकलेल्या लोकांना समजत नाही, कधीच. प्रत्येक वेळी इतके ते अस्वस्थ असतात, प्रकाश पडायला हवाच, स्वतःच्या अनुभवातून शिकणं एवढं अवघड आहे का? अस्वस्थतेचं सातत्य कसं पाळू शकतात कोणास ठाऊक. गाडीत बसतांना, बसायच्या आधीच सोय लावा मंडळी म्हणजे चालवणाऱ्याला, मागे पुढे बसणाऱ्याला प्रवास सुखकर होईल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२४६४: तळ गाठणे

आमच्या सोसायटीत चार बोरवेल आहेत. त्यापैकी दोन चालत नाहीत, एक चालू आहे, आणि चौथ्याबद्दल मला फारशी माहिती नाही. त्या बोरवेल खोदताना मोठमोठ्या ...