गेले काही वर्ष आपण एक फार मोठा बदल अनुभवाला आहेच समाजात झालेला, अर्थात खूप बदल झाले आहेत, पण गगनचुंबी इमारती हा भला मोठा बदल आहे.. सर्वत्र, जेथे जेथे नजर जाईल तेथे तेथे मोठ्या शहरांमधे तरी निश्चितच ह्या अश्या मोठ्या सोसायटी तय्यार झाल्या आहेत. प्रत्येक सोसायटीचे काही नियम असतात. उदाहरणार्थ दुपारी १-४ कुठलाही आवाज नको, कुठलेही बांधकाम करायचे नाही, कारण त्यावेळी वरिष्ठ नागरिक आणि लहान बाळं आराम करतं असतात त्यामुळे त्यांना त्रास नको. असे अनेक नियम आपल्या सर्वांना ठाऊकच आहेत,जे माणसांनी माणसांसाठी आणि माणसांच्या सोयीसाठी केलेले आहेत. आपली शांताता भंग झालेली अजिबात आवडत नाही कोणालाच, नाही का?. कोणी जर अश्या मोठ्या सोसायटीत हॉर्न वाजवला भलत्या वेळेला, पहाटे, मध्यरात्री ई. तर तो फार मोठा गुन्हा असतो. ह्या वरून आणि अनेकदा आकाशातून भ्रमंती करत असतांना मला असं वाटलं / जाणवलं कि जशी आपली मानव-वस्ती तशी त्या आकाशात ढगांची वस्ती, पक्षांचे वास्तव्य, त्यांच्या वेळा, त्यांची कामं ई. मग केवळ आपल्याला बुद्धी दिलेली आहे त्याचा अर्थ असा नाही कि आपण दुसऱ्यांची शांतता भंग करावी, कोणी हक्क दिला? कधीही मध्यरात्री, भल्या पहाटे आपली विमानं त्या आकाशात वैविध्य पातळीवर भ्रमंती करत असतांना आढळतात, का? फक्त तुमचं एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी पोचणं महत्वाचं नसतं हो, बाकी जीव आहेत ना, बाकी वस्त्या आहेत ना आजूबाजूला, त्यांना नको का शांतता त्यांच्या हक्काची. आणि ह्या सगळ्या चुका करत राहायच्या वर्षानुवर्षे आणि पुन्हा त्या वरुणदेवाला पावसासाठी दोष द्यायचा, ऊन तापतंय म्हणून सुर्यबाप्पाला बोलायचं ई. पण आपण बुद्धिजीवी काय प्रचंड गडबड करतो आहे ते कधीच नाही बघायचं. असं नाही. ज्यांचं कोणाचं त्या आकाशावर राज्य आहे असा त्यांचा गैरसमज आहे,किंवा जे फक्त हे बघतात कि एकावेळी अनेक विमानं नकोत आकाशात एका पातळीवर, पण त्या पुढचं काय? ते ढग पण कदाचित गप्पा मारत असतील, निजली असतील, काहींचा प्रेमळ संवाद सुरु असेल, ई. मग त्यांना एकांत नको का? अवाढ्यव्य विमान, त्यांचे आवाज, धूर ई. मुळे पक्षांची सभा, वस्ती, एकमेकांसोबत हुंदडणं वगैरे मधे नक्की अडथळा येत असणार, तरीदेखील विनातक्रार ते कार्यरत राहतात. ढगांच्या वस्तीची, पक्षांच्या वसाहतीची / भ्रमंती दरम्यानची शांतता भंग करण्याचा आपल्याला हक्क नाहीच. हे चित्र जमल्यास थोडसं बदलायला हवं, माझ्या मते. सद्बुद्धी द्या सर्वांना देवा.
रविवार, ३ जुलै, २०२२
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
२४६४: तळ गाठणे
आमच्या सोसायटीत चार बोरवेल आहेत. त्यापैकी दोन चालत नाहीत, एक चालू आहे, आणि चौथ्याबद्दल मला फारशी माहिती नाही. त्या बोरवेल खोदताना मोठमोठ्या ...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा