शुक्रवार, १२ मार्च, २०२१

घरीच केलेलं ....

जस मी आधीही अनेक "अनुकथेत" लिहिल्याप्रमाणे माझे बाबा म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठच होत माझ्या साठी. त्यांच्या विषयातील सखोल तांत्रिक माहितीशिवाय त्यांचं इंग्लिश, मराठी, संस्कृत भाषेवर पण प्रभुत्व होत आणि ते त्यांच्या सहज बोली भाषेतून प्रकर्षाने जाणवायचं, नेहेमीच. त्यातील एक प्रसंग मला सहज काल आठवला, म्हटलं लिहावं. 
 
तर त्याच असं झालं, माझ्या एका खास मैत्रिणीने परवा मला अप्रतिम, अतिशय चविष्ट असा पास्ता डब्ब्यात दिला आणि त्यामुळे त्यादिवशीचं ऑफिस मधलं जेवण एकदमच भन्नाट झालं, मज्जा आली. मग तो डब्बा परत देण्यासाठी काही मुहूर्त लागत नव्हता,पण मग महाशिवरात्रीच्या निमित्याने गोड म्हणून केशरयुक्त श्रीखंड सगळ्यांना घास-घास येईल असं दिल मी तिच्या डब्ब्यात दिल. त्या दोघी- तिघी जणी मिळून डब्बा एन्जॉय करतात. एकीने वा / WA = WhatsApp वर निरोप दिला श्रीखंड छान झाल्याचा आणि दुसरीने बस मधे सांगितलं झक्कास झाल्याचं. आणि त्यानंतर अगदी सहज विचारलेला प्रश्न "घरी केलं होत?" (ह्या माझ्या मैत्रिणीला प्रश्न विचारायला प्रचंड आवडत नेहेमीच, किंबहुना तिच्या प्रश्नाची सरबत्ती आम्ही नेहेमीच एन्जॉय करतो) असो. त्यामुळे मला ताबडतोब माझ्या बाबांची आठवण आली. 
 
माझ्या लहानपणी घरी फोन हि संकल्पना देखील नव्हती, त्यामुळे "असे पाहुणे येति आणि स्मृती ठेवुनी जाती", सहज अचानक पाहुणे येत असत आणि मग काय "अलिखित नियम जसा" तसे जेवूनच जातं सगळे. तेव्हा मग आईचा इशारा समजून किंवा घरीच जर काही हलवाया कडले काही गोड पदार्थ आणले असतील तर ते वाढले जायचे पानात. मग नेहेमीचाच सहज विचारलेला प्रश्न असायचा पाहुण्यांचा "घरी केलं हे सगळं?" त्यावर माझे बाबा उत्तर द्यायचे "हो$$$". पाहुणे चकित. काय सुगरण बायको आहे, फारच लकी वगैरे.... त्यांच्या चेहेऱ्यावरील प्रश्न चिन्ह बघून बाबा म्हणायचे कसे "घरीच केलंय सगळं पण.... मिठाई वाल्याच्या". अस्सा हशा पिकायचा म्हणून सांगते, अहाहा. अजूनही सगळं आता होतंय अस्स प्रत्यक्ष डोळ्या समोर उभं ठाकलंय सगळं. 
 
थँक्स माझ्या त्या मैत्रिणीला आणि तिच्या प्रश्नाला, चिकित्सक वृत्तीला देखील. असेच प्रश्न विचारात राहा म्हणजे मला असंच काही-बाही आठवत राहील आणि मी लिहीत राहीन.

Locate me at FB: https://www.facebook.com/preeti.mulay for more such stories.

Listen to this story on: https://youtu.be/aQDrUWS1Gkk



गुरुवार, ११ मार्च, २०२१

Me, my kidoos and PhD....

Today while surfing through my LinkedIn account I fortunately came across one extremely heart-touching photo as well as write-up. I was literally in tears for couple of reasons.

1) That pic itself was worth 1000 words, which made me speechless, hats off to the one who wrote it. It goes like that, there was a prof in that pic in a classroom, totally engrossed in teaching / explaining something, having a marker in one hand and tiny toddler in another hand. Surprised? right, yeah, me too.

One of the students in the class in one of the universities outside India was attending class along with her baby. After few minutes, that baby / toddler started crying a loud. And then immediately that student in a hurry was trying to walk out of the class. The class was going on in a great swing, in interesting manner, still the prof took that crying baby in his hand, to everyone surprise baby stopped crying, mom sat down and the class continued with the same grace. Wow, salutes to that prof indeed. I sincerely wish to go and meet him asap. What a wonderful soul on earth. Tiny deed but made her write on LinkedIn and made me speechless with tears in my eyes.

2) Almost all the time during my PhD meetings with my prof or visiting my university for the paper work, meetings with Dean and what not, I always traveled in a group of three. I still recollect traveling with my laptop bag (those were the days, when laptops were really heavy), two more bags of my v n v with food, water, toys, coloring books, colors and what not. So such "Barat" used to visit during all my required PhD tenure. Wow, those were the days. Many times v n v were taken care by others so well, but Yeah sometimes people scolded me soooo badly about traveling in gang of three always. There was no choice that time, and I enjoyed all that so thoroughly that no regrets absolutely. Hence I can proudly say that PhD is all becoz of v n v's great support.

While reading the narration on Linkedin, I went back to my memory lane... its full of so many stories.

 

 Find me on Facebook too: facebook.com/preeti.mulay

 

 

My beloved Nagpur...

Very very proud to be Nagpurian and it was the most wonderful day spent, I can say, after conducting a session online, and after attending 3 meetings....

Anywhere I go I bump into our Nagpurians,wow, wow....

I was bit unwell today, applied for medical leave and stepped out to see my beloved doctor. On the way, I came across huge hording and please dont ask me which product it was as my four eyes were totally on the most beautiful, scrumptious, mouthwatering, delicious looking, my most fav dish displayed on it, wow, it was the most perfect capture of pudachi vadi, ymmmmmmy....

I am very sure the person who worked on the design of this advertisement also must be my food-buddy and ofcourse from my Nagpur. Love to meet him / her asap.

This was not enough, after reaching the clinic, as usual I asked the compounder akka receptionist that when will be my turn? he said after 3 people but dont worry one is the doctor itself, so he will not take much time. That doctor which the receptionist was referring too was a grandpa and I was not able to restrict myself to ask him his speciality in medicine world. He stated that he did a integrated course, a combo of allopathy+homeopathy+ayurveda etc. something like that from Nagpur. Wow, it was like "Cherry on the cake", then we went on and on and on..... and in all this I felt so relaxed that I totally forgot about my tiny health issues.

Superb day spent indeed, traveled back to my Nagpur, starting from the places where we used to relish on pudachi vadi....

It was definitely for the first time pudachi-vadi is displayed on such a large scale in commercial advertisement. A big thanks to all those who worked on it starting from its inception to display.
 
Please find me on Facebook too: facebook.com/preeti.mulay

मंगळवार, ९ मार्च, २०२१

"तरुण तुर्क म्हातारे अर्क"

गेल्या काही वर्षा पासून मी एक निरीक्षण करते आहे कि रस्त्यावर धावणे आणि दुचाकी चालवणे हे जरा जास्तच प्रमाणात चालू झालं आहे, अगदी वेड लागण्या इतपत

मी असं ऐकलं आणि वाचलं आहे अनेक लेखात जे दिग्गजांनी लिहिले आहेत, कोणी ऐऱ्या गैऱ्याने नाही, कि 

१. हे धावणे, दुचाकी चालवणे वगैरे जर व्यायाम म्हणून मनापासून करत असाल तर त्याची एक वेळ असते, काळ असतो, कधीही केव्हाही कुठेही करणं धोकादायक आहे, 

२. रस्त्यावर धावणे पण टाळावं म्हणतात ई. 

आणि हाईट म्हणजे सगळेच रस्त्यावर आले आहेत आजकाल, लहान, तरुण, मोठे, आजोबा, बारीक, लठ्ठ ई. जमतंय / नाही-जमतंय, गरज आहे-नाही आहे ई. देखील, 

ह्या  वरून मला एक आज एक फार मोठा प्रश्न पडला आणि त्याचा अंदाज देखील बांधता आला तो असा कि 

"मुख्यतः मध्यम वयाचेच का जास्त प्रमाणात दुचाकी चालवत आहेत?" 

माझ्या लहानपणी जरी फार सुरक्षितता होती सगळीकडे, रहदारी कमी होती, तरीही खबरदारी म्हणून घराच्या आसपास च सायकल चालवावी अशी सूचना दिली जायची आणि ती पाळली जायची पण. त्या वेळी ज्या मुलांना वाटत असेल कि दूर दूर जावं सायकल चालवावी, हवा खावी, निसर्ग अनुभवावा, ई. आणि जे राहून गेलाय इतक्या वर्ष ते सगळं पटापट अनुभवण्यासाठी, सोशल मिडिया वर कदाचित लिहिण्यासाठी (स्टेटस आणि फोटो) काही जण चालवत असतील, अनेक कारणं आहेत फक्त माझ्या दृष्टीने. जसं कि मध्यम वयात आता थोडा वेळ आहे, परवडू शकतंय, घरची जबाबदारी कमी झाली आहे ई. सगळे कारणं जरी योग्य असली तरी देखील ८.३०-९ सकाळी, संध्याकाळी, रात्री.... ह्या काही वेळा नाहीत ना सायकल काढायला आणि धावायला? 

आणि हे किती दिवस? 

घरातच इतकी जास्त वैविध्य काम असतात करण्यासारखी ज्याने घर चकाचक होत, संपूर्ण शरीराला व्यायाम होतो, फार समाधान मिळत, आणि पुढील पिढी करता एक छान उदाहरण उभं राहत, बाहेर पडायची गरजच नाही. आणि एका जाहिरातीत म्हटल्या प्रमाणे "भारत ये एक अंडर कंस्ट्रक्शन देस है..." त्यामुळे धूळ येतेच, घरात माणसं राहतात त्यामुळे पसारा होतोच, 

त्यामुळे विचार करा आणि मग कृती हि आग्रहाची विनंती, म्हणजे अती महागड्या सायकल वर कपडे वाळत घालण्याची वेळ येणार नाही. 

To enjoy more such stories locate me at www.facebook.com/preeti.mulay

Listen to this story on :


YouTube: https://youtu.be/qeejjHSnJ2k

Twitter: @DrPreetiMulay, https://twitter.com/DrPreetiMulay

LinkedIn: https://www.linkedin.com/in/dr-preeti-mulay-536b43a9/


सावली अक्का छबी ...

संक्रांत सण झाला, रथसप्तमी पार पडली, मार्च महिना २०२१ चा आला देखील आणि उन्हाळ्याची चाहूल लागली. सूर्य बाप्पा तळपायाला लागले आहेत आत्ताच. परवा काही कारणास्तव लवकर ऑफिस मधून निघाले आणि रस्त्यावर आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा नकळत आधी सावली शोधली माझ्या डोळ्यांनी (४ बरं का) आणि हुश्श झालं सावलीत गेल्यावर. ह्या अगदी छोट्या प्रसंगामुळे हा पंक्ती प्रपंच. अनेक वर्षांपासून अनुभवलं, वाचलं आणि जगलं देखील ह्या सावलीच महत्व. माझे बाबा नेहेमी म्हणायचे "झाडासारखं असावं, कुठलीही अपेक्षा न ठेवता फळं / फुलं आणि सावली द्यायची". लहान थोर गरीब श्रीमंत पक्षी प्राणी माणसं ई. सगळ्यांचा हवी हवीशी अशी हि बहुमूल्य अनमोल सावली. हि सावली "ती" आहे बरं का मंडळी म्हणजे माया प्रेम भरभरून देणारंच, हवं त्या पेक्षाही कित्येक पटीने अधिक आणि नेहेमीच. झाडं स्वतः उन्हात स्थिर उभे राहतात दुसऱ्यांना सावली देण्याकरता.  माहुत देखील मला असं वाटतं कि अवाढव्य हत्तीच्या सावलीत अनेक वेळा विसावत असेल, तीच गत उंट हाकणाऱ्यांची देखील असेल कदाचित. जसा जसा हा सूर्य बाप्पा आपली उन्हाची दिशा आणि प्रखरता बदलतो त्याप्रमाणे सावली देखील बदलतेंच. अनेक प्रकारची झाडं तर अशी आहेत कि ज्यांना "सावलीची झाडं" असेच संबोधतात. तर अशी हि ऊर्जा, उत्साह आणि शांतात देणारी सावली माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे माणसांना, त्यांच्या महागड्या गाड्यांना...  फक्त झाडचं सावली देतात का हो? नाही, मोठ्या इमारती पण देतात, छत्र्या पण देतात, मंडप पण देतात ई. हि झाली उन्हात हवी हवीशी सावली.  पण ह्याच शब्दाचे दोन अजून अर्थ आहेत, मायेची सावली (आई वडील, आजी आजोबा, गुरुवर्य आणि घरचे मोठे) आणि छबी (आपली पुढली पिढी). चला तर मग आज पासून ह्या सगळ्या सावली देणाऱ्या स्त्रोत ना आपलंस करूयात, काळजी घेऊयात, माया देऊयात.... नेहेमीच.

आधुनिक सण


अनेक पिढ्यांपासून अर्थात भारतात आणि त्याहून महाराष्ट्रात मी प्रकर्षाने बघत आले आहे कि अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात, त्यात प्रचंड विविधता तर असतेच पण त्या सगळ्यांमधला एक कॉमन / समान धागा हा आहे कि सगळेच सण हे मुलींचे / बायकांचे जास्त असतात, त्यात त्यांना विविध प्रकारच्या पूजा करण्याची संधी मिळते, त्यामुळे नवीन साडी-चोळी-दागिना ई. मिळतो. मैत्रिणींना बोलवण्याची, त्यांच्या सोबत वेळ आनंदाने साजरा करण्याची संधी मिळते, गोड-धोड पक्वान्न चाखता येतात, विविध गाणी-नृत्य ई. चा पण समावेश असल्यामुळे वेगळीच मज्जा तर येतेच पण ऊर्जा हि मिळते. दोन-तीन पिढ्या एकत्र सगळं साजऱ्या करतात. आणि हे सगळं उत्कृष्ट सजावटी मधे, वैविध्य फुलांच्या सुगंधी मंगलमय वातावरणामधे. माझ्या मते हे सगळं ह्या दृष्टीने होत असे कि १) त्या काळी बहुतांशी सगळ्याच महिला घरी असत, त्यांना त्यामुळे हे सगळं व्रत वैकलै करण सहज जमत होत २) आणि त्यामुळे त्यांना महत्व दिल जायचं ३) त्याचा परिणाम म्हणून कि काय पण त्यामुळे जबाबदारीने सगळी काम मनापासून होत असत आणि बरीच अजून कारण देता येतील. आता काळ बदलला आहे त्यामुळे माझ्या दृष्टीने काही जणी असे पौराणिक सण साजरे करतात आणि बाकी सगळ्याच आधुनिक सण हि प्रचंड प्रमाणात एन्जॉय करतातच. आज हि एक असाच आधुनिक सण आहे आणि माझ्या मुलांनी शनिवारीच साजरा करायला सुरवात केली, स्वतः भन्नाट पदार्थ केला, गेम खेळला आणि पोटभर वैविध्य विषयावर गप्पा मारल्या माझ्याशी. अहाहा.  दोन्ही प्रकारचे सण महत्वाचे आहेतच आणि साजरे करण्याची पद्धत फार वेगळी आणि अप्रतिम आहे. महत्व तेच, गिफ्ट्स पण मिळतातच (अक्चुअल आणि व्हर्चुअल पण, अगदी अभिनंदनाचा पाऊस पडतो), भरपूर विविध पदार्थांची चंगळ पण असते.

"मी कात टाकली"


हा  ना एक फारच मजेशीर किस्सा आहे आमच्या ड्राईव्हर काकांचा. ते कधी अगदी शांत पणे बस चालवतात, कासवाची गती, अगदी सायकल वॉल सुद्धा पुढे जाईल अशी गती,अजिबात काहीही झालं तरीदेखील अजिबात गती  वाढवणार नाहीतच. किंवा कधी कधी काहीही झालं तरी गती कमी करतच नाहीत. असो, होत असं बस चालवतांना. आज प्रकरण काही वेगळंच होत. थोडासा विचार केला, आणि बघितलं तर असं आढळलं कि काल पर्यंत आमचे काका भलंमोठं जाडजूड लोकरीचे स्वेटर आणि माकडटोपी घालून बस चालवत असत. पण आज एकदम मोकळं-ढोकळ प्रकरण होत, ना स्वेटर ना टोपी, अगदी "मी कात टाकली" अस्सच काहीस. आणि त्यामुळे ते बस चालवण्यात झळकत होत, जश्या कि हवेशी गप्पा होत होत्या, सगळ्या गाड्यांना ओव्हरटेक केलं गेलं, मस्त मोठ्याने हॉर्न वाजवत आणि गती पण जास्त होतीच. बस मधल्या सहप्रवाशांना देखील लक्षात आलंच पण कारण लक्षात आल्यावर मोठ्याने हशा पिकला. आता हेच मला नॉन मराठी मंडळींना समजावून सांगायचं आहे हिंदीत आज संध्याकाळी. देवा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...