शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

2243: Back to basics


I love the concept of the bell curve. Ever since I learned about its shape, its formulation, and what it tries to depict, I have been fascinated by it. Hats off to the creator of this concept.

With a lot of free time on my hands and enjoying my "Weekend Forever," literally a new YouTube video stood in front of me and I was captivated by it from beginning to end, due to multiple reasons: the podcast brand's name, the thumbnail, and the topic of discussion itself.

I love to go back to my school days in my mind. I often "visit" my old classroom, those benches, the blackboard, the huge ground, my classmates, and our simple, delicious tiffin. This video added another reason for me to stay there longer, in a simulated, visualized way. Those were awesome days, completely relaxed, full of fun and joy. For me, and I'm sure for many others, it was a time of continuously dreaming about happy things. Negativity never touched me back then; to be frank, I wasn't even aware it existed. But as we climb higher steps in life, in all senses, we get surrounded by unwanted things.

This video helped me come back to basics. The speaker powerfully suggested pronouncing the basic Marathi alphabets loudly and methodically. As per her research, chanting them twice daily can help activate every cell in the body, to overcome minor pains and health issues. What a simple yet terrific technique! The moment you start, you can feel almost every crucial part of your body getting involved. The results are mesmerizing as it takes you back to your school uniform, those benches, fun and group chanting. It's truly nostalgic.

Connect with the speaker and try it yourself. After climbing that high peak, it feels good to come back to basics, doesn't it?

hashtagNostalgia hashtagSimpleJoys hashtagWellness hashtagWeekendForever hashtagBellCurve hashtagSchoolDays hashtagMarathiAlphabet hashtagBackToSchool

https://lnkd.in/dhAnY2xU

२२४४: बालपण देगा देवा


आपण सर्वच जण मनातल्या मनात किंवा मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा मारताना हमखास म्हणतो, "शाळेचे काय दिवस होते, नाही?" आणि मग सगळेच त्या दिवसांमध्ये हरवून जातात, केवळ त्या क्षणापुरते नाही, तर पुढील अनेक दिवस. काही जणांना तर याची सवयच लागते आणि वेळ मिळाल्यावर ते बसल्याजागी शाळेला भेट देऊन येतात, चेहऱ्यावर एक सुंदर स्मितहास्य घेऊन पुन्हा कामाला लागतात. क्या बात है!

चला तर मग, ही जादू पुन्हा एकदा अनुभवूया. आता पदर खोचून तयार व्हा, कारण अरुंधती ताई आपल्याला त्यांच्या एका व्हिडिओमधून आणि बऱ्याच वर्षांच्या त्यांच्या अभ्यासातून आपल्या ओळखीच्या बाराखडीचे महत्त्व पुन्हा एकदा सांगणार आहेत. सर्वांना माहीत असलेली बाराखडी शास्त्रीय पद्धतीने कशी उच्चारायची, हे त्यांनी व्हिडिओमध्ये समजावून सांगितले आहे. अर्थात, यात सातत्य राखणे खूप महत्त्वाचे आहे. पण यासाठी तुम्हाला काहीही वेगळे किंवा खास करावे लागणार नाही. कारण तुमची शाळा आणि ते जुने दिवस हे सर्व आपोआप घडवून आणतील. एकदा करून तर बघा!

मी जेव्हा हे सुरू केले, तेव्हा मला लगेच ते अगदी सुरुवातीचे दिवस आठवले. ज्या माननीय शिक्षकांनी मला वर्णमालेची ओळख करून दिली होती आणि ती उत्तम प्रकारे शिकवली होती, ते सारे क्षण माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. प्रत्येक स्वरात किती ताकद आहे, हे मला आता समजले आहे. प्रत्येक अक्षर उच्चारताना शरीराच्या कोणत्या भागाची हालचाल होते, ती स्पंदने कुठे पोहोचतात, हे जाणवले. काही अक्षरे उच्चारताना तर शालेय दिवसांपेक्षा जास्त मजा आली. मोठे झाल्यावर पुन्हा शाळेत जायला कोणाला मिळतं? पुन्हा लहान होण्यासाठी, विद्यार्थी बनण्यासाठी? या व्हिडिओने ती सुवर्णसंधी दिली आहे, म्हणून तिचा पुरेपूर वापर करूया.

मी तर रोज सकाळ-संध्याकाळ बेंचवर अत्यानंदाने बसते आहे आणि एका वेगळ्याच, स्वप्नवत जगात रममाण झाले आहे. हे खूप सोपे, आवडणारे आणि महत्त्वाचे म्हणजे विनामूल्य आहे. या टप्प्यावर अजून काय हवे? चला, 'स्कूल चले हम'!

https://lnkd.in/dhAnY2xU

शनिवार, ३० ऑगस्ट, २०२५

२२३८: एक नवा आरसा


माझ्या मते, या जगातील कोणत्याही सजीवाला किंवा माणसाला रागाचा एक थेंबही आवडत नाही. मग तो कोणीही असो किंवा कुठल्याही कारणास्तव तो राग व्यक्त करत असो. शांत, गोड आणि प्रेमाने बोललेलेच जास्त पटते, समजते आणि मनाला भिडते.

हे पुन्हा एकदा मला प्रकर्षाने जाणवले, की शब्दांनाही वेदना देण्याची ताकद असते. एखादे रागाने ओतप्रोत भरलेले वाक्य बोलण्याआधी, क्षणभर थांबून, तेच वाक्य नव्या विचाराने मांडून बघा. यामुळे समोरच्या व्यक्तीलाच नाही, तर तुम्हालाही एक वेगळे समाधान मिळेल. मनाला, शरीराला, समाजाला एक नवी ऊर्जा मिळेल. जर इतके फायदे असतील, तर ही सवय का नाही लावून घ्यायची? चला, आतापर्यंत जे झाले ते ठीक आहे, पण यापुढे हे नक्की करूया.

काचेचेही अगदी तसेच आहे. तिलाही मार सहन होत नाही. ती तुटते. इथे मी 'शाब्दिक मार' या अर्थाने काचेची तुलना केली आहे. पण आजच्या तंत्रज्ञानामुळे त्याच काचेने प्रचंड आघात सहन करण्याची क्षमता मिळवली आहे. आजच्या 'टफंड ग्लास'मुळे अख्खा ड्रम एका पिशवीत मावतो आणि तो पूर्वीपेक्षाही अधिक सक्षम झाला आहे. हा बदल तिला करावाच लागला, कारण प्रवाहासोबत चालणे आवश्यक होते. पण केवळ पर्याय नाही म्हणून नाही, तर अत्यंत आवडीने हा बदल स्वीकारला गेला आहे.

कोणतीही थेट समानता नसली तरी, मागे वळून पाहताना मला जाणवते की, माझ्या बाबतीतही प्रत्येक जण मला रागावूनच गेला, जणू रागावणे हा त्यांचा अधिकारच होता. याचा अर्थ मी वाईट होते असे नाही, पण ते माझ्या आयुष्याला आकार देण्यासाठी लिहिलेले महत्त्वाचे धडे होते. सुरुवातीला जरी राग आवडला नसला, तरी त्या रागाचे आघात सहन करत मी शांतपणे पुढे जात राहिले. मार खातच मी घडले. आता मात्र, इतरांना अनावश्यक मार खाऊ द्यायचा नाही, हा माझा प्रयत्न आहे.

जे मला आवडले नाही, तेच वारंवार समोर आले आणि मी घडले, अगदी त्या काचेसारखी. जशी काचेत विविधता असते, तशीच माणसांच्या स्वभावात आणि सहनशीलतेतही असते. प्रत्येकजण वेगळा आहे. पण आज, तीच स्मार्ट काच प्रत्येक घरात आहे. तिच्या प्रवासातून, नाजूकतेकडून सक्षमतेकडे जाण्याचा धडा ती आपल्याला शिकवत आहे.

मंगळवार, ५ ऑगस्ट, २०२५

२२२३: चहा खाल्ला


हो हो अगदी योग्य वाचलंत तुम्ही. आज अचानक मला जाग आल्यासारखं झालं कि मी हे काय करते आहे?  मी जेव्हा पूर्णवेळ शिक्षिका म्हणून काम करत होते त्या वेळेपासूनच मी अमृततुल्यची फार मोठी शौकीन झाले होते. फार नाही पण घोटभर चहा हवाच. आणि आता काय भरपूर वेळ आहे हातात, त्या मुळे शांततेत विविध प्रकारे चहा दोनदा दिवसातून घेतला जातोच. केक रस्क आहेत सध्या सोबतीला. मग काय आज कपातील चहा कधी संपला हे समजलंच नाही. आधीच कप छोटा, त्यात एवढासा चहा आणि त्यावर रस्क बुडवल्यावर सगळा चहा त्या पठ्याने च फस्त केला कि, मला काहीच उरला नाही. जसे कि मीच चहा खाल्ला पिला नाहीच. प्यायला काही उरलेच नाही. चहा पण खाता येतो हे आज नव्याने उमगले. मग काय संगणक हाताशी आहेच, म्हटलं जरा चाचपडून पाहावे कि चहा स्वाद चॉकलेट किंवा ट्रॉफी उपलब्ध आहे का? पण छे हो, नाही सापडलं काही प्रथमदर्शनी असे. चॉकलेट च्या स्वादाचा चहा आहे, पण ट्रॉफी नाही. चहा खायचा असेल तर मग हाच एक पर्याय सध्या उपलब्ध, गरमागरम चहा+रस्क. चहा पिण्याची मजा नसली तरी नव्याने समजलं कि चहा खाता पण येतो ते. दोन्ही करायचे असेल तर किटली जवळ घेऊन बसणे, आधी खा मग प्या. आता माझ्याकडे बराच वेळ असल्यामुळे हे सहज शक्य आहे.  

रविवार, ३ ऑगस्ट, २०२५

२२२२: देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी


माननीय सुधीर फडकेंनी गायलेले हे भक्ती गीत आहे, अनेक वर्षांपूर्वी सादर केलेलं. ह्या भक्तिगीताचा एक अजून अर्थ मला आज उमगला म्हणून हा पंक्ती प्रपंच.  हे लिहितांना मी फक्त मध्यम वर्गीय लोकांबद्दल बोलते आहे ज्यांची संख्या फार मोठी आहे. काही ठिकाणं, घरं, सोसायटी सोडल्या तर बहुतांशी सर्वत्रच एक वस्तुस्थिती आढळते ती अशी कि "देवालय = देवाची खोली" वेगळी अशी कुठेही दिसत नाही. अर्थात जागा नसते, बजेट मधे बसणारी, विकली जातील अशी घरे बांधण्याकडे कल आहे आणि तो घेण्याकडे देखील. मग फर्निचर करतांना देव्हारा कुठेतरी भिंतीवर किंवा स्वयंपाकघराच्या कोनाड्यात तय्यार केला जातो. ज्याने हे घर दिलं, घर बांधण्याकरता जे कष्ट लागतात ते बहाल केले, बुद्धी दिली, शक्ती आणि युक्ती प्रदान केली, ई. साठी जागाच नाही. आधी मला हे खूप खटकत होतं पण आता नाही.  आता खरं कारण समजलं ते असं कि गेले तीन दशकं घरची स्त्री बाहेर पडली आहे अर्थार्जनासाठी. मग व्यवस्थित देव, धर्म, व्रत, वैकल्ले, उपवास, पूजा, अर्चा ई. कोण करणार. मग फक्त असण्यापुरते देवांचे फोटो ठेवण्या ऐवजी नकोच ते. आधीच्या काळी होती तशी अंगणात बाग नाही, घरची फुले नाहीत, सकाळ-संध्याकाळ, सणावारी पूजा करायला शांतपणे अजिबात शक्य नाही मग त्या ऐवजी हातातले काम यथाशक्ती, मनोभावे करा, जमेल तेवढी गरजूंना मदत करा, सत्कर्म करा, गरजेला धावून जा, कोणाला दुखावू नका, कोणाचे नुकसान करू नका, कोणालाच अडवू नका, सन्मार्गाने पुढे जा नेहेमीच, विचार आणि आचार सर्वोत्तम ठेवा, नतमस्तक व्हा, तुम्हाला जे जे मिळाले आहे त्या बद्दल धन्यवाद द्या त्या देवाला किंवा सृष्टीला किंवा त्या एका सर्वोत्तम ताकदीला, बास पोचेल "त्याला" सर्वकाही. दोन हस्तक आणि एक मस्तक पुरेसे आहे. आरत्या, स्तोत्र पठण, मंत्रोच्चार ई. सर्वांचे वेगळेच महत्व आहे पण ते जर काही कारणांनी घडत नसेल दररोज तर अर्धवट करण्यापेक्षा न केलेले बरे. कदाचित म्हणूनच ह्या भक्तिगीतांचा अर्थ समजून त्या पद्धतीने वागणे जास्त महत्वाचे आहे सध्या मध्यम वर्गीयांसाठी. 


मी एवढ्यातच एक नवीन नोकरी बद्दल ऐकले आहे ती म्हणजे एका सोसायटीत म्हणे एक मावशी दररोज येतात, अनेक घरांमधे जातात आणि दररोजची देवांची पूजा करतात. हि त्यांची नोकरी आहे. ठरलेल्या ठिकाणी जायचे, व्यवस्थित देवांची पूजा करायची, देवघर साफ करायचे, फुलं - पानं वाहायची आणि पुढल्या घरी जायचं. हा एक पर्याय आहे असं दिसतंय. 


मी आताच एक वाक्य वाचलं, कि तुम्ही जितक्या जास्त लोकांचे, ठिकाणांचे, संपर्कात आलेल्यांचे आणि इतर सर्वांचे आभार मानला तितक्या जास्त कृतज्ञता व्यक्त करण्यासारख्या गोष्टी तुम्ही आकर्षित कराल. "the more you are thankful, the more you attract things to be thankful for". आणि हे सगळं आधी शांतपणे, स्वतःसाठी, बोलबाला न करता, मनातल्या मनात करत राहा, जेव्हा जमेल तेव्हा, त्याला काही काळ वेळ नाही. आधुनिक गुरु देखील म्हणतातच ना, प्रत्येक श्वासाचे आनंदाने स्वागत करा, आभार माना, अगदी तसेच आहे. मानसपूजा म्हणजे तरी वेगळं काय ना? बास मग करत राहाच. 

https://www.aathavanitli-gani.com/Song/Dev_Devharyat_Nahi



शुक्रवार, २० जून, २०२५

२२०६: लगबग / लगीनघाई

आज जरा जास्तच पहाटे खूप लगबग सुरु आहे असा भास झाला मला, खूप सगळे, म्हणजे अख्खे कुटुंबीयच गडबडीत दिसले. मला आधी काही उमजेना, समजेना. मी तशी जागेपणी साखर-झोपेतच होते म्हणून असेल. पण त्यांच्या लगीनघाईने मला जाग आलीच. नीट ऐकलं, बघितलं तर जास्त काही लक्षात आले नाही. पण जसजसा मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, निरखून बघितले, त्यांची ये-जा नीट लक्ष देऊन बघितली तेव्हा कुठे प्रकाश पडला डोक्यात. एक म्हणजे अहो हा जून महिना नाही का, आणि त्यात तसा दुसरा आठवडा म्हणजे नवीन शाळा, दप्तरं, वह्या, पुस्तके, बुटं ई. हि झाली एक बाजू, पण सर्वात महत्वाची दुसरी बाजू म्हणजे आईची, घरच्यांची. डब्बा करण्याची गडबड, मुलांना उठवण्यापासून ते तय्यार करून शाळेत पाठ्वण्यापर्यंत दमछाक. आणि अर्थात मी विसरलेच होते त्या झुंजूमुंजू पहाटेच्या उत्साही वातावरणात कि आज महत्वाचा दिवस त्यात, योग-दिवस. त्यामुळे प्रत्येक शाळेत काही ना काही कार्यक्रम असणारच. कालची पालखीची सुट्टी दिली होती त्यामुळे आज शाळेचा दिवस होता हो. त्यामुळे दिवस लवकर सुरु झाला होता आणि तो मी दुरूनच पण अतिशय मनापासून उपभोगला, अनेक वर्षांनी पुन्हा एकदा.


तर त्याचं काय झालं, मी गजर लावला होताच लवकर उठायचा आज कारण माझा पण एक पिटुकला कार्यक्रम होता, त्या आधी मस्त तय्यार व्हायचं होतं. पण बघते / ऐकते तर काय सुमधुर आवाजानेच, त्या गंमतीदार लगबगीचा सूर कानावर पडत राहिला आणि मी वेगळ्याच उत्साहाने उठले. आज भारद्वाज कुटुंबीयांची लगबग त्यामुळे ह्याची देही ह्याची डोळा अनुभवता आली हो. क्या बात है. मला वाटत होतं आपल्याच कडे पहाटेची गडबड असते जेव्हा शाळकरी मुलं घरी असतात, पण छे हो, भारद्वाज काही कुठेही कमी नाहीत. मज्जा आली. आता ठरवलंच आहे कि रोज ह्यांची सकाळची कवायत, धावपळ अनुभवायची खिडकीत बसून. अहाहा च.

hashtagIYD hashtagYogaDay hashtagYog hashtagSchoolReopning hashtagBackToSchool hashtagPerspectiveMatters hashtagRefreshingStart hashtagSchoolRoutine hashtagObservation hashtagNature hashtagNatureBeauty

सोमवार, १६ जून, २०२५

२२०3: माशी


माझे वडिल नेहेमी म्हणायचे कि झाडासारखं व्हा, देत राहा, कार्यरत राहा आणि फळाच्या / अभिप्रायाची / शाबासकीची वाट न बघता पुढे चालत राहा, मार्गक्रमण करत राहा. मी अनेक वर्ष चारचाकी चालवते आहे, त्यातून चक्कर मारते आहे, अनेक कॅब्स मधून प्रवास केला आहे आणि घरी सुद्धा हे अनुभवलं आहे ते म्हणजे अनेकदा एखादी माशी गाडीत, किंवा खोलीत अडकते. मग ती बाहेर पाडण्यासाठी धडपडते, आवाज करते. इतकास जीव तो पण आपल्यासारख्या माणसाला तिचा आवाज नकोसा करून टाकतो. मग आपण शर्थीचे प्रयत्न करून तिला मोकळे करतो. ती कुठून आत येते आणि का येते  हे अजूनही माझ्यासाठी गूढच आहे बरं का मंडळी. आज मला इतक्या वर्षांनंतर एक प्रश्न पडला कि ती बाहेर पडते घराच्या किंवा गाडीच्या तेव्हा कुठे जाते? तिच्या कुटुंबियांना किंवा आप्तेष्टांना कशी गाठते किंवा ओळखते? कारण हे सर्वांनी अनुभवलं असेलच अनेकदा कि एका पिटुकल्या माशीला चालत्या गाडीतून बाहेर काढणं म्हणजे एक लढाई असते सर्वांसाठीच, आणि नेहेमीच. ती गाडी खूप दूर कुठेतरी गेल्यावर मग जर तिला मार्ग मोकळा मिळाला तर ती बाहेर पडते आणि मग उडत कुठे जात असेल बरे? तिला नेहेमीच तिचा मूळ ठावठिकाणा मिळतं असेल का? कि ती मग मिळतील त्या माश्यांशी दोस्ती करते का एकटीच राहते? 


ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न मग मी सुरु केला. ते थोडसं सोप्प होतं माझ्यासाठी कारण मी ह्या आधी "जैव-प्रेरित अल्गोरिदम" ह्या वर काम केले आहे.  मी अजूनही वाचतेच आहे, समजावून घेते आहे पण एक ठळक बाब लक्षात आली कि ती इतकीशी पण कधीच थांबत नाही कि "अरे आता मी काय करू? कुठे जाऊ? माझे सगळे लोक कुठे असतील? हि मी कुठे आली अचानक?" ई. हे सगळं मागे सोडून ती नवीन मित्र शोधते, नवीन दोस्ती करण्यावर भर देते, ती तिचे / तिला बहाल झालेले सगळे वापरून नव्याने सुरवात करते प्रत्येक वेळी. मग आपण धडधाकट माणसे हे का नाही करू शकत? आपण का थांबतो? का दुसऱ्यांनीच हे करावं ह्या साठी वाट बघतो, अपशब्द वापरतो, दोष देतो? ह्या छोट्या जिवाकडून कित्ती शिकण्यासारखे आहे. सर्वांनी ते आत्मसात करणे अत्यावश्यक आहे असं माझं मत आहे.  प्रयोग म्हणून एकदा करून बघा कशी मज्जा येते ते. असं म्हणतात ना "sky is all yours, fly high". 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...