गुरुवार, २ मार्च, २०२३

गोंधळलेला बुद्धिवान

चूक नाही म्हणणार मी पण गडबड झाली आज चुकून एका भल्या मोठ्या बुद्धिवाना कडून. अगदी अशक्य वाटेल असं, पण घडलं खरं, आणि माझ्या सोबत, अगदी आज. 

मी माझ्या एका मैत्रिणीला मेल चं उत्तर देतं होते. सुरवात करतेवेळी कृत्रिम बुद्धिमत्ता ने घडवलेले मॉड्युल नेहेमीप्रमाणे जागे झाले आणि "डिअर सर" असं छापून आलं. मी अवाक, म्हटलं माझ्या चार डोळ्यांना काही भलतं दिसतंय का? डोळे चोळले, चष्मा पुसला आणि पुन्हा बघितलं तर "डिअर मॅडम" असं आपोआप लिहून येण्याशिवाय सर म्हटलं गेलं. बरं ह्या माझ्या मैत्रिणीला, सहपाठीला मी ह्या आधी कित्येकदा मेल केला आहे, पहिल्यांदा करत नाही आहे. शिवाय तिचं नाव नेहेमीचं मुलींच नाव आहे, वेगळं किंवा भलतं नाव नाहीच, कुठलाही गोंधळ, घोटाळा नाहीच. मग हे का झालं हे डोक्यात येण्या ऐवजी मला काहीतरी वेगळं सुचलं ते मग मी माझ्या सहपाठीला लिहून पाठवलं ताबडतोब, अगदी थोडक्यात. सर हि एक भली मोठी पदवी, मान, सन्मान आणि ते देखील त्या जुन्या जमान्यात दिलेला ब्रिटिशांनी दिग्गज मान्यवराला बहाल केलेला. त्या काळी सर म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. त्याचाच एक भाग म्हणजे आपल्या भारतात वापरली गेलेली साहेब हि पदवी, किंवा सन्मान. 

माझ्या मैत्रिणीला जी एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे, खूप कष्टाने बहारदार पणे स्वतःची एक जागा निर्माण केलेलं असं, आणि ते देखील बऱ्याच पातळीवर, एक शिक्षिका, संशोधक, लेखक, विद्यावाचस्पती आणि त्या पुढील संपादलेलं ज्ञान आणि इतर अनेक असे मोठे हुद्दे. अनेक वर्षाची विविध स्तरावरची महत्वाची स्थानं भूषवलेली व्यक्ती, मान्यवर आणि अश्या साठी सर हि पदवी बहाल झालीच पाहिजे. सर ह्या मागे कुठलेही लिंग किंवा भेदभाव वगैरे नाहीच. एक शान आहे फक्त. मग जर ह्या कृत्रिम बुद्धिवानाने (AI Module) अश्या सगळ्या माहितीमुळे सर म्हटलं तर ते गौरवोद्गारच नाही का? तो बुद्धिवान फक्त नावावर न जाता संपूर्ण पार्श्व भूमीवर भर देणारा निघाला. अहाहा च. क्या बात है? कधी कधी असा गोंधळ व्हायला हवा नाही?, मस्त काही तरी वेगळं, विस्मृतीत गेलेलं भन्नाट काही डोळ्यासमोर उभं ठाकतं. 

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३

बहुमूल्य मदत

हि आहे माझ्या एका सख्या मैत्रिणीची पिटुकली एक कहाणी. अर्थात तिच्या परवानगीनेच मी हि अनुकथा लिहिते आहे तिचे नाव जाहीर न करता. "नावात काय आहे?", हा अनुभव कोणाला आला आहे ह्या पेक्षा तो काय आहे, किती महत्वाचा आहे आणि त्यातून काय बोध घ्यायचा हे जास्त महत्वाचं. 

माझी हि जी मैत्रीण आहे, तिचा एक वर्ग मित्र, अगदी लहानपणीचा. त्यावेळी कुठल्याही प्रकारची संवाद साधण्याची साधनं नव्हती आज सारखी त्यामुळे एकदा त्यांचं कॉलेज संपलं आणि संपर्क देखील, कायमचा. त्याचं लग्न फार लवकर झालं काही कारणांस्तव आणि हि खूप शिकली, नोकरी केली ई. त्याच्याकडे एका पाठोपाठ एक दोन कन्यारत्न जन्माला आले आणि हिने पहिल्यांदा नोकरी, स्थिरावणे, मग संसार असा मार्ग पत्करला. गेले काही २-३ वर्षांपासून त्यांच्या वर्गातले सगळेच सोशल मेडिया मार्फत जोडले गेले अचानक आणि संवाद पुन्हा सुरु झाला. त्याच्या मोठ्या मुलीचं लग्न ठरलं आहे, इतक्यातचं साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडला, होणारा जावई भारतीय असला तरी परदेशात स्थायिक आहे. लग्नाची तारीख इतक्यातच ठरली आणि त्याने हिला आमंत्रण पाठवले, अर्थात आग्रहाचे. हिने जेव्हा ते आमंत्रण नीट बघितले / वाचले तेव्हा हिला महद आश्चर्य वाटले. काहीतरी फार मोठ्या प्रमाणात अशक्य असे घडले होते. दाही बोटं तोंडात, अशी काहीशी तिची अवस्था झाल्याशिवाय राहिली नाही, डोळ्याच्या कडा पाणावल्या आणि अगदी मनापासून "त्याचे" पुन्हा एकदा हात जोडले गेले. 

ह्या माझ्या मैत्रिणीने सातत्याने लहान मोठी नोकरी केली. मुलांना पाळणाघरात ठेऊन वगैरे, सतत पळत राहिली आणि तिच्या क्षेत्रात प्रचंड उंची गाठली, नाव कमावले. पण आता तिला अनेक कारणांसाठी थांबावंसं वाटतंय. तिने राजीनामा देण्याचा महाकठिण निर्णय घेतला आहे. तिला खूप महिने आधी आंतरराष्ट्रीय कंपनीच्या नियमाप्रमाणे, तिच्या हुद्याप्रमाणे कळवावे लागते तिच्या निर्णयाबद्दल आणि तारखे बद्दल. आपण सर्वांनीच हे खूपदा ऐकलं असेल, वाचलं असेल, अनुभवलं असेल कि इतक्या वर्षाची सुंदर चाललेली नोकरी थांबवणं खूप अवघड आहे, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि अश्या असंख्य पातळीवर. 

योगायोगाने तिचा ठरलेला शेवटचा कामाचा कंपनीतला दिवस आणि मित्राच्या मुलीच्या लग्नाचा मुहूर्त अगदी लागोपाठ आहे. हि १ तारखेला मोकळी होणार आणि लग्न त्याच महिन्यात ३ तारखेला आहे. त्यामुळे १ तारखेला संध्याकाळी / रात्री किंवा जास्तीत जास्त २ तारखेला पहाटे तिला प्रवास करायला निघावं लागणार कारण लग्न दुसऱ्या शहरात आहे. तिने त्या राज्यातलं लग्न ह्या आधी कधीही बघितलं / अनुभवलं नाही आहे. लग्नाच्या दिवशी रविवार सुट्टीचा वार आहे त्यामुळे सगळे वर्गमित्र, जुन्या मैत्रिणी येण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

ह्याला योगायोग म्हणावा का "त्याचं" भन्नाट, उत्कृष्ट प्लँनिंग? "त्याने" परदेशातील त्या मुलाला, त्याच्या कुटुंबीयाला सुबुद्धी दिली, सर्वांची ओळख करून दिली, सगळं बिनभोबाट जुळवलं, अगदी जवळची तारीख निश्चित केली, इतक्या वर्षांनी सर्वांना एकत्र आणलं, आणि हि यादी फार मोठी आहे. काय म्हणावं ह्या सगळ्या घडामोडींना? कोण म्हणतो कि "त्याचं" लक्ष नसतं? बघा म्हणजे माझ्या मैत्रिणीला कित्ती साथ देतो आहे तो अप्रत्यक्ष, कित्ती ते कष्ट. ती निवृत्त झाल्याचं होणारा किंचित क्लेश, यातना, अस्वस्थता आहे त्या पासून थोडीशी दूर राहिलं, कदाचित नवीन संधी मिळतील किंवा नवीन खाद्य. "त्याच्या" मनात काय आहे, त्याचा प्लॅन काय आहे हे माहित नाही, पण खूप भन्नाट असणार ह्याची कल्पना येते आहे ह्या सगळ्या मांडणीतून नक्कीच. मी हा अनुभव ऐकून निःशब्द झाले, "त्याच्या" पुढे पुन्हा एकदा नतमस्तक झाले. "श्रद्धा आणि सबुरी" ह्यावरचा विश्वास पुन्हा दृढ झाला.   

Awesome blessings

Now at this juncture I don’t know why but suddenly recollected many firsts written on my name. Of course, when I look back, it feels so amazing that I was the chosen one for all these firsts. I was able to contribute as I had the energy to work, think, and act on it. HE and HIS plans worked wonders for me. I am truly thankful to HIM for everything.

It all started at the degree level, bestowed with a first-girl engineer from my mother’s and father’s sides too. It felt nice then, but it never affected me at all. After getting hitched too I retained the same title, the first girl engineer of the family.

It was just the beginning of firsts by HIM, went on to become “first of its kind” mother from mom’s, mother in laws and other relatives side. Blessed with twins, a uniquely-different journey started along with my PhD. First ever girl to work abroad, drive on foreign roads, and earn a PhD too. Doctorate girl in all family members, first of its kind and at the department too. Yes, there was a faculty member before me, but he actually belonged to another department. First female faculty member from the department to become a PhD advisor; first one to earn an international grant from a giant like Microsoft in the department; first one whose PhD scholar went abroad on a fully paid trip; first one who got the opportunity to visit in person to help start a new engineering college; first one in the immediate family to author three books in a row, one technical and two in mother tongue. First female faculty member in the department to conduct many research paper writing workshops continuously for many researchers in the university, etc., to name a few.

HIS blessings and HIS wishes are behind these achievements for sure, but in this journey along with me, he motivated all my family members, colleagues, friends, students, and relatives to help me consistently. All credit goes to HIM. A huge and countless thanks to all those who made it feasible. Lucky me.

खरा उपयोग

ह्याची सुरवात झाली मला समजायला लागल्यापासून, संक्रांतीच्या हळदी कुंकवापासून, त्याच्या वाणापासून. मग प्रकर्षाने आणि उत्साहाने त्यावर भर पडली जेव्हा मी पहिल्यांदा किंवा सुरवातीच्या काळात विमानाने प्रवास करायला लागले. आणि सध्या तर त्याचा कहरच झाला आहे, म्हणून म्हटलं चला लिहावं.

अगदी पिटुकल्या वस्तू वाण म्हणून मिळाल्या कि स्वर्ग सुख प्राप्त झालं असं वाटायचं. इतकं कौतुक होतं त्याचं आणि ते लहानपणीपासून सुरु झालं ते आज अर्धशतकी वाटचाल झाली तरी सुरु राहील. आज मला समजलं कि कुठल्याही उत्पादनासाठी पिटुकली डब्बी का वापरली जाते, का तय्यार केली जाते, किंवा ते उत्पादन मग ते चेहेऱ्याला लावण्याचे क्रीम, मलम, बाम किंवा अजून काही. एक कारण म्हणजे आधी छोट्या प्रमाणात वापरून बघा, आवडलं तर मोठी डबी विकत घ्या. दोन म्हणजे चेहेऱ्याला लावण्याचे क्रीम, मलम, बाम कमी प्रमाणातच लागतात. तीन म्हणजे प्रत्येकाची कातडी वेगळी असते, मोठी डबी एकदम घेतली आणि ती नाही सूट झाली तर वायाच जाणार. चार म्हणजे प्रत्येक मुलगी / महिला सध्या घराबाहेर पडते नोकरी निमित्य किंवा प्रवास करतांना सोबत स्वतःच्या आवडीचं / अनुरूप आणि सोयीस्कर घेऊन जायला छोटेखानी डबीच योग्य, नाही का?

पण छे हो, हि सगळी कारणं म्हणजे चिल्लर, खरं कारण म्हणजे चेहेऱ्याला लावण्याचे क्रीम, मलम, बाम ई. संपलं कि ती देखणी, मजबूत, छोटीशी डबी स्वच्छ घासून पुसून मग कुटलेली सुपारी, लोणचं, जाम ई. घेऊन जायला, किंवा कानातले ठेवायला असं वापरलं जातं  प्रत्यक्षात.

आता समजलं कि हि डब्बी त्या उत्पादकाने खरं का तय्यार केली ते? आहे कि नाही मज्जा.

मला तर खूप खूप सोय होते, फक्त मलाच नाही माझ्या लेकरांना / घरच्यांना देखील किंवा कोणालाही हे बाहेर जातांना काही तरी घालून घ्यायला. आहे कि नाही भन्नाट खरा उपयोग अश्या पॅकिंग चा, पुनर्वापर. माझी खात्री आहे तुम्ही पण असंच काहीसं करत असलंच. सांगा बरं पटापट काय काय करता ते?

आणि जर यदाकदाचित तुम्ही असा पुनर्वापर करत नसाल तर करायला लागा आणि बघा तुम्हालाच नाही तर जे पुनर्वापर केलेली डबी बघतील त्यांना पण किती मज्जा येईल ते. अहो साधं गूळ तूप न्यायला पण प्रचंड उपगोय होतो अश्या पिटुकल्या डब्यांचा. दररोज तोंड गोड होतं, गूळ तूप पौष्टिक त्यामुळे कदाचित फॉलिक ऍसिड वगैरे मिळतं म्हणे, जास्त जड पण होत नाही आणि मोठी जागा पण लागत नाही.

त्या छोट्या डबी सारखी छोटी छोटी गम्मत रोज अनुभवा. 

शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३

हवीहवीशी

वैज्ञानिक दृष्टिकोनाने आणि माझ्या मते आपण सर्वजण एकमेकांशी संवाद साधू शकतो प्रत्यक्ष एकमेकांसमोर किंवा तंत्रज्ञानाचे साधन वापरून ते केवळ हवा ह्या माध्यमामुळे. संवाद फक्त सजीव व्यक्ती साधू शकतात, सजीव राहण्याकरता जीव असावा लागतो, म्हणजेच श्वाशोश्वास सुरु असावा लागतो आणि त्या करता देखील हवा, वारा च लागतो. तो काही अंश देखील बंद पडूच शकत नाही. हे झाले अगदी बेसिक. त्यानंतर क्रमाने अनेक गोष्टी येतात ज्या हवेशिवाय अशक्यच आहेत, चालणे, धावणे, गाडी / चारचाकी / सायकल / बस ई. चालवणे. हि यादी खूप मोठी आहे आणि हे सर्वश्रुत आहेच. 

ह्या विश्वात प्रत्येकजण हवेत नकळत काही ना काही मिसळत असतोच, सुगंध, दुर्गंध, वास, सुवास... काही नैसर्गिक असतात तर काही अनैसर्गिक. 

ह्या व्यतिरिक्त मानवनिर्मित कचरा, त्या कचऱ्याला गरज म्हणून किंवा दिलेले काम म्हणून पेटवणारा माणूस, महानगरपालिकेचे कर्मचारी ई. मुळे हवेत मिसळणारे घटक, अगदी घरोघरी होणाऱ्या स्वयंपाकाचा सुवास, देवळांमधे किंवा इतर धार्मिक ठिकाणी होणारे होम-हवन आणि त्या धुराचा हवेशी येणारा संपर्क, प्रदूषण, कारखान्यांमुळे हवेत मिसळणारे धूर, वर्षभर उडणारे फटाके, आणि अश्या इतर अनेक कारणांमुळे हवेवर चारही बाजूनी, आठही दिशांनी, अहोरात्र सातत्याने भडिमार होतंच असतो. पण तितक्याच ताकदीने किंबहुना कणभर जास्त प्रकर्षाने हवा स्वतःला शुद्ध करण्याचा, ठेवण्याचा अविरत प्रयत्न करत असतेच, न थकता, न थांबता. जे भल्या पहाटे किंवा सकाळी कामाला, व्यायामाला किंवा चालायला बाहेर पडतात त्यांना नक्की विचारा हवा अगदी दररोज कित्ती शुद्ध असते ते.  अर्थात हा देखील एक वैज्ञानिक आणि नैसर्गिक चमत्कारच आहे. पण तरी देखील आहे हे महत्वाचं नाही का? आणि हा सगळा आटापिटा फक्त सजीवांसाठीच, म्हणजे दुसऱ्यांसाठी. 

अगदी तसेच प्रत्येकाला चारही बाजूनी, आठही दिशांनी जरी शाब्दिक किंवा मानसिक भडीमार होत असला तरी एक क्षणभर डोळे मिटा, हवेचा स्पर्श अनुभवा, आपोआप हवेच महत्व देखील येईल लक्षात आणि सगळे मळभ दूर जातील नकळत. असं करत राहिलात तर काही म्हणजे काही कचरा साठणार नाहीच आणि तुम्ही अगदी पक्षांसारखे उंच विहार कराल जमिनीवर राहून देखील. 

साथ

मी मागे एकदा लिहिल्या प्रमाणे प्रत्येक सजीव किंवा निर्जीव व्यक्ती अथवा वस्तू तुमच्या संपर्कात येते ती फक्त योग्य वेळेलाच आणि राहते / टिकते फक्त योग्य कालावधी पुरती, किंचित कमी नाही का जास्त. मग तो एखादा बहुमूल्य सल्ला देणारा

  • चित्रपट असो 
  • व्यक्ती 
  • वाक्य 
  • म्हण 
  • अनुभव
  • स्वानुभव 
  • प्रसंग 
  • घटना 
  • वस्तू
  • पदार्थ 
  • जिन्नस ई. 

त्या कालावधी नंतर मग तुम्ही म्हणे समर्थ असता स्वतःला आणि इतरांना सांभाळण्याकरता म्हणून हा ठरलेला कालावधी आणि सहवास. प्रत्येकाला अगदी प्रत्येक गोष्ट अगदी पर्मनन्ट, कायमची राहावीशी वाटते शाश्वत असल्यासारखी. कदाचित बऱ्याच जणांना आपण देखील असावं असं वाटतं असणार त्यांच्या सोबत अगदी नेहेमीसाठी, पण ह्या संपूर्ण अशाश्वत विश्वात हे संभव नाही. त्यामुळे खूप समीकरणं मांडण्यात वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका. ह्याचा अर्थ   काहीही घाईत करा, निर्णय घ्या असं नाही. संपूर्ण चौकशी करा, विचाराअंती सगळं करा पण त्याला मर्यादा असू द्या. मन विचलित होणं स्वाभाविक आहे मग त्यावेळी उत्कृष्ट घटना, प्रसंग, वाक्य, म्हणी ई. आठवा, हात जोडा, "त्याचं" स्मरण करा, आप्तस्वकींसोबत वेळ घालावा, छंद जोपासा आणि तुम्हाला त्यातून नक्की मार्ग सापडतं जाईल हे निश्चित. 

वाढणे

मी शरीर विज्ञानाची तज्ज्ञ नाही पण ऐकीव माहिती आहे आणि शिवाय काही डॉक्टर्स कडून किंचित तपासून घेतलंय जे माझ्या मनात आलं आहे ते. जन्माला आल्यापासून ते त्या नंतरची बरीच ठराविक वर्ष प्रत्येकाची वाढ होत असते, शारीरिक आणि मानसिक. शरीराची उंची वाढणे म्हणजे प्रत्येक अंतर्गत अवयवाची वाढ होणे. प्रत्येक अवयव हा प्रत्येक दिशेने वाढतो, वरच्या, खालच्या, आडव्या ई. त्याच्या त्याच्या स्वभाव धर्मा प्रमाणे, त्याला आखून दिल्या प्रमाणे. वाढ होणं बऱ्याच घटकांवर अवलंबून असते. माझ्या मते शारीरिक वाढ खूप काही शिकवून जाते, जेव्हा वाढण्याचं वय असतं तेव्हाच नाही तर त्या नंतर सतत. निसर्गानेच बघा ना कसं ठरवलं आहे कि प्रत्येक हाडांची, त्या बरोबर अगदी सगळ्यांची वाढ आधी नमूद केल्या प्रमाणे वरच्या दिशेला जितकी होते तितकीच खालच्या दिशेने सुद्धा. ह्याचा अर्थ प्रत्येकजण जितके स्वतःला मोठं झालेले समजतं (गैरसमज) तेवढ्याच प्रमाणात त्याला जमिनीवर भक्कम पाय रोवून घट्ट उभं राहण्याची "त्याने" सोय केलेली असते. पण त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून बहुतांशी सगळेच उंचच उंच भरारी घेऊ इच्छितो, किंबहुना घेतोच. इतका उंच जातो कि परतणं अत्यंत अशक्य आणि अवघड होतं. हे असं उडणं प्रत्येकवेळी, प्रत्येकाला फायद्याचं ठरतं असं नाहीच. मग त्या बेसलेस उंचीवर टिकाव अवघड होतो आणि मग आपटायची भीती असतेच. 

त्यामुळे निसर्ग दर्शवतो आहे असंख्य वर्ष त्या बाबींकडे लक्ष द्या. तुम्ही कुठल्याही वयोगटात असाल तरी अजूनही किंवा कधीही उशीर होत नसतो. आत्ता हे लक्षात घ्या आणि त्या प्रमाणे फक्त स्वतःच्या परमानंदासाठी तरी हा फॉर्मुला, हि वाढण्याची पद्धत / कन्सेप्ट लक्षात घ्या आणि बघा तर आजमावून. 

मी येथे मांडलं तसं नसतं तर एकाच दिशेने काही किंवा सगळे अवयव वाढले असते. पण सरसगट सर्व मानवांच्या बाबतीत हे घडतं म्हणजे त्यात तथ्य आहेच. हे असं नसतं तर शरीर बेढब दिसलं असतं कदाचित आणि त्याचा परिणाम मग बाकी बऱ्याच सामाजिक स्तरावर / गोष्टींवर झाला असता. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट हि एका सुबक सुंदर आकारात लागते, मग वैचारिक पातळीवर उत्कृष्ट फॉर्म कडे लक्ष द्यायला हवे, चाचपडून बघायला हवे.  प्रिव्हेंशन इज ऑल्वेज बेटर द्यान क्युअर.   

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...