बुधवार, २ जून, २०२१

गुरु

छूकर मेरे मन को
किया तूने क्या इशारा
बदला ये मौसम
लगे प्यारा जग सारा....

गुरुपौर्णिमेचा दिवस होता परवा. सकाळी गाडीतून ऑफिस ला जातांना हे गाणं ऐकलं. आणि अचानक मला ह्या गाण्याच्या धुर्वपदात आणि त्या खास दिवसात साम्य आढळलं. म्हणून हा उहापोह इथे लिहिण्याचा.

खूप वर्ष / दिवस जेव्हा तुम्ही कोणा यशश्वी किंवा माननीय व्यक्तीला (/वस्तू, प्राणी, .) ऐकता, निरीक्षण करता, अनुसरण करता . तेव्हा तुम्ही त्यांना गुरु स्थानी मानता, अर्थातच अपवाद आहेत बरेच "गुरु" ह्या संस्थे बद्दल. असो.

तर माझ्या मते मनाला स्पर्श जो करतो तो गुरु (त्याच्या वागण्याने, बोलण्याने, कृतीने .), बरोबर. =>छूकर मेरे मन को
(
श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतातच "बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले")

आणि गुरु हे सतत शिष्याला अचूक मार्ग दाखवत असतातच, कळत-नकळत. ज्यामुळे बहुतेक प्रत्येक वेळेला शिष्याला नवनवीन शिकायला मिळतं, बोध मिळतो...=> किया तूने क्या इशारा

जणू काही आजूबाजूच सगळं जगच बदलत चाललंय किंबहुना बदललंय. =>बदला ये मौसम

इतकं कि चहूबाजूला शांतता, आनंद, परमानंद आणि बरच काही ह्याचा अनुभव येतोच. => लगे प्यारा जग सारा....

Wrote this on my FB timeline on July 19th 2019.

पालवी...

ऋतू चक्र कसं अविरत चालूच असत नाही. माझ्या कचेरीच्या रस्त्यावर बऱ्याच आमराई आहेत. आंब्याच्या मोसमात तर अस्सा मोहोराचा सुगंध दरवळतो म्हणून सांगते, अहाहा . आता आंबे संपले तर निसर्गाने लागलीच दुसरा टप्पा म्हणजे नवीन पालवी चा बहर आला. आधीच संपूर्ण आमराईत विविध आकाराची, उंचीची आणि हिरव्या छटांची झाडे आहेत आणि त्यात भर म्हणजे आता हि नवीन पालवी. प्रत्येक झाडाला जसा कि मुकुटच चढवला आहे कोणी तरी अस्स दिसतंय. डोळ्यांचं पारणं फिटत अगदी रोज, असे नवं-नवीन उत्कृस्ट दृश्य पाहून.

वर विविध रंगी ढग, मध्ये अचंबित करणारे डोंगरांचे आकार, नंतर हि झाडे ज्यात बहरलेली कोवळी पालवी, नवीन पानांनी आच्छादलेली हिरवी पाने, झाडांचा बुंधा आणि ओलसर जमीन... अहाहा. क्या बात है....आणि हे सगळं अपेक्षा विरहित अविरत चाललेलं चक्र.

नाडा

नागपुरात असतांना सिताबर्डी आणि विविध मोदी गल्लीची सैर म्हणजे फारच मोठी पर्वणी होती, अनेक तास निघून जायचे. अनेक तास आनंदाने उपभोगले जायचे हे हि तितकंच खरं. बहुतेक मैत्रिणीसोबत जाण होत असे आणि व्यवस्थित यादी करून जात असू आम्ही, अर्थात व्हेरिएटी चौकात उतरलं कि रस्त्याने चालता चालता अनेक अजून छोट्या छोट्या वस्तूंची भर पडायचीच यादीत नसलेल्या. आणि काही वस्तू ह्या यादीत नसायच्याच पण आवर्जून घेतल्या जायच्या त्यात नाडा हा होताच. नाडा हि वस्तू बहुउपयोगी होती, घरात सतत लागत असे. फक्त पायजम्यात नाही बर का, हे बांधायला ते बांधायला लागत असे. त्यामुळे एखाद बंडल आणलं जायचंच न कळत. स्त्री पुरुषांच्या पारंपारिक वेशभूषेत आणि अनेक जणांच्या रोजच्या वापरातला हा नाडा. अर्थात आता तो अजिबातच निरुपयोगी झालाय ते वेगळं. माझा लेक वर्षातून एकदा कुर्ता पायजमा घालत होता, आता त्याने कुर्ता जीन्स घालणं सुरु केलं आहे. आणि बाकी कुठेच कधीच नाडा चे अस्तित्व नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

सध्या माझा दररोज चा पोशाख म्हणजे आरामदायी पायजमा आणि टी शर्ट, बास. ह्या आरामदायी पायजम्यात इलॅस्टिक शिवाय त्याच रंगाचा गुड-लुकिंग नाडा देखील दिला आहे, गरज पडल्यास वापरायला. गेले काही दिवस तो लांबलचक आणि थोडा जाडसर नाडा ओढला गेला होता आणि सारखा पायात येत होता, इरिटेट करत होता. आज ठरवलंच मी कि सोक्षमोक्ष लावायचाच. अजून ओढून बघितलं तर बाहेर येईना कारण त्याच्या टोकाला गाठ बांधली होती. आता आली का पंचाईत, मग म्हटलं जरा शांततेत त्याला पुन्हा आत ढकलुया. केली कि सुरवात. नाडा घालायची पण पिन न वापरता. दिव्य होत, खूप वेळ लागला पण पेशन्स ठेवल्यामुळे सरतेशेवटी विजय मिळालाच. मज्जा आली, मला, नाड्याला असा नवीन प्रवास करण्यासाठी, आणि अर्थातच पाजम्याला देखील.

न कळत अनेकदा आणि अनेकदिवस रोजचं मार्गक्रमण करतांना आपण असेच विविध, छोटे-मोठे, "कधीही न केलेले" असे  प्रयोग करत असतो, नाही का?, कधी उपयोगी उपकरण वापरून कधी न वापरता, कधी पुढचा विचार करून तर कधी मागील पानावरचा बोध घेऊन, कधी चिडून तर बरेचदा शांततेने, कधी सोडून देऊन तर कधी पकडून धरून, ई. गोळाबेरीज म्हणजे शिकवण नवनवीन रंगबेरंगी शिकवण आणि अधिक स्थिरता शांतता आनंद परमानंद. 

बरच झाला हा नाडा पायात लोळत होता, मला नवीन छोटीशी गोष्ट आज शिकायला मिळाली, अनेक वर्षानंतर मी नाडा घातला असेल बहुतेक, जुन्या आठवणींना उजाळा तर मिळालाच आणि ह्या चार ओळी देखील लिहिता आल्या. अहाहा. भन्नाटच. थँक्स नाडा.

खरेदी

आज च्या वर्तमान पत्रात दिमाखात एक फोटो छापून आला आहे. त्यात एक छोटी मुलगी दुकानाच्या काउंटर वर उभी केली आहे, कारण तिचे वडील तिला रेनकोट घालून बघत आहेत. देवा. मी तर अक्षरश: निशब्द झाले तो फोटो बघून.

ह्या भयानक काळात जरी दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली तरी परिस्थती अजूनही निवळली नाही, बाहेर पडणं धोक्याचं आहेच. त्यात अश्या ३-४ वर्षाच्या मुलीला घेऊन... म्हणजे काय बोलायचं. सध्या सगळेच घरी आहेत, शाळा बंद आहेत आणि अश्या छोट्या मुलांच्या शाळा इतक्यात सुरु नाही होणार हे सगळ्यांनाच माहित आहे, मग का?

व्हाट्सअप वर व्हायरल झालेला निरोप आहे मेडिकल तज्ज्ञांकडून कि सद्यस्थिती प्रेस्क्रिप्शन काय तर "फेविकॉल लावून घरी चिटकून बसा, बाहेर अजिबात पडू नका, ज्यांना गरज नाही त्यांनी". आता हे रेनकोट घेणं काय गरजेचं आहे, ऑनलाईन घरबसल्या मागवता येतो ना, काहीही म्हणजे काहीही विचित्र करत बसायचं. राग येतोय मला.

अगदी आवश्यक वस्तू विकत घेण्यास देखील बाहेर जायची गरज नाही, सगळं घर बसल्या मिळतंय आता. प्लिज. कृपा करा. आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे सकाळ सारखा पेपर हे छापून आणतोय, हद्द आहे. पोलीस किती आणि काय काय बघणार हो, प्रत्येकाने त्यांची स्वतः ची काळजी घ्यायला नको. जबाबदारी आहे हि प्रत्येकाची. आशा करते कि सगळे म्हणजे सगळे जण आपआपली काळजी नीट घेतील, अगदी थोडे च दिवस, हे दिवस पण लवकरच निघून जातील.


आनंदाचे डोही आनंद तरंग...

असं होतंय माझं काल पासून. का? सांगते.

सरते शेवटी काल उशिरा संध्याकाळी जाहीर झालं कि एकदाच्या १२ च्या परीक्षा नाही घेतल्या जाणार, सद्यपरिस्थितीमधे. फारच हायसं वाटलं, निर्णय ऐकल्यावर. १२ ची परीक्षा नाही घेत आहेत म्हणून मला आनंद नाही झालाय मंडळी, पण निर्णयाची वाट सगळेच बघत होते, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षण संस्था ई. तो मिळाला काल, मोकळं वाटलं. मुलांनी अगदी मान मोडेस्तोवर अभ्यास केला होता महत्वाचं वर्ष म्हणून. "गंगेत घोडं न्हायल" एकदाच. काल कोणीतरी टीव्ही वर म्हटलं कि १० लाख विद्यार्थी म्हणे ह्या निर्णयाची वाट बघत होते. बिनडोक म्हणेन मी त्यांना, सॉरी, पण १० लाख विद्यार्थ्यांसोबत २० लाख पालक, ४-५ लाख शिक्षक, अनेक ग्रॅज्युएट डिग्री देणाऱ्या संस्था ई. सगळेच वाट पाहत होते. असो.

थोडंस विषयांतर करते. माझ्या प्रेग्नन्सी वेळी माझी एक डॉक्टर देखील प्रेग्नन्ट होती. मला आणि तिला एकसारखीच काळजी होती, कशी असतील बाळ, वाढ नीट होत असेल ना? ई. डिलिव्हरी नंतर स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्यावर हायस वाटलं एकदाच, मोकळं वाटलं, दोघींना.

तसेच माझी PhD झाली तेव्हा पण अनेकांनी हा साहजिक प्रश्न विचारला, आता कसं वाटतंय?, म्हटलं "डिलिव्हरी झाल्यासारखं". काल पण पुन्हा एकदा तो च अनुभव आला, सुटले एकातून असं काहीस.  आता पुढचा विचार करायला मोकळे, अधांतरी नाही, टांगती तलवार नाही, ई.

अर्थात कुठलिका असेना, डिलिव्हरी झाल्यावर एक मोठं काम होत, पण त्या नंतरची आवाहनं तितकीच भली मोठी असतातच ना?

नेहेमीचे नॉर्मल दिवस असते तर मी काल एकदाचा निर्णय कळल्याबरोबर आज "माझ्या बकेट लिस्ट" मधल्या गोष्टी करायला ताबडतोब सुरवात केली असती उत्साहात, आता थोडं थांबणं हिताचं आहे. माझी सारखी घोकंपट्टी चालूच असायची, १२ वी ची दोघांची परीक्षा झाली कि मी हे करणार ते करणार, मोठी यादीच होती आणि आहे. पण घरबसल्याबसल्या त्या यादीतले ऑनलाईन करता येण्यासारख्या गोष्टी करतेच. बास आता. खूप झालं वाट पाहणं. 

वार्षिक स्नेहसंमेलन

माझ्या सख्या मामाचे कोल्हापुरात अतिशय प्रसिद्ध असे गणित आणि विज्ञानाचे वर्ग होते. अनेक वर्ष त्यांनी ते चालवले. ते इतके प्रसिद्ध होते त्या काळी कि त्यांना त्यांच्या क्लास च्या शेजारचा रिकामा प्लॉट भाड्याने घ्यावा लागला होता, सायकली पार्क करण्याकरता. अतिशय माफक फी, उत्कृष्ट शिकवण, मनापासून अतिशय आत्मियतेने सोप्या पद्धतीने शिकवणे ई.  ह्या करता तो क्लास फारच फेमस होता आणि राहिला अनेक वर्ष. आणि हो त्या काळी जेव्हा क्लास हि संकल्पना फारच नवखी होती.

वर्षभर मुलांना / विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर थोडासा विरंगुळा म्हणून  वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केलं जायचं. नीट वाचा मंडळी. त्या क्लास ची प्रसिद्धी इतकी होती, कि कलासचे वार्षिक स्नेहसंमेलन, इन्स्टिटयूट किंवा युनिव्हर्सिटी चे नाही बरं का. अनोखं होत सगळं. अर्थात हे सगळं जे मी आज लिहिते आहे ती सगळी ऐकिव माहिती आहे, कारण त्यावेळी मी अतिशय लहान होते. हा माझा अनुभव नाही, किंवा स्मृती नाहीत, पण असायला हव्या होत्या असं प्रकर्षाने अनेकदा वाटत मला. असो.

तर दरवर्षी ह्या वार्षिक स्नेहसंमेलना साठी दिग्गज व्यक्तींना आमंत्रण दिल जात असे. त्या व्यक्ती दिग्गज असूनदेखील सहज येत असत कारण त्यावेळी सहज सोप्प होत सगळं, माणसं साधी होती, आणि करमणूकीची साधनं म्हणजे गाण्याचे कार्यक्रम, नाटकं, थोड्या प्रमाणात सिनेमा, बास. एकापेक्षा जास्त वेळा आदरणीय माणिक वर्मांचा गाण्याचा कार्यक्रम झाला होता आमच्या कडे. काय लकी ना ते विद्यार्थी, माझ्या घरचे, सर्व ऐकणारे, अर्थात मी सुद्धा (अगदी बाळ होते, पण सुमधुर स्वर पडलेच ना नकळत कानावर). आई सांगते अगदी पहाटे पर्यंत चालत असे महेफ़िल. अहाहा. भला मोठा स्टेज, मोठाले दिवे, रेकॉर्ड करणारे कॅमेरे काहीही नव्हते तेव्हा, आणि गरज पण नव्हती कोणालाच, ना हि कलाकाराला ना हि आयोजित करणाऱ्यांना ना हि प्रेक्षकांना. ते स्वर, त्या स्मृती हे सगळं जास्त महत्वाचं होत. कलाकारांच्या तारखा सहज मिळत असत आणि सेवा ह्या दृष्टीने बघितलं जात असे. कलाकारांना फारच थोडं मानधन मिळत होत, कारण ते जास्त महत्वाचं नव्हतंच. आताच्या पिढीला थोडं अवघड आहे समजायला कारण एक साधी सतरंजी, थोड्या गाद्या आणि काही लोड लागलेच तर टेकायला एवढं अंथरलं कि कार्यक्रम सुरु. आणि ह्याला वार्षिक स्नेहसंमेलन म्हटलं जायचं. काय होते ते दिवस. काळ फारच बदलला. अर्थात प्रवाहपतीत होणं अनिवार्य आहेच. पण ह्या स्वरबद्ध, अप्रतिम, साध्या पण अमृततुल्य अश्या आठवणी चिरंतन राहणार ह्यात शंका नाहीच.

हा माझा छोटेखानी पंक्ती प्रपंच जर सहज त्या काळच्या एखाद्या जरी विद्यार्थ्यांच्या वाचनात आला तरी मला संपर्क करा, विनंती आहे  माझी, मला अजून अश्याच अनेक गोड आठवणी ऐकायला मनापासून आवडेल नक्कीच.  

अमृताहुनी गोड ....

आदरणीय माणिक वर्माजींच्या सुमधुर आवाजातले हे भजन, अभंग. माझ्या आईने देखील तिच्या काही भजनात हि संज्ञा वापरली आहे, तसेच अनेक लेखकांनी देखील. अमृताहुनी गोड .... देवाचे नाव आहेच आणि त्याची अनुभूती पदोपदी येतेच सर्वांना. त्या शिवाय हि संज्ञा चहा साठी पण वापरली जाते थोडीशी वेगळ्या पद्धतीने आणि स्पेशिअली महाराष्ट्रात अमृततुल्य असे. ह्या मागचं मला माहित असलेलं कारण म्हणजे चहा हा स्वस्त आणि मस्त, सगळ्यांना परवडणारा आणि एक तरारी देऊन जाणारे पेय. मजूर / गोर गरीब / कष्टकरी लोक ह्यांना तो अमूर्तासारखा वाटतो, भूक शमते, अधिक काम करण्याकरता उत्साह येतो ई.

गेल्या काही दिवसांपासून आमच्या घरी "वन डिश मील" चं वारं वाहत आहे आणि त्यामुळे पार्टी मज्जा सुरु आहे एकंदरीत. पार्टी म्हणजे तशी नाही हो. पार्टी म्हणजे बदल, आवडता बदल, हवाहवासा बदल, अनेक दिवसांनी केलेला बदल असं. गेले १५(+) एक दिवस तरी हे असेच सुरु असल्यामुळे आणि नेहेमीच्या "आमटी भात भाजी पोळी कोशिंबीर" ई. ला फाटा दिल्यामुळे काल थोडी गडबड झालीच. त्यामुळे आज मी लंघन करायचं ठरवलं, आणि अर्थात पूर्ण दिवस काम करायचं म्हणजे आणि थोडासा पोटाला आराम असे काही सोप्पे ठरवले खायचे. अर्थात माझं उत्कट प्रेम आहे "साधा वरण भात तूप मीठ" ह्या वर. मग काय संधी अनायस्या चालून आली होती, मग सोडते कि काय. बास ताबडतोब फोन आलाच पोटाचा धन्यवाद म्हणून आणि फार हलकं वाटलं अतिशय आवश्यक होत माझ्या साठी ते. आज हे कॉम्बिनेशन "साधा वाफाळलेला भात वरण तूप मीठ" मला अमृताहुनी गोड .... वाटल्याशिवाय राहील नाहीच. अहाहा. 

हे सगळं अर्थात मी माझ्या मुलांशी बोलत होते तेव्हा प्रकर्षाने जाणवलं कि खरं तर हा आपला संस्कार होता, विधिविशेष होता. महाराष्ट्रतात जेवण /  पंगत / वाढणं "वरण भाताची मूद तूप मीठ" ह्याने सुरु होत असे, अनेकदा शेवट देखील ज्यांना दहीभात ई. आवडत नाही त्यांच्यासाठी. हे काली डाळ, डाळ तडका आणि मसालेदार पदार्थ ह्यांना थारा नव्हता पानात. खैर असो. विसमूर्तीत गेलेलं आज आठवलं हे हि नसे थोडके.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...