काही अंशी संशोधक एक क्लुप्ती वापरतात, पेपर लिहितात आणि प्रसिद्ध जर्नल ला पाठवतात. ते जर्नल मग पेपर वाचून पोटतिडकीने काही महत्वाचे मुद्दे मांडतात आणि पाठवतात, अर्थात पेपर ऍक्सेप्ट / accept होत नाही. पण उद्देश अगदी तोच असतो. पेपर ऍक्सेप्ट / accept होणे हा नाही तर उत्कृष्ट आणि आपल्या डोळ्यांना न दिसलेल्या गोष्टी ती उच्च पदस्थ अधिकारी शोधून काढतात, त्यामुळे मग संशोधकाला त्या सगळ्या गोष्टी वर काम करून त्याचा पेपर उत्कृष्ट दर्जाचा तय्यार करता येतो. खरं पाहिलं गेलं तर असे संशोधन काय कामाचे? पण बाकी इतर असंख्य कामे करता करता छोटेखानी पेपर लिहिता आला तरी चालतं, म्हणून हि प्रथा रुजत चालली आहे.
का कुणास ठाऊक पण मला ह्यावरून दोन गोष्टी ध्यानात आल्या, १. लिव्ह-इन प्रकार, २. दुसरं लग्न. पहिल्या लग्नात झालेल्या चुका किंवा राहून गेलेल्या गोष्टी मोजून मापून, जपून, दुसरे वेळी साधल्या जातातच, फक्त मुलामुलींकडून नाही तर अक्ख्या कुटुंबियांकडून. हे योग्य नाही, पण असेच घडते आहे लिव्ह-इन मधे नाही का? राहून बघा, पटलं तर ठीक नाही तर टाटा बाय बाय. दुसरी वेळ मग जास्त काळजी पूर्वक घेतली जाते. पहिल्या लग्नात सर्वच नवीन, माणूस म्हटलं कि चुका आल्याचं. हे बरोबर नाही पण प्रवाह पतित होणं आवश्यक आहे. किंवा पहिली वेळ हि दुसरी आहे हे गृहीत धरून वागलं तर? कित्ती सुकर होईल ना लग्नात. मग ते हळूहळू संशोधन पेपर काय किंवा कुठल्याही कामात तसेच घडेल देखील, कोणास ठाऊक. बघा. जो उपाय पटेल तो आजमावा. पण ह्याला त्याला दोष देत बसू नका, कार्यरत राहा. नेहेमीच.