सोमवार, १६ ऑगस्ट, २०२१

भविष्यातील आर्थिक सुधारणा "खादी" मार्गाने !

 

काल हा फारच माहितीपूर्वक लेख माझ्या वाचण्यात आला. मॅगसेस पुरस्कार विजेत्या इला भट मॅडम ने लिहिला आहे. मॅडम लिहितात कि "खादी" हि एक विचार पद्धती आहे. प्रत्येक घराला रोजगार नक्की मिळणारच, शिवाय वातावरणाची / पर्यावरणाची काळजी घेतली जाणार, आर्थिक बळ प्रत्येकाला मिळणार ते वेगळच आणि फार मोठी प्रेरणा मिळणार ती वेगळीच "चेरी ऑन केक" जशी. चला तर मग ह्या सध्या सोप्या "खादी" विचार पद्धतीचा अवलंब करू या, जितका आणि जेव्हा जमेल तेवढा. प्रत्येक भारतीयाने वर्षातून एक जरी खादी वस्त्र प्रकार किंवा कुठलेही खादी ची वस्तू घेतली तरी आपल्या देशाच्या भरभराटीला हातभार नक्की लागेल ह्यात कणभर हि शंका नाहीच.

"खादी" बद्दल ची अधिक माहिती ह्या लेखात मिळेलच आणि शिवाय www.ecotattva.com
 ह्या वेबसाइट पण अवश्य भेट द्या. 
 
https://www.esakal.com/arthavishwa/ila-r-bhatt-writes-about-future-economic-reforms-pjp78 

भविष्यातील आर्थिक सुधारणा ‘खादी’ मार्गाने!

निरीक्षणांची भलती सवय


माझे बाबा लहानपणी गाडीतनं जातांना प्रत्येक रस्त्याची, प्रत्येक ठळक ठिकाणांची / दुकानांची ई. माहिती देत असतं, सातत्याने. मला पण मग तीच सवय लागली आणि मी पण माझ्या मुलांना प्रत्येक रस्त्याची माहिती देऊ लागले. मी शिक्षिका, त्यामुळे अनेक विध अनुभव, निरीक्षणं ई. त्यामुळे सतत बडबड चालूच. पण आज पर्यंत मला कधीही आठवत नाही कि मी मुलांना नारळ कसा विकत आणायचा हे सांगितलं. पण हो, लहानपणापासून अगदी आत्ता आत्ता पर्यंत आमची तिघांची टिम होती. बहुतेक सगळीचकडे आम्ही तिघे जात असू. सध्या नवीन दिवसात शक्य नाही आणि आता ते दोघे मोठे पण झालेत. असो. आज घरी पुजा होती. त्याची यादी मी लेकीला दिली. सगळं व्यवस्थित आणलं तिने. घरी आल्याआल्या म्हणते कशी, नारळ मी अचूकपणे बघून आणला हा मम्मा. मी काही प्रतिक्रिया देण्या आधीच म्हणते कशी "हलवून / वाजवून बघितला, भरपूर पाणी आहे त्यात, दोनदा ऐकलं मी आणि मग घेतला, दिसायला पण ताजा दिसतोय". मला फार आश्चर्य वाटलं. फार छोटी पण निरीक्षणांची कमाल होती ती. बऱ्याच वेळ मी माझं डोकं खाजवल पण काही केल्या आठवलं नाहीच कि मी कधी बोलले हिला नाराळाबद्दल, किंवा हिच्या समोर कधी विकत घेतला मी नारळ? असो.

रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

काळजी - इच्छा - कौतुक

एवढ्यातच मी लिहिल्याप्रमाणे माझ्या पायांच्या नसांना मजबुती येण्याकरता सकस आहार सुचवला आहे तज्ज्ञांनी. सकस आहाराचे फायदे डोळ्याला दिसत असले तरी देखील ते खाण्यापिण्याचे नियम पाळणं अवघडच आहे माझ्या सारख्या खवैईला. हे माझ्या लेकीला नक्की माहित आहेच. तिला माझ्या पायांची काळजी आहेच, त्यामुळे मी सांगितले ते सगळं खावं, वेळच्या वेळी, हि इच्छा देखील तिची. त्यामुळे सध्या अनायासे वेळ आहे त्याचा ती संपूर्ण सदुपयोग करून घेते आहे. आणि मला दररोज डब्यात काकडी, टमाटो ई. इतकं सुबक पद्धतीने चिरून आणि मांडून दिलेलं असत कि न खाणारा देखील नक्की आनंदाने, आणि पहिल्यांदा नजरेने आणि मग त्याच सेवन करणारच. कधी छोटे तुकडे, तर कधी मोठे, कधी आडवे तर कधी उभे, कधी काकडी खाली आणि टमाटो वर, कधी उलट, कधी अल्युमिनिम फॉईल ची उभी घडी तर कधी आडवी ई. सांगू तेवढं कमीच आहे, कौतुक आहे पोरीचं खरंच. अर्थात हे सगळं करतांना बदल हा तिला पण उपयुक्त आहेच, एकच एक काम एकाच पद्धतीने करणं पण कंटाळवाणं, नाही का?   

माझ्या दृष्टीने काळजी असणं, इच्छा होणं आणि न कंटाळता करणं, सातत्याने करणं  हे कौतुकास्पद आहेच. तिचा हा उत्साह, हि वैविध्यता कायम टिकून राहो म्हणजे तिला पुढे व्यावसायिक शिक्षण घेतांना, विविध प्रोजेक्ट्स करतांना, काम करतांना देखील उपयोगी होईल ह्यात शंकाच नाही. अर्थात सगळीच मुलं त्यांच्या त्यांच्या परीनं घरी हातभार लावत असतील देखील, पण मला माझ्या डोळ्याने जे दिसलं ते सातत्य महत्वाचं आणि मांडण्याजोगं.

खाद्यपदार्थ तुमच्या द्वारी

एको अहं, द्वितीयो नास्ति, न भूतो न भविष्यति!

ह्या नवीन दिवसात तर होम डिलिव्हरी ला पेव फुटलंय कारण सध्याची ती गरज म्हणून. पण आधी देखील सहज म्हणून किंवा बदल म्हणून खाद्यपदार्थ घरी मागवले जायचे. वैविध्य मोबाईल अँप आहेत आणि त्याचा वापर करून सगळ्यांचीच सोय होते, ज्यांना पदार्थ हवे आहेत, रेस्टॉरंट्स, डिलिव्हरी देणारे, मोबाईल अँप तय्यार करणारे ई. अनेक. बऱ्याच वर्षांपासून प्रत्येक अँप च्या रंगांचे, नावाचे एका ठराविक पद्धतीचे पोशाख घालून घाईत ये-जा करणारे लोक दिसतात. हे डिलिव्हरी करणारे बहुतांशी दुचाकी वर असतात. माझ्या अगदी शेजारी काही नोकरी करणारे मुलं राहतात एकटे, कुटुंबासोबत नाही. त्यामुळे ते सतत काही ना काही खाणं मागवतातच. विविध वस्तू पण ऑनलाईन मागवण चालूच असत. ३-४ मुलं असल्यामुळे त्यांच्या आवडीनुसार, सवडीनुसार सातत्याने डिलिव्हरी करणारे येतच असतात.

परवा दोन वेगळे अनुभव आले, काहीतरी वेगळं माझ्या दृष्टीपथात पडलं, आश्चर्य वाटलं आणि कुतूहल पण.

खाणं मारुती वागेनार मधून आलं आणि काही वस्तू ऑटो रिक्षा मधून. अहाहा. आवडलं मला. थोडा विचार केला तर असं वाटलं कि मारुती गाडी हि टॅक्सी होती. लॉक डाउन मधे टॅक्सी चा धंदा चालत नसल्यामुळे हा उत्कृष्ट पर्याय शोधून काढला असं वाटलं त्या चालक - मालकाने. आवडलं मला. एका वेळी त्या भागातल्या अनेक ऑर्डर घेऊन डिलिव्हर करायच्या, शिवाय इतका पाऊस पाण्याचा पण प्रश्न उद्भवणार नाही, कार असल्यामुळे. तेच ऑटो रिक्षा काकांचं देखील असेल.

असो. काही का असेना, पोटापाण्यासाठी चाललेली धडपड अशीच प्रगती पथावर राहो हि प्रार्थना. 

सोबत

माझा एक स्वभाव आहे, मला सदोदित सर्व जण माझ्या डोळ्यासमोर हवे असतात, कोणीही कुठेही जायला नको असं वाटत. (अर्थात बहुतांशी सगळ्यांचंच असं असेल).  म्हणजे दिवसभर ठीक आहे शाळा, ऑफिस, कामं असतात पण बाकी च्या वेळी सगळ्यांसोबत राहणं च मला भावतं. हे नेहेमीच सगळ्यांसाठी शक्य असत असं नाहीच. कारण

१) शिक्षण म्हटलं कि बऱ्याचदा घरापासून दूर जावं लागत
२) नोकरीची ठिकाण विविध असू शकतात, संधी जशी येईल तशी
३) लग्न झाल्यावर मुलगी एकाच शहरात राहिली तर उत्तमच
४) मग पुनःच हरी ओम

बाहेर पडणं हे दोघांकरता फारच अवघड असत, जो पडतो / पडते आणि घरच्यांना देखील. ज्यात राहणं, खाणं-पिणं, सहवास, काळजी ई. बदलत च. पर्याय नसेल तर करावंच लागत पण इतकं सोप्प नसत ते. अर्थात काही जण ते दाखवतात काही लपवतात.

सध्यातरी तंत्रज्ञानामुळे थोडसं सोप्प झालाय दोन्ही जणांना, दररोज एकमेकांना प्रत्यक्ष बघून बोलता येत. ते बोलणं रेकॉर्ड करून ठेवता येत. निरोप पाठवणं, फोटो पाठवणं, आपल्या आवाजात छोटेखानी निरोप पाठवणं, ई. सहज करता येत. त्यामुळे मुलं दूर गेली जरी शिक्षणासाठी तरी थोडीशी जवळीक साधता येतेच. एकमेकांना लागलंच तर फॉलो करून बघता येत, पालकांना देखील लॉगिन दिल जात त्यामुळे विद्यालयात थोडक्यात काय चाललंय ते पण बघणं शक्य होत.

पण तंत्रज्ञान विकसित होण्या आधी तर फक्त पत्र, कधीतरी फोन, किंवा वर्षातून एकदा / दोनदा भेट एवढंच मर्यादित होत.  त्या जमान्यात शिकायला / नोकरी करायला किंवा सासरी जाणं झालं त्यांचं काय? संमिश्र भावना असतात. काळ हेच औषध असत आणि काही दिवसांनी सगळं सुरळीत झाल्यासारखं दिसत, पाहणाऱ्याला.

मुलीची आई झाली कि ती एक दिवस आपल्याला सोडून सासरी जाणार आणि सासरचीच होणार हे जरी माहित असलं तरी वेळ आल्यावर सावरणं फार अवघड. तसेच मुलं पंख फुटले कि उडून जाणारच हे जरी पक्के असलं तरी त्या मनाला समजावणं लई अवघड. त्याचा अर्थ अडथळा निर्माण करायचा असं मुळीच नाही, पण मार्ग चाचपडत का होईना शोधावा लागतो, आणि शोधला जातोच.

एका छताखाली / आपल्या शहरात / देशात राहून प्रगती होत नाही असं नाही, पण त्या भावनांचं / विचारांचं करायचं काय? आवर घालणं जमायला हवं सहज.

मी सासरी गेले, एक फार मोठी पोकळी निर्माण झाली असणारच घरी. त्यावेळी मी दुसऱ्या टोकाला / बाजूला होते त्यामुळे ते फारसं लक्षात आलं नाही माझ्या, पण जेव्हा आता असं दृष्टीपथात दिसतंय कि माझी लेकरं लवकरच आकाशाला गवसणी घालतील तेव्हा समजतंय कि माझ्या घरच्यांचं झालं असेल ते. दुसऱ्याला समजावून सांगणं फार सोप्प पण आपण जेव्हा ह्या सगळ्यातून आपण  जातो तेव्हा प्रकर्षाने जाणवतं, प्रत्यक्ष सोबत किती महत्वाची असते ते, माणसं आणि प्रत्येक जण सतत नाही तरी काही ठराविक काळानंतर प्रत्यक्ष भेटणं फारच आवश्यक. 

शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

बाउन्सर आणि सुखद अनुभव

माझी मुलं अगदी बाळं होती तेव्हा पासून आमच्या कडे दोघांचे दोन बाउन्सर्स होते. फारच सोय होती ती, त्यांच्या साठी आणि माझ्या साठी देखील. त्याची असंख्य कारणं आहेत. एक म्हणजे ती आराम खुर्ची होती त्यांची. त्यात विविध रंगबिरंगी खेळणी लटकवली होती समोर मोटर स्किल्स / वाढ होण्यास मदत होते त्यांची ई., त्याचे पाय स्कूटर ला किक मारल्यासारखे हालले कि फारच उत्कृष्ट आणि प्रेरित करणारे आवाज करत असे ते बाउन्सर. अहाहा. असं वाटायचं कि स्वतःच बसावं आणि.....

ह्या सगळ्या शिवाय एक अजून भन्नाट गोष्ट होती ह्या बाउन्सर्स मधे, ती म्हणजे स्पंदने. एक छुटुकलं बटन होत त्याला, ते सुरु केलं कि अहाहा, ब्रह्मानंदी लागायलाच पाहिजे बाळाची. काय काय सोय असते नाही आजकाल. मज्जा च मज्जा.

आज हा विषय का म्हणताय? सांगते.

मॅट्रिक्स - रिदम थेरपी हि एक जादू आहे, फिझिओथेरपी मधे, त्यात पण स्पंदने / लहरी / तरंग असतात जे थोडासा बिघडलेला शरीरातला रिदम वठणीवर आणण्यास मदत करतात. कुठेही असुदे दुखणं, पण जादू मुळे संपूर्ण शरीराला तजेलदार वाटत. अगदी बाउन्सर सारखं. अहाहा. मी प्रत्येक माझे रिदमफूल सेशन्स खुप मनसोक्त उपभोगते. बाउन्सर मधे न बसता पुरेपूर उपभोग अगदी तस्साच नाही त्याही पेक्षा खूप वेगळा आणि सुखद असा.

चुणचुणीत मनगटी घड्याळ

गेले १० एक वर्ष म्हणायला हरकत नाही सगळे स्मार्ट झाले आहेत, सर्वार्थाने. कसे म्हणताय, सांगते. सगळ्यांच्याच हातात स्मार्ट फोन आला होता आणि तो सातत्याने अधिकाधिक स्मार्ट होत गेला. स्मार्ट फोन हाताळणारे पण अर्थातच स्मार्ट, नाही का?. असो. हा प्रवास तेथेच नाही थांबला. तो अधिकाधिक विविध साधनां मार्फत स्मार्ट होत राहिला. जसे कि स्मार्ट-घड्याळ, स्मार्ट मनगटी घड्याळ. सगळे स्वतःचे डॉक्टर पण झाले, आतबाहेर काय काय चाललंय, अगदी पावलोपावली हे देखील समजायला लागलं. प्रत्येक श्वासाचं गणित मांडलं गेलं, आकडेमोड च सगळी. असो.

ह्या सगळ्या आकड्यांचे फायदे पण अनेक आहेत जर त्याच्या कडे फक्त माहिती म्हणून बघितलं तर.

सर्वांना आता हे माहिती आहे कि आजकाल घड्याळाचे काम फक्त वेळ सांगणे नाही. मुलींकरता तो एक दागिना झाला आहे, हिरेजडीत दागिना, प्रचंड महाग. तसेच "प्रवाह पतित" होणे गरजेचे आणि समाधानाचे, ओढूनताणून नाही. सहज जमत असेल तर. आणि सध्याच्या ह्या स्मार्ट घड्याळाची किंमत पण वाजवी आहे. फॅशन म्हणून पण असंख्य जण वापरतात अगदी तरुणांपासून ते जेष्ठ नागरीकांपर्यंत सर्वच. मस्त मिरवतात वैविध्य स्मार्ट घड्याळ, अहाहा. तरुण झाल्यासारखं वाटत असेल कदाचित त्यांना.

मला विचारलं ह्या आधुनिक स्मार्टनेस बद्दल तर सोप्प आहे, भरपूर काम करा, ऑफिस च्या वेळेला. त्यानंतर मुलांसोबत / घरच्यांसोबत / घरात वेळ घालावा. जमतील तेवढे साध्या पद्धतीने छंद जोपासा, खळखळून हसा, पोटभर आवडेल ते खा आणि मस्त व्यायाम एन्जॉय करा थोडासा. म्हणजे सतत किती पावलं चाललो, हृदय किती वेळा धडधडलं, आणि असे बरेच काही जाणून घ्यायची गरज नाहीच.

एवढ्यातच मी काही कारणा करता एका घडाळाच्या दुकानात गेले होते. तेथे एक उच्च मध्यम वर्गीय वडिल आले होते. कदाचित त्यांच्या बरोबर त्यांचे चिरंजीव होते, मला माहित नाही. पण ज्या पद्धतीने वडिल भुंकत होते मुलावर माझा रक्तदाब वाढला. सर्व दुकान हादरवून टाकलं होत त्या वडिलांनी. बाप रे. मुलगा कित्ती आळशी आहे, कुठलाही व्यायाम करत नाही, अगदी आई वर कसा गेला आहे ई. आणि तरी पण ह्याला महागडं आणि स्मार्ट घड्याळ हवं आहे. कशासाठी? ई.  मुलाने मनाला लावून घेऊ नये म्हणजे मिळवलं. अपमानच होता तो, जरी दुकानदार त्यांना ओळखत नसले तरी देखील. असो. वडिलांना सद्बुध्दी मिळो आणि त्यांनी / कुठल्याही पालकांनी असं प्रदर्शन मांडू नये म्हणजे पण मिळवलं.

आज नवनवीन साधनं सर्वांसाठीच आहेत, कोणीही कसाही त्याचा उपयोग करावा, अगदी साधी फॅशन म्हणून ते वापरून तर बघू, ते व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणून किंवा गरज म्हणून. असो.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...