शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४

२०१७: कशात काय?


माझ्यासाठी काही तरी खास आणले गेले. ते हातात आल्या आल्या एक वेगळाच सुगंध दरवळला. तो एक छोटासा बॉक्स होता. जेव्हा तो उघडला त्यात एक अलुमिनियम ची थैली आढळली. बॉक्स उघडला कि सुगंध जसा कि द्विगुणित झाला, अजून प्रकर्षाने जाणवला. आणि जेव्हा ती अलुमिनियम थैली उघडली तेव्हा तर भलताच अनुभव आला.  जेव्हा तो पदार्थ चाखला  तेव्हा अन्तर्बाह्य सुगंधांनी संपूर्ण पणे माझी सृष्टी भारावून गेली. अहाहा च. वेगळ्याच दुनियेत गेल्याचा भास झाला. अतिशय उत्कृष्ट, उत्तम, चविष्ट आणि पारंपरिक असा तो पदार्थ आहे. कर्नाटकात प्रसिद्ध आहे म्हणूनच माझ्या साठी आणला होता खास. त्यात डिंक, सुकामेवा, खोबरं, तूप, गूळ+साखर समप्रमाणात बहुतांशी, आणि अर्थात वेलदोडा घातलेला आहे. किंबहुना हे सगळे जिन्नस वेलदोड्यात घातले आहेत, मिसळले आहेत कि काय असे वाटले. अक्षरशः मी नाहून निघाले वेलदोड्याच्या स्वादात, आणि सुगंधात. मस्त प्रतीचा, ताजे तवाने वेलदोडे वापरले आहेत. अहो पण किती ते प्रमाण? म्हणजे नक्की महत्वाचा घटक काय आहे, वेलदोड्याची वडी सुकामेव्यासह, हे आहे कि सुकामेव्याची खास मिठाई (अर्थात वेलदोडा घालणारच पण अगदी चिमूटभर). अर्थात अश्या नव्या ढंगाची ती वडी चाखून माझा आनंद गगनात मावेना. आधीच मी श्री. बालाजी च्या प्रसादाच्या लाडवांची भली मोठी चाहती आणि हि मिठाई म्हणजे माझ्या नजरेत त्या लाडवांची प्रतिकृती. त्यामुळे खूप भन्नाट मज्जा आली. अशी मिठाई देखील तय्यार होते हे माहित नव्हतं. किंबहुना इतक्या मोठ्या प्रमाणात महागाची विलायची वापरली जाते हे अर्धशतकी प्रवासात पहिल्यांदा समजलं. आणि त्यात पक्की नागपूरकर, खवैयि व्यक्तिमत्व, त्यामुळे "आन दो" अश्या पद्धतीने अर्ध्यापेक्षा जास्त फस्त झालं पण. अहाहा. 


जिच्या मुळे मला हा असला असली खास पदार्थ चाखता आला तिला सर्वप्रथम धन्यवाद. मज्जा आवि गयो. 

बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४

२०१६: शब्दांच्या अलिकडले


आताशा का कुणास ठाऊक पण एक नवीन सवय माझ्यात रुजू पावते आहे. नित्यनियमाने, अगदी दररोज, सकाळी चहा चा कप हातात आला कि नतमस्तक व्हायला होतं. कोणासमोर म्हणाल तर त्या गाई, म्हशींसमोर ज्यांनी हे दूध दिलं. शेतकरी ज्यांनी आलं तय्यार केलं आणि माझ्या पर्यंत पोचवलं, तसेच गवतीचहा सुद्धा. ऊस शेती अतिशय आव्हानात्मक. हे आव्हान ज्यांनी पेललं, सगळे कष्ट उपसून, साखर कारखान्याला पुरवले आणि जे जे हात साखर तय्यार करून माझ्या पर्यंत पोचवण्यासाठी राबले त्या सर्वांसमोर.  मी तब्बल एक आठवडा चहाच्या बागानात वास्तव्याला होते. तेथे लागणारे कष्ट ह्याची देही ह्याची डोळा बघून आले. कित्ती त्या मुली अनेक तास उभे राहून ती पाने खुडतात, टोपलीत टाकतात आणि मग त्याचे फॅक्टरीत प्रोसेसिंग होते. सर्वांची आठवण झाल्याशिवाय राहात नाहीच.  पाणी ज्यांनी अगदी दाराशी आणून सोय केली त्या सर्व कष्टकऱ्यांचे धन्यवाद, अगदी जशी "गंगा आली रे अंगणी". गॅस, सिलेंडर, स्टोव्ह, लायटर किंवा काडेपेटी ह्या कारखान्यात काम करणारे सर्व कामगार, असे सगळे म्हणजे सगळे प्रेमाने आळवले / आठवले जातातच आपोआप न कळत, आणि चहा फस्त होतो.  अर्थात चहाचे सोबती बिस्किटे अर्थातच त्यांना घडवणारे हात, मशिन्स, आणि पुन्हा एकदा शेतकरी हे देखील आहेतच ना. न विसरता, आमचे हे देखील, कारण त्यांच्याच कष्टाचे फळ म्हणजे हे घर आणि सर्व सोयी सुविधा. त्यांना विसरून कसे चालणार बरे. त्यामुळे त्यांना देखील धन्यवाद दिले जातातच, कोणीच सुटायला नको. 


हि झाली नाण्याची एक बाजू. 


दुसरी म्हणजे समाधान. एकतर सर्व इंद्रिय व्यवस्थित काम करत आहेत, किती कप चहाला किती काय काय घालायचे हे लक्षात आहे. दुसरे म्हणजे इतक्या सर्वांना त्यांच्या मेहेनतीचा मोबदला मिळण्यासाठी आपण भागीदार आहोत, न कळत. 


असा विचार केल्यावर मला जरा हायसं वाटलं नाहीतर "कशी होऊ उतराई" असा विचार सतत येत राहिला. कारण मला एक कप मस्त, चविष्ट, तजेलदार चहा मिळावा हातात म्हणून एका रांगेत बघा ना कित्ती जणांनी कामं केली आहेत, कष्ट केले आहेत. क्या बात है? ह्यालाच म्हणतात नशीब आणि "सुख म्हणजे नक्की काय असतं" ह्या परे? काहीच नाही. आणि फक्त सकाळीच नाही बरं का "त्याने" इतक्या योग्य स्थतीत ठेवलं आहे कि मनात येईल तेव्हा चहा करणे सहज शक्य आहे. आपण तो दोनदा पितो तेवढंच. 


हे सगळं शब्दांच्या अलिकडले असे आहे माझ्यासाठी कारण "दोन हस्तक आणि एक मस्तक" किंवा फक्त मनःपूर्वक दररोज चे धन्यवाद पुरेसे आहेत, शब्दात प्रेरणे अवघडच आणि शब्दापर्यंत पोचण्याआधीच प्रकर्षाने धन्यवाद दिले जातातच. 


अगदी तसेच, मोठ्या प्रमाणावर जेवणाचे ताट समोर वाढल्यावर देखील होते.  


सर्वांचे उतराई व्हा, नतमस्तक व्हा, सर्वांच्या कष्टाची जाणीव असू द्या, कारण कुठलेही काम सोप्पे नाही, आणि सर्वांच्या मदतीशिवाय काहीच चालणार नाही. त्यामुळे हे असचं पुढे चालत राहावं असे वाटत असेल तर त्या सर्व कष्टकऱ्यांना बळ द्या. 

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४

२०१५: माहेरची साडी


हा एक सुप्रसिद्ध चित्रपट होता, आहे, अनेक दशकांपूर्वी आला होता आणि धमाल चालला होता. शेवटी ज्यात माहेर खुद्द आहे असं चित्रपट चालणार नाही असे होऊच शकत नाही. अर्थात माहेर म्हटलं कि आपल्याला एक तरुण नवविवाहित तरुणी डोळ्यासमोर येते किंवा बाकी सगळ्या वयोगटातल्या मुली ज्यांना हा शब्द उच्चारला कि क्षणभर डोळ्यासमोरचं काहीच नजरेस पडत नाहीच. 


पण आताशा ना तसे दूर माहेर राहिले आहे, ना हि तशी साडी. आताशा तर तंत्रज्ञानामुळे हवे तेव्हा आई वडील, भाऊ बहिणींना बघता, बोलता आणि भेटता येतं आभासी पद्धतीने / व्हरचुअल पद्धतीने हो. अगदी तसेच, त्याच तंत्रज्ञानाच्या मदतीने आता हवे ते हवे तेव्हा ऑनलाईन मागवता येतं आणि ते घरपोच पण मिळतं. इतकं सोप्प झालंय सगळं. तरी पण माझ्यासारखीला अजूनही आहेच ती माहेरची ओढ, ती कायम राहणार कारण मी ह्या असल्या तांत्रिक युगात जन्मले नाही. आणि माहेरचं असं नाही पण कोणीही काहीही माझ्यासाठी आणलं त्याच अप्रूप निराळंच असतं, मग ती साडी असो, नाहीतर काही आणि. मी मागे एकदा नमूद केल्या प्रमाणे माझी आई म्हणते कि काय वस्तू आणली आहे ते महत्वाचं नाही तर त्या मागची क्रिया, कृती, पायऱ्या महत्वाच्या. ती व्यक्ती तुमच्या बद्दल विचार करते, तुम्हाला काय आवडेल हे ध्यानात आणते, त्या करता ते लक्षात ठेवते, मग दुकानात जाऊन विकत घेऊन पाठवते म्हणजे गिफ्ट. वस्तू नाहीच. 


तर माझी इतक्यातच एका पवित्र (निर्मळ) जसे पाणी, प्रामाणिक, प्रांजल, प्रांजळ अश्या प्रांजलीची ओळख झाली. फक्त आमचं दोन तीनदा बोलणं झालं फोन वर तेवढंच. आणि  एवढ्या च ओळखीवर तिने स्वतःहून माझ्या मुलासाठी, जो वसतिगृहात राहतो त्याच्यासाठी गम्मत घेऊन जाण्याची तय्यारी दाखवली. क्या बात है नाही. मुलाच्या इच्छेनुसार, त्याला जे आवडेल ते पण प्रांजलीला जड होणार नाही असं थोडंस पाठवलं, माहेरचं, खाऊ हो. आता तो घरापासून दूर म्हणजे एका अर्थानी सासरीच गेलेला कि नाही, माहेरी नाही म्हणजे सासरी आणि वसतिगृह म्हणजे एक प्रकारचे वेगळे पण असलेले सासरचं, माझ्या दृष्टीने हो. आणि आता ह्या पिढीच्या मुलांना कुठलं आलंय माहेर सासर. त्याला आवडलं सगळं, प्रांजलीने नेलेले आणि मला मनापासून समाधान मिळाले अगदी जशी कि माहेरच्या साडीची उब.  जितके द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत प्रांजलीला आणि अर्थात तिच्या कुटुंबियाला. 

आधीच्या माहेरच्या परिभाषेप्रमाणे नाही तरी मुलांना कुठे असतं माहेर आणि वेगळं सासर, त्या वरून माहेरची साडी वगैरे, म्हणून हा प्रांजळ उहापोह. 


रविवार, २५ ऑगस्ट, २०२४

२०१४: दारिद्र्य


दरिद्री हा शब्द उपहासाने किंवा मित्रमंडळींमधे गमतीने पण वापरला जातो. जे प्रार्थनेवर विश्वास ठेवतात ते कोणाच्याही पदरी हे दारिद्य येऊ नये ह्या बद्दल त्या भगवंताला / दिव्य शक्तीला मनोभावे साद घालतात. पैशाशी निगडीत असलेले असे दारिद्य हा एकच प्रकार नाही तर वैचारीक, सामाजिक, बौद्धिक असे अनेक कंगोरे आहेत त्याला. पैशाने थोडेसे कमी असलेला मेहेनतीने खूप पुढे जाऊ शकतो आणि त्याची खूप उदाहरणे आपण वाचतो, ऐकतो आणि बघतो देखील. पण जो विचारांनी दरिद्री असतो तो कधीच पुढे येऊच शकत नाही, अगदी नगण्य अशी संख्या असेल जेथे हा चमत्कार घडला. 


विचारांनी श्रीमंत व्यक्ती हि समाजात, घरात, कामावर आणि प्रत्येक ठिकाणी आपली छाप सोडतेच. पण जे विचार स्तरावर दरिद्री, कमी नाही हो, पूर्णतः दरिद्री असे त्यांच्या सोबतच्या मंडळींना पण त्या दारिद्र्यात / दलदलती जोपासतात. मग एखादा व्यक्ती अगदी लहानपणापासून वैचारीक दरिद्री आहे हे जर माहिती आहे तर मग एक तर त्याच्या मित्रमंडळींनी त्याला साथ देऊन पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाहीतर त्याच्या पासून कोसो दूर राहिले पाहिजे. 


दोन खास मित्रांची कहाणी माझ्या पुढ्यात मांडली गेली अचानक इतक्यात. अगदी पहिल्या वर्गापासून ते संपूर्ण शिक्षण होई पर्यंत म्हणे दोन मित्र एका वर्गात होते. एक घरचा व्यवस्थित, आर्थिक परिस्थिती सुंदर, वडील चांगल्या हुद्यावर वगैरे. आणि दुसरा म्हणजे अत्यंत गरीब, पैशाची वानवा, तरी देखील भले मोठे कुटुंब आणि बहुतांशी सर्वांचेच विचार अगदी निकृष्ट, घाणेरडे म्हटलं तर त्या शब्दाचा अपमान होईल असे. जवळपास राहात असल्यामुळे, एकाच वर्गात असल्यामुळे असेल कदाचित पण त्यांची ओळख टिकून राहिली. जो व्यवस्थित कुटुंब संस्थेतून आला होता त्याने टिकवून ठेवली. मग ह्या दोघांची कालांतराने लग्न झाली, मुले बाळे झाली आणि त्या नंतर मुलांची लग्न जुळवायची वेळ आली. तेव्हा अनेक वर्षांनी पुन्हा एकदा दोघे समोरासमोर आले आणि सधन व्यक्तीच्या मुलीचा विवाह वैचारीक पातळीवर मूलतः दरिद्री असलेल्या व्यक्तीच्या मुलाशी झाला देखील. हे का? माहिती असतांना दरीत ढकललं त्या मुलीला वडिलांनी. असे का केले असेल? मला असंख्य प्रश्न पडले आहेत. ज्याची उत्तरे नाहीतच. नशीब म्हणून किंवा "विनाश काले विपरीत बुद्धी" असे काहीसे म्हणावे लागेल ह्या प्रकरणात.  त्या मुलीची कुचंबणा झाली ते वेगळंच पण दरिद्री माणसाने प्रचंड त्रास दिला, त्याचं सातत्य इतकं होतं कि दाही बोटं तोंडात जावी इतपत. बघा म्हणजे दरिद्री लोकं कुठल्या स्तरावर जाऊ शकतात, त्यांची शक्ती आणि नसलेली बुद्धी कशी त्यांना साथ देते. दरिद्री माणसाला यत्किंचित वाटलं नसेल कि आपण एका हाडा माणसाच्या मनाला छळतोय जी आपली सून आहे, सक्ख्या मुलाची बायको? हि सोयरीक जमली तेव्हा सर्वतोपरी श्रीमंत असलेल्या माणसाची आई हयात होती. मग तिने तर जास्त पावसाळे बघितले होते ना, सगळं ठाऊक असतांना असं घडलं कसं आणि का? त्या मुलाचं नशीब घडवण्यासाठी, का हे दारिद्र्य संपुष्टात आणण्यासाठी? पुढिल पिढी जास्त योग्य उभी करण्यासाठी का पुन्हा एकदा प्रारब्ध म्हणून? 


"त्याचा" निर्णय अंतिम आणि योग्य ह्या वर माझा दृढ विश्वास आहे. आपण फक्त खेळाचा एक भाग आहोत हे देखील मान्य आहेच. पण सगळं बघितलं कि आश्चर्य वाटायला लागतं. अनेक आधुनिक संत देखील म्हणतात ना "जे घडून गेलंय ते उत्तम होतं, काही शिकवण देऊन गेलं सर्वांना आणि जे घडणार आहे ते सर्वोत्तम आहे". भूतकाळात झालेले सगळे विसरून जा, सोप्प नाही ते, पण पर्याय नाही, प्रयत्न केलेच पाहिजेत, तो कार्मिक अकाउंट बंद करा कायमचा आणि  ह्या पुढे सर्वांसाठी फक्त प्रार्थना करत पुढे व्हा. "ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान". 

2013: Working professional


I recently came to know the definition of a working professional lady, and it came to me as a sweet shock. Let me narrate the details briefly here.

 

So, this is the tail of one girl who got married really early. She was married in the joint family then, many years ago. And fortunately or unfortunately, her mother-in-law lived a long life till the young girl became mother-in-law herself. Being married so young, she used to be given a tiny work load to carry out, rarely. The entire house was run by her mother-in-law, sister-in-law, and elders in the family. So much so that when she delivered her kids, they were also taken care of by family members only, including their food, stories, health, and what not. The girl who turned into a mother-in-law definitely took care of home, but after many years, and that too with the help from her grown up kids, sons and daughters, and retired husband too. She was a homemaker for her entire life, and her only work was to cook for all. Outside chores were managed by others in the house. Her day used to start at around 7am, cooking and somethings here and there till noon, then TV, lunch, and nap time from 2-5pm daily, without fail. Again, a few visits to the kitchen, followed by consistent TV, dinner, and again, good night's sleep.

 

I am sure all are aware of the daily routine of this generation's moms with multitasking, very demanding work front, equally challenging home front, driving, and working at keeping fit, being presentable, huge screen time, tight timelines, and the list is really endless.

 

Now when we heard that the girl mentioned in the first paragraph was called working professional, great personality, etc., to name a few, by her husband, sons, and daughters, then what will they call the tiny description of today’s moms narrated in the second paragraph? What is the exact definition of a working professional? According to my tiny vocabulary, master, mastero, expert, pro, specialist, virtuoso, etc. are far less. Yeah, she was good at cooking and showing constantly how much she worked, but that is not it, right? The new generation has the designation, needs to prove consistently, lives in a competitive world, may handle politics too on a small scale, takes good care of wealth earned (hard earned), proper management of her time in hand, drive / commute in this crezy traffic, interactions with many so-called men-led cultures, upgrades, updates herself, her health, and always smile on face, involvement in kid activities, and what not.

 

I was again super surprised to hear the definition multiple times.

२०१२: जय्यत तय्यारी


माझ्या लहानपणी पासून जे काही कानावर पडलं ते मी आणि माझ्या सारख्या तमाम मध्यम वर्गीय मुलींनी ग्राह्य धरलं. अगदी कळत्या वयापासून मी आधी लिहिल्याप्रमाणे अगदी जो दिसेल तो, घरी, दारी, प्रत्येक ठिकाणी एकच री ओढली जायची, ती म्हणजे लग्नाची. सगळ्यांनी अगदी विडाच उचलला होता कि लग्न होऊन जाणारी मुलगी हि सर्व गुण संपन्न पाहिजे. स्वयंपाकात / पाककलेत, घर सांभाळण्यात, कलेत निपुण, आवराआवरी, आदर सत्कार, व्रत वैकले, सगळ्या चाली रीती, आणि शिवाय शिक्षणात सर्वोत्तम, म्हणजेच पुढे नोकरी साठी सजग आणि तय्यार. अगदी न कळत्या वयापासून जी टेप सुरु व्हायची ती अक्षता पडे पर्यंत. सगळीकडे एक वाक्यात आहे हे बघून ती त्यावरच विश्वास ठेवायची आणि मनापासून सगळ्या फ्रंट वर निपुण होण्याचा प्रयन्त करायची, आणि त्या वेळच्या सगळ्याच मुली त्यात यशस्वी झाल्या पण. 


दोन गोष्टी शिकवायच्या राहिल्या पण त्या वेळच्या समाजाकडून ह्या मुलींना. त्या राहिलेल्या गोष्टी जर शिकवून टाकल्या असत्या तर वेगळं चित्र निर्माण झालं असतं, सर्वत्र जास्त आनंद दिसला असता, पण काश ते राहून गेलं. 


१. त्या वेळचा समाज, घरी दारी, सर्वत्र सगळे जण मुलींच्याच इतके मागे लागले, त्यांची सगळी शक्ती आणि वेळ त्यातच खल्लास झाला कि ते हे सपशेल विसरले कि मुलांना देखील शिकवावं लागतं. किंवा त्यांनी हे गृहीत धरलं कि मुलांना सगळं येतं, त्यांचा शिकवण्याची गरज नाही. ते घरचे मुख्य आहेत किंवा होणारे मुख्य आहेत त्यामुळे ते सगळं किंवा सगळ्यांना सामावूनच घेतील सर्वार्थाने आणि जिंकतील. कारण ती मुलं आहेत, जिंकलेली जन्मापासून, वंशाचा दिवा, कुलभूषण ई. 


२. मुलींना एक गोष्ट ठासून सांगायची राहिली कि "तू सून म्हणून त्या घरी जाणार आहेस, मुलगी म्हणून नाही. ते तुझं घर नसणार आहे, हक्काचं नाही. तेथे कदाचित फक्त तुझ्या चुका दाखवल्या जातील, उणे दूणेच काढले जातील, ते फक्त सहन करणे ह्या शिवाय पर्याय नाही. सगळेच तुझ्याकडून खूप अपेक्षा करणार, सर्वांनाच खुश ठेवावे लागणार सतत" ई. ह्या पिढीच्या आधी हे सगळं कदाचित मुलींना अनुभवावं लागलं नाही, त्या जेव्हा सून म्हुणू आल्या तेव्हा, आई झाल्यावर त्यांना चांगलीच किंवा कुठलीही वेगळी वागणूक नाही मिळाली, घरच्या सारखे महत्व मिळाले म्हणून त्यांनी त्यांच्या मुलींना हे सगळं शिकवले नाहीच. कारण नव्हतेच शिकवण्याचे.  पण आता तसे नाही, कात्रीत सापडलेली सँडविच पिढी हि, घरात दारात दोन्ही कडे कर्तृत्व सिद्ध कारायचे होते तिला. पण अर्थात कामाच्या जागी चुका शांतपणे समजावून घेऊन पुढ्यात मांडल्या, प्रोफेशनली, शिवाय पगार मिळाला, बढती मिळाली ई. 


अजून एक म्हणजे आधीच्या पिढीने इतके मस्त उदाहरणं समोर मांडले आणि तेव्हाच्या काळानुरूप लग्नाला पर्याय नव्हताच, ठेवलाच नाही मोठ्यांनी. पण सॅन्डविच पिढीतल्या आईची स्थिती बघून माझ्या संपर्कातल्या कित्येक मुलांनी, मुलींनी लग्न करायचेच नाही हा ठाम निर्णय घेतला आहे. आणि चुकून केलेच तर पुढची पिढी जन्माला येणार नाही हे निश्चित कारण त्यांना असं भलतं जग दाखवायचं नाही म्हणे त्यांना. 


म्हणजे बघा एका घरच्या सुनेला, आईला, बायकोला जसं वागवतांना बघितलं ते वेगळं होतं. काही सुंदर उदाहरणं आहेत, असतातच नेहेमी, चांगले उत्तम लोकं आणि कुटुंबीय असतात पण फार म्हणजे फारच दुर्मिळ, भिंग घेऊन शोधावे लागतील असे. 


।। "कालाय तस्मै नमः" ।। 

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४

२०११: बैठक


तुम्ही समुपदेशक म्हणून अनेकजणांसोबत काम करत असाल, सल्लागार असाल, वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत असाल किंवा शिक्षक असाल, प्रत्येक ठिकाणी काम करण्यासाठी इच्छा, सदीच्छा, आशीर्वाद, गुरु, साधना आणि बैठक असणे महद अत्यावश्य्क आहे. त्या करता सातत्याने मेहेनत घ्यावी लागेल प्रत्येकाला. मग तुम्ही नवशिखे असाल, प्राविण्य प्राप्त केलेले असेल, खूप अनुभुवी असाल, कुठल्याही भूमिकेत किंवा स्थितीत असाल तरी देखील बैठकीला पर्याय नाही. मग बैठक म्हणजे नक्की काय? असंख्य लोकांनी, वरिष्ठ व्यक्तींनी, अनुभवी महानुभावांनी अनेकविध अश्या व्याख्या दिल्या आहेत, नमूद करून ठेवल्या आहेत, खूप ठिकाणी.  पण माझ्या दृष्टीने शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्थरावर स्थिर असणे म्हणजे बैठक. त्यासाठी एखादी गोष्ट आचरणात आणून चालणार नाही तर सांख्यिक रित्या, एकत्रित पणे त्यावर हळूहळू काम व्हायला हवे. मग त्यात नतमस्तक होणे आले, योग आणि प्राणायाम करणे, छंद जोपासणे, नियमित व्यायाम, बुद्धीला चालना, वाचन, मनन चिंतन, सात्विक भोजन, गुरूंचे आणि थोरामोठ्यांचे स्मरण, कर्तव्य दक्ष रहाणीमान असं सगळंच आलं. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. हळूहळू सुरवात केली कि सगळं साध्य होतंच, तिळमात्र शंका नाही. त्यामुळे जरी तुम्ही वाहनचालक असाल, खूप वर्षांचा अनुभव पाठिशी असला तरी दरवेळी कृतज्ञापूर्वक, मनातल्या मनात त्या वाहनाला, मशीनला नमन करून कामाला सुरवात करून बघा बदल कसा अनुभवता येतो ते.  तुम्ही दुसऱ्याचं समुपदेशन करण्या आधी सर्व स्तरावर तय्यारी करा, तरच ऐकून घेणे, समजणे, उमजणे आणि यथोचित उपाय सांगणे तुमच्या मार्फत साध्य होऊ शकेल.  


मी ह्या छोटेखानी लेखाची सुरवात केली त्याप्रमाणे जरी तुमच्याकडे एखाद्या क्षेत्रातली सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट पदवी असली तरी आशिर्वादाशिवाय पान हलणार नाहीच.  त्या सुप्रीम पॉवरच्या  समोर शरणागती पत्करणे अत्यावश्यक, जे घडून गेलंय ते उत्तम होतं आणि जे पुढे घडणार आहे ते देखील उत्तमच असणार आहे हा भरवसा अत्यंत प्रेरणादायक ठरतो. शिक्षण + आलेले अनुभव (स्वानुभव) + केलेले वाचन + निरीक्षण + गुरूंचे आशीर्वाद + स्वास्थ्य = तुमच्या हातून घडणारे काम.  तुम्हीच जर अस्वस्थ असाल तर थोडीशी गडबड होऊ शकते. माणूसच आहे, शरीर आहे आणि भरकटणारे मन म्हटल्यावर थोडेसे इकडे तिकडे होणे साहजिक आहे, पण बैठक असली तर मात्र पुन्हा सन्मार्गावर येणे सहज शक्य आहे. करून बघा आणि जरी आपल्याला वाटत असले कि आपण दुसऱ्यांचे काम करतो आहोत, पण स्वतः किती वृद्धिगत होतो आहोत ह्या कडे प्रकर्षांने लक्ष असू द्या. बैठक आणखीन स्थिर, मजबूत होईल नक्कीच. 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...